नवले पुलावरच्या अपघाताचा प्रश्न लोकसभेत उपस्थित; नितीन गडकरींचं हे उत्तर? ६००० कोटी डीपीआर मंजूर

0

पुण्यातल्या नवले पुलावर झालेल्या अपघातांचा प्रश्न सुप्रिया सुळेंनी संसदेत उपस्थित केला. दरम्यान याबाबत केंद्रीय रस्ते वाहतूक आणि भूपृष्ठ विकास मंत्री नितीन गडकरी यांनीही उत्तर दिलं. नोव्हेंबर महिन्यात जो अपघात नवले पुलावर झाला त्या अपघातात आठ जण ठार झाले. त्याआधीही या संदर्भातल्या बातम्या आल्या होत्या. त्यामुळे सुप्रिया सुळेंनी हा प्रश्न संसदेत उपस्थित केला. ज्यावर केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी उत्तर दिलं.

काय म्हणाल्या सुप्रिया सुळे?

कोल्हापूर ते पुणे जो रस्ता जातो त्यावर नऱ्हे भागात काही अपघात झाले. आपणही दिल्लीतून पथक पाठवले. अपघातांचं प्रमाण कमी झालं आहे. पण अपघात होत आहेत. तुम्ही (नितीन गडकरी) काही कंत्राटदारांना काळ्या यादीतही टाकलं होतं. पण ते काम पूर्ण कधी होईल? नऱ्हे भागातलं काम पूर्ण कधी होईल कारण तिथे सातत्याने अपघात होत आहेत. हे प्रमाण आधीपेक्षा कमी आहे पण शून्य अपघात कसे होतील याबाबत लक्ष केंद्रीत केलं पाहिजे. ते कधी होईल? असा प्रश्न विचारत सुप्रिया सुळे यांनी नितीन गडकरींना प्रश्न विचारला.

अधिक वाचा  पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी की बँकेची वसुली योजना शेतकरी संघटना, विरोधी पक्षांचे आरोप काय?

नितीन गडकरी काय म्हणाले?

पुणे कोल्हापूर हा महत्त्वाचा रस्ता आहे. त्यातला पुणे ते सातारा हा रिलायन्सकडे होता. ते कंत्राट आम्ही थांबवलं आहे. आम्ही त्याबाबत अभ्यास समिती नेमली आहे. पुण्यात वेस्टर्नली बायपास होता त्याबाबतही काम करत आहोत. तसंच ६ हजार कोटींचा डीपीआर आम्ही मंजूर केला आहे. लवकरच आमच्या खात्यातर्फे काम केलं जाईल. खंबाटकी घाटात जे बोगदे आहेत त्यातला बोगदे ओपन केले जातील. सातारा ते कोल्हापूर हे कामही सुरु आहे. काही अडचणी आल्या आहेत आम्ही त्यावर आढावा बैठक घेणार आहोत. लवकरच प्रकल्प पूर्ण होईल. एक वर्षाच्या आत हा प्रकल्प पूर्ण होईल असं उत्तर नितीन गडकरींनी दिलं.

अधिक वाचा  ओबीसी आरक्षणावर गदा, राज्य निवडणूक आयोगाचे नवे आदेश; हा नियम सर्व ‘स्थानिक’ला लागू होणार का?

मागच्या महिन्यात आठ जणांचा मृत्यू

मागील महिन्यात नवले पूल परिसरात झालेल्या भीषण अपघातात आठ जणांचा होरपळून मृत्यू झाला. अपघातात नऊ ते दहा जण गंभीर होरपळले. अपघाताच्या घटनेनंतर मुरलीधर मोहोळ यांनी नवले पूल परिसरात भेट दिली. आमदार भीमराव तापकीर, महापालिका आयुक्त नवलकिशोर राम, पोलीस आयुक्त अमितेश कुमार, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे अधिकारी संजय कदम या वेळी उपस्थित होते. ‘नवले पूल परिसराात यापूर्वी गंभीर अपघात घडले आहेत. त्यानंतर दरी पूल ते वडगाव बुद्रुक परिसरात होणारे गंभीर रोखण्यासाठी विविध उपाययोजना करण्यात आल्या. भरधाव वाहनांसाठी वेगमर्यादा निश्चित करण्यात आली. वेगावर नियंत्रण ठेवण्यासाठी गतिरोधक पट्टीका बसविणे (रम्बलिंग स्ट्रीप), स्पीड गनची संख्या वाढविणे, बाह्यवळण मार्गावरील वळणे बंद करणे अशा उपाययोजना करण्यात आल्या. त्यानंतर या भागातील अपघातांची संख्या कमी झाली पण तरीही अपघात होत आहेत असा मुद्दा सुप्रिया सुळेंनी लोकसभेत उपस्थित केला होता.

अधिक वाचा  ‘सरकारचे जरांगे पाटलांकडून ब्लॅकमेलिंग, सरकार गेल्या 3 वर्षांपासून दबावापुढे गुडघे टेकताना दिसत आहे ‘ आता कुणबी सेना मैदानात