विधान परिषदेच्या निवडणुकीत महायुतीचे सर्वच्या सर्व १७ अधिकृत उमेदवार विजयी होतील, असा ठाम विश्वास भाजप प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष खा.सुनील तटकरे, शिंदेसेनेचे नेते राहुल शेवाळे यांनी बुधवारी व्यक्त केला. मात्र, काही मतदारसंघांमध्ये अजूनही महायुती आणि महाविकास आघाडीतही अंतर्गत बंडखोरी कायम असल्याचे चित्र आहे.






या निवडणुकीत उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा गुरुवारी शेवटचा दिवस असून, बंडखोरी पूर्णपणे संपवण्यात महायुतीला यश येईल का, हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुमित्रा पवार यांनी एकत्रितपणे बसून १७ अधिकृत नावे निश्चित केली आहेत. त्यांच्याशिवाय इतर सगळे बंडखोर माघार घेतील, असा विश्वास रवींद्र चव्हाण, तटकरे आणि शेवाळे यांनी पत्र परिषदेत व्यक्त केला.
अपक्ष काही हटेनात, भाजप-काँग्रेसपुढे आव्हान
धाराशिव : उस्मानाबाद-लातूर-बीड विधान परिषद निवडणुकीसाठी भाजपकडून माजी राज्यमंत्री बसवराज पाटील, तर काँग्रेसकडून जिल्हा परिषद सदस्य महेश देशमुख यांनी अर्ज दाखल केले आहेत. ७ अपक्षांनीही अर्ज दाखल केले असून, पैकी ४ अपक्ष उमेदवार हे आघाडीतील मित्रपक्षांचे आहेत.
यवतमाळात मविआला महाधक्का ! उमेदवार कांबळे यांची माघार
यवतमाळ : महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार आणि काँग्रेसचे सरचिटणीस साहेबराव कांबळे यांनी अचानकपणे उमेदवारी अर्ज मागे घेतला. ऐन लढाईच्या तोंडावर सेनापतीनेच शस्त्र टाकल्याने महाविकास आघाडीची अब्रू चव्हाट्यावर आली. या प्रकारामुळे कॉंग्रेसच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांत तीव्र संतापाची लाट उसळली आहे. नेत्यांच्या उपस्थितीत शक्तिप्रदर्शन करीत अर्ज भरला, मग अचानक ‘पळपुटेपणा’ का? असा संतप्त सवाल केला जात आहे. दरम्यान, खासदार श्रीकांत शिंदे यांचा हा मास्टर स्ट्रोक मानला जात आहे. ठाण्यात बसून शिंदे यांनी सूत्रे हलविली आणि इकडे यवतमाळात कॉंग्रेसचा गेम झाल्याची चर्चा आहे.
पुण्यात भाजपचे बंडखोर प्रदीप कंद अपक्ष
पुणे स्थानिक प्राधिकारी मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी छाननीनंतर ७ पैकी ६ उमेदवारांचे अर्ज वैध ठरले असून, एका अपक्षाचा अर्ज बाद ठरला आहे. तर, भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रदीप कंद अपक्ष म्हणून रिंगणात आहेत.
समीकरण जुळेना
सोलापूरमध्ये भाजपने माजी आमदार राजेंद्र राऊत यांना उमेदवारी दिली असली, तरी शिंदेसेनेचे माजी सोलापूर लोकसभा क्षेत्रप्रमुख महेश साठे, शिंदेसेनेचे मोहोळचे माजी नगराध्यक्ष रमेश बारसकर हे रिंगणात कायम आहेत.
महायुतीतील बंड शमले; जुईली दळवी यांची माघार
अलिबाग/रत्नागिरी : रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग स्थानिक स्वराज्य संस्थेच्या द्विवार्षिक निवडणुकीसाठी अपक्ष उमेदवार म्हणून अर्ज दाखल केलेल्या जुईली दळवी यांनी आपला अर्ज बुधवारी मागे घेतला. त्यामुळे आता महायुतीतील बंड शमले आहे. यासाठी पालकमंत्री उदय सामंत यांची शिष्टाई यशस्वी झाली असल्याचे बोलले जात आहे. जुईली दळवी यांनी अर्ज मागे घेतल्याने आता उद्धवसेनेतर्फे सुरेंद्रनाथ तथा बाळ माने, राष्ट्रवादीतर्फे (अजित पवार) अनिकेत तटकरे, शेकापतर्फे अरविंद पुंडलिक म्हात्रे आणि मानसी संतोष म्हात्रे तसेच अपक्ष अनिल रमेश चोपडा असे पाच उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत.
विधान परिषद १७ जागांवर सध्या विराजमान आमदारांची यादी व पक्षीय बलाबल –
1 सोलापूर
सोलापुरात काँग्रेसचा गेम
सोलापूर : सोलापूर मतदारसंघात बुधवारी छाननीदरम्यान नाट्यमय घडामोडी पाहायला मिळाल्या. पंढरपूरचे नगरसेवक नागेश भोसले हे काँग्रेसचे उमेदवार आदित्य फत्तेपूरकर यांचे सूचक होते; परंतु त्यांनीच या उमेदवारावर हरकत घेऊन सूचक म्हणून आपली सही नसल्याचे प्रतिज्ञापत्र सादर केल्याने अधिकृत अर्ज बाद होण्याची नामुष्की ओढवली. पालकमंत्री जयकुमार गोरे, माजी आमदार राजेंद्र राऊत आणि अक्कलकोटचे आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी हा सारा राजकीय खेळ केल्याचे मानले जात आहे. आता येथे केशव दौलतराव बनगर (राष्ट्रवादी शप), राजेंद्र राऊत (भाजप), नागेश हरिभाऊ बाबराव (अपक्ष), जीवन उत्तमराव जानकर (अपक्ष), धनंजय महादेव डिकळे (अपक्ष), महेश देवीदास साठे (अपक्ष), रमेश नागनाथ बारस्कर (अपक्ष) हे रिंगणात आहेत
.राजेंद्र राऊत (भाजप)
आदित्य फतेपूरकर (काँग्रेस)
वसंत नाना देशमुख (राष्ट्रवादी काँग्रेस – श. प. गट) – मविआ बंडखोर
नागेश अक्कलकोट (शिवसेना – ठाकरे गट) – मविआ
: प्रशांत परिचारक (भाजप)
सोलापूर मतदार संघात एकूण मते ६१७ भाजप – ३०४
शिवसेना – ७६
राष्ट्रवादी – ४८ असे भक्कम प्राबल्य निर्माण आहे.
2 अहिल्यानगर
प्राजक्त तनपुरे (भाजप)
करण ससाणे (काँग्रेस)
: कै. अरुणकाका जगताप (राष्ट्रवादी)
अहिल्यानगरमध्ये एकूण मते – ४५२
भाजप – २०७
शिवसेना – ४४
राष्ट्रवादी – ६४
3 ठाणे
रविंद्र फाटक (शिवसेना)
अभिजित पवार (राष्ट्रवादी काँग्रेस – श. प. गट)
: रवींद्र फाटक (शिवसेना)
ठाणे मतदारसंघांमध्ये एकूण मते – ९९७
भाजप – ४३१
शिवसेना – ३०९
राष्ट्रवादी – १८
4 जळगाव
नंदकिशोर महाजन (भाजप)
शरद तायडे (शिवसेना – ठाकरे गट)
रेश्मा काळे (शिवसेना),
दीपक धांडे (शिवसेना) – महायुती बंडखोर
: चंदूभाई पटेल (भाजप)
जळगाव मतदार संघ एकूण मते – ६६७
भाजप – २७४
शिवसेना – २०८
राष्ट्रवादी – ५५
5 सातारा – सांगली
धैर्यशील कदम (भाजप)
बाळासाहेब पाटील (राष्ट्रवादी काँग्रेस – श. प. गट)
संजय मेंढे, मयूर पाटील (काँग्रेस) – मविआ
: मोहनराव कदम (काँग्रेस)
सांगली सातारा मतदारसंघ एकूण मते – ८९८
भाजप – ३७१
शिवसेना – ११०
राष्ट्रवादी – १४५
6 नांदेड
अमरनाथ राजूरकर (भाजप)
रामदास सुमठाणकर (काँग्रेस)
प्रवीण चिखलीकर (राष्ट्रवादी काँग्रेस) – महायुती बंडखोर
माधव जवळकर (काँग्रेस) – मविआ बंडखोर
कृष्णा आष्टीकर (शिवसेना – ठाकरे गट) – मविआ बंडखोर
: अमर राजूरकर (काँग्रेस)
7 यवतमाळ
पुरेशी मते नसल्याने…’
यवतमाळ : उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी एक दिवस उरला असताना, यवतमाळ मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार साहेबराव कांबळे यांनी बुधवारी अचानक माघार घेतली. आता निवडणूक रिंगणात महायुतीचे उमेदवार दुष्यंत चतुर्वेदी, भाजपचे बंडखोर नितीन भुतडा व दोन अपक्ष उमेदवार आहे. ‘आमच्याजवळ आवश्यक मते नसल्याने अर्ज मागे घेतला,’ असे कांबळे यांनी सांगितले
.काँग्रेस पक्षातील कोणत्याही मोठ्या नेत्याला आपण उमेदवारी अर्ज मागे घेत असल्याची कल्पना कांबळे यांनी दिली नाही. कांबळे हे उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात गेले त्यावेळी शिवाजीराव मोघे, राहुल ठाकरे, जितेंद्र मोघे, प्रकाश जानकर व काँग्रेसचे इतर काही नेते त्यांची एका हॉटेलमध्ये वाट पाहत होते. या ठिकाणी त्यांची बैठक होणार होती. काही नेत्यांनी कांबळे यांच्या मोबाइलवर संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र, तो होऊ शकला नाही. काही वेळानंतर कांबळे यांनी माघार घेतल्याची बातमी आली आणि सर्वांनाच धक्का बसला.
दुष्यंत चतुर्वेदी (शिवसेना)
साहेबराव कांबळे (काँग्रेस)
नितिन भुतडा (भाजप),
साजिद बेग (राष्ट्रवादी काँग्रेस) – महायुती बंडखोर
: दुष्यंत चतुर्वेदी (शिवसेना)
यवतमाळ मतदारसंघात एकूण मते – ४४६
भाजप – १३५
शिवसेना – १०४
राष्ट्रवादी – २९
8 पुणे
विक्रम काकडे (राष्ट्रवादी काँग्रेस)
श्रीकांत पाटील (राष्ट्रवादी काँग्रेस – श. प. गट)
प्रदिप कंद (भाजप) – महायुती बंडखोर
सुनिल टिंगरे (राष्ट्रवादी काँग्रेस) बंडखोर
: अनिल भोसले (राष्ट्रवादी)
पुणे मतदार संघामध्ये एकूण मते – ८७८
भाजप – ३३५
शिवसेना – ८२
राष्ट्रवादी – ३७५
9 भंडारा – गोंदिया
अविनाश ब्राह्मणकर (भाजप)
प्रफुल अग्रवाल (काँग्रेस)
नरेश ईश्वरकर, दिलिप बनसोड (काँग्रेस) – मविआ
: परिणय फुके (भाजप)
भंडारा गोंदिया मतदार संघ एकूण मते – ४३६
भाजप – १९६
शिवसेना – १५
राष्ट्रवादी – ८३
10 कोकण
अनिकेत तटकरे (राष्ट्रवादी काँग्रेस)
बाळ माने (शिवसेना – ठाकरे गट)
जुईली दळवी (शिवसेना) – महायुती बंडखोर
रायगड-रत्नागिरी-सिंधुदुर्ग: अनिकेत तटकरे (राष्ट्रवादी)
रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग एकूण मते – ८२३
भाजप – २४१
शिवसेना – २७५
राष्ट्रवादी – १४९
11 नाशिक
बंडोबांना थंड करण्यासाठी
नाशिक : नाशिकमध्ये भाजपचे गणेश गीते आणि गोकुळ गीतेंच्या अर्जामुळे महायुतीसमोर आव्हान उभे ठाकले आहे. गीतेंसोबत मुंबईत रात्री उशिरापर्यंत जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांची बैठक सुरू होती.
नरेंद्र दराडे (शिवसेना)
उमेदवार नाही
गोकुळ गिते, गणेश गिते – महायुती बंडखोर
नरेंद्र दराडे (शिवसेना)
नाशिक मतदारसंघात एकूण मते – ६०३
भाजप – १८६
शिवसेना – १६१
राष्ट्रवादी – १०७
12 वर्धा-चंद्रपूर-गडचिरोली
अरूण लखानी (भाजप)
शैलेश अग्रवाल (काँग्रेस)
: रामदास आलोटकर (भाजप)
वर्धा चंद्रपूर गोंदिया- एकूण मते – २६४
भाजप – १४९
शिवसेना – १
राष्ट्रवादी – १५
13 अमरावती
विदर्भातील एक महत्त्वाचा मतदार संघ म्हणून या मतदारसंघाची ओळख असून बदललेल्या राजकीय परिस्थितीनुसार पूर्वी आपल्या ताब्यात असलेली ही जागा राखण्यासाठी प्रवीण पोते (भाजप) हे पुन्हा मैदानात उतरलेले आहेत. पक्षीय बलाबलाचा विचार करता अत्यंत अटीतटीच्या लढती असून या मतदारसंघातील निकाल धक्कादायक लागण्याची शक्यता ही नाकारता येत नाही. हर्षदीप देशमुख (काँग्रेस) यांनी फार पूर्वीपासून या मतदारसघात गणित जुळवण्यास सुरुवात केली असून या मतदारसंघात त्यांची गोळाबेरीज महायुतीसाठी धोक्याची घंटा आहे.
अमरावती मतदारसंघात एकूण मते – ४४९
भाजप – १३६
शिवसेना – २३
राष्ट्रवादी – ८३
14 धाराशीव-बीड-लातूर
या मतदारसंघांमध्ये पूर्वीपासून भारतीय जनता पक्षाची ताकद असून या मतदारसंघातील आपले प्राबल्य अबाधित राखण्यासाठी महायुती तर्फे बसवराज पाटील (भाजप) यांना संधी देण्यात आली आहे. मुळात एकतर्फी असलेल्या या लढतीत महेश देशमुख (काँग्रेस) यांनी लढण्याचा निर्णय घेतला असला तरी सुद्धा त्यांच्या पदरी फारशी यश येण्याची शक्यता नाही. भाजपला सुरेश धस (भाजप) यांची ही जागा पुन्हा मिळवण्यात यश मिळेल अशी शक्यता आहे
धाराशिव लातूर बीड मतदार संघात एकूण मते – ९०४
भाजप – ३७९
शिवसेना – ८०
राष्ट्रवादी – २०२
15 परभणी – हिंगोली
या मतदारसंघांमध्ये शिवसेना शिवसेना पक्षाकडून सर्ईद खान (शिवसेना) निष्ठावान कार्यकर्ता म्हणून संधी देण्यात आली आहे. विवेक नावंदर (शिवसेना – ठाकरे गट) यांची थेट लढत होणार असली तरी सुद्धा माजी आमदार विप्लव बाजोरिया (शिवसेना) यांची भूमिका या मतदारसंघांमध्ये महत्त्वाची असून त्यांनी थेट विरोधात भूमिका घेतल्यास या मतदारसंघांमध्ये महायुतीची गणिते बिघडण्यास मदत होणार आहे. विजय जामकर, संग्राम जामकर (राष्ट्रवादी काँग्रेस) – महायुती बंडखोर यांचे बंडसमले असले तरीसुद्धा माहितीच्या उमेदवाराला मदत झाली तरच या मतदारसंघांमध्ये महायुतीचा विजय शक्य आहे अन्यथा महाविकास आघाडीचे उमेदवार विजयी होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
परभणी हिंगोली मतदारसंघात एकूण मते – ४७३
भाजप – १११
शिवसेना – ७४
राष्ट्रवादी – १२३
16 संभाजीनगर – जालना
पारंपारिक पणे या भागामध्ये शिवसेनेची विधानपरिषदेची जागा यंदा सुहास शिरसाट (भाजप) यांच्यामार्फत मित्रपक्ष असलेल्या भारतीय जनता पक्षाकडे गेली असल्याने स्थानिक पातळीवर बंडाचे निशाण फडकवण्यात आले होते. मित्रपक्ष असलेलेसमीर सत्तार (शिवसेना) – महायुती बंडखोर यांचे बंडाचे निशान थंडावले असल्याने ही जागा महायुतीच्या पदरात सहज जाण्याची चित्रे निर्माण झाली आहेत. आपली जागा कायम राखण्यासाठी देवयानी डोणगावकर (शिवसेना – ठाकरे गट) मैदानात उमेदवार उभा केला आहे परंतु पक्षीय बलाबल पाहता महायुतीचा विजय सुकर आहे.
छत्रपती संभाजी नगर – जालना मतदार संघामध्ये एकूण मते – ६४६
भाजप – २५४
शिवसेना – १३९
राष्ट्रवादी – ८६
17 नागपूर
राजीव पोतदार (भाजप) व अतुल लोंढे (काँग्रेस) मधील लढत असून पूर्वी या जागेवर विजयी झालेल्या चंद्रशेखर बावनकुळे (भाजप) यांची पक्षाची जागा कायम राखण्यात यश येण्याची शक्यता आहे.
नागपूर मतदार संघात एकूण मते – ७९४
भाजप – ५०१
शिवसेना – ३०
राष्ट्रवादी – ५













