भेंडवळची भविष्यवाणी शेतकऱ्यांसाठी आनंद अन् चिंतेची बातमी समोर; यंदा पाऊस कधी? कोणत्या पिकाला भाव कोणावर संकट?

0

शेतकरी ३७० वर्षांपासून ज्या क्षणाची आतुरतेने वाट पाहत असतात, ती भेंडवळची घटमांडणी अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर पार पडली. चंद्रभान महाराजांचे वंशज पुंजाजी महाराज आणि सारंगधर महाराज यांनी आज सूर्योदयाच्या वेळी या मांडणीचे निष्कर्ष जाहीर केले. यंदा पाऊस पाणी कसा राहणार? पिकाला भाव मिळणार का? कोणत्या पिकावर रोगराई येणार? अतिवृष्टी होणार का? या सर्व प्रश्नांचे उत्तर देणारी भेंडवळची घटमांडणी आज जाहीर झाली. यंदाच्या भाकितानुसार पावसाची स्थिती संमिश्र राहणार असून, शेतकऱ्यांसाठी आनंदासोबतच चिंतेची बातमी समोर आली आहे.

पाऊस कधी बरसणार आणि कधी झोडपणार?

अधिक वाचा  IPL 2026 गाजवणाऱ्या वैभव सूर्यवंशीनं Tata Sierra कारसह ५ पुरस्कार जिंकले मूर्ती लहान, कीर्ती महान! 

यंदाच्या भेंडवळाच्या घटमांडणीच्या भाकितानुसार पावसाची स्थिती चढ-उताराची राहणार आहे. पावसाचे चार महिने कसे असतील, याची माहितीही समोर आली आहे पावसाचा पहिला महिना अत्यंत कमी पावसाचा असेल. यामुळे सुरुवातीच्या पेरण्यांना विलंब होऊ शकतो किंवा दुबार पेरणीचे संकट ओढवू शकते. दुसऱ्या महिन्यात पाऊस साधारण स्वरूपाचा राहील, ज्यामुळे पिकांना उभारी मिळेल.

पण तिसरा महिला हा सर्वात घातक ठरु शकतो. या महिन्यात जलप्रलय होण्याची शक्यता आहे. या काळात अतिवृष्टी होण्याची शक्यता असून नद्यांना महापूर येण्याचे संकेत आहेत. यामुळे पिकांचे मोठे नुकसान होऊ शकते. यानंतर चौथ्या महिन्यातही पावसाची उपस्थिती असेल, मात्र तो काढणीला आलेल्या पिकांसाठी अडथळा ठरू शकतो. यंदा अवकाळीचा मोठा तडाखा पाहायला मिळणार आहे. यंदा पावसाळ्याव्यतिरिक्त अवकाळी पाऊस भरपूर असेल, ज्यामुळे वर्षभर शेतीकामात व्यत्यय येईल.

अधिक वाचा  ‘सरकारचे जरांगे पाटलांकडून ब्लॅकमेलिंग, सरकार गेल्या 3 वर्षांपासून दबावापुढे गुडघे टेकताना दिसत आहे ‘ आता कुणबी सेना मैदानात

कोणत्या पिकावर रोगराई येणार?

यंदा पिकांवर रोगराईचे प्रमाण जास्त राहणार असल्याचे भाकीत भेंडवळीच्या भाकितात वर्तवण्यात आले आहे. यंदा कापूस पीक साधारण येईल, मात्र त्याला बाजारभाव चांगला मिळेल. तिळाचे पीक यंदा उत्तम राहील. तूर पिकाची स्थिती अनिश्चित असेल. मूग साधारण येईल, पण भाव चांगले राहतील. उडीद आणि अंबाडीवर रोगराईचा मोठा प्रादुर्भाव दिसेल. बाजरीचे पीक चांगले येईल. ज्वारीचे पीक साधारण असले तरी त्याचे बाजारभाव वाढलेले राहतील. गहू, हरभरा, वाटाणा, मटकी आणि मसूर ही पिके सर्वसाधारण सरासरी राहतील.

दरम्याना एकूणच भेंडवळच्या भाकितानुसार यंदाचा हंगाम शेतकऱ्यांसाठी कसोटीचा ठरणार असल्याचे पाहायला मिळत आहे. अतिवृष्टी आणि रोगराई या दोन संकटांशी झुंज देत शेतकऱ्याला शेती करावी लागेल. या काळात चारा-पाण्याची टंचाई भासणार नाही. हाच मोठा दिलासा असेल, असे संकेत या मांडणीतून मिळताना दिसत आहे.

अधिक वाचा  मनोज जरांगे निर्णयावर ठाम, सरकारला दिला शेवटचा इशारा