पुण्यात IT इंजिनिअर तरुणीचा BF कडून घात आळीपाळीने सामूहिक अत्याचार, धमकी देत आरोपीनं ३० लाख उकळले

0
1

पुण्यातील काळेपडळ पोलीस ठाण्याच्या हद्दीत एक धक्कादायक प्रकरण उघडकीस आलं आहे. इथं एका आयटी कंपनीत काम करणाऱ्या इंजिनिअर तरुणीवर सामूहिक अत्याचार करण्यात आला आहे. पीडित तरुणीच्या प्रियकराने आधी कारमध्ये तरुणीवर लैंगिक अत्याचार केला, यानंतर त्याने आपल्या काही मित्रांना फोन करून बोलावलं, यानंतर चारही जणांनी पीडितेवर आळीपाळीने सामूहिक अत्याचार केला आहे. या प्रकरणी काळेपडळ पोलीस ठाण्यात प्रियकर तमीम हरसल्ला खानसह त्याच्या तीन मित्रांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेचा अधिक तपास पोलीस करत आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, पीडित तरुणी ही कर्नाटक राज्यातील असून ती पुण्यातील एका नामांकित कंपनीत आयटी इंजिनिअर म्हणून काम करते. २०२१ मध्ये फेसबुकवर तिची ओळख आरोपी तमीमशी झाली होती. कालांतराने या ओळखीचं रुपांतर प्रेमात झालं. आरोपीनं लग्नाचं आमिष दाखवत पीडितेला जाळ्यात ओढलं. यातून पीडित तरुणी आरोपीला भेटण्यासाठी मुंबईतील कांदिवली परिसरात आली.

अधिक वाचा  पुण्यात १४ वर्षात नदीची वहन क्षमता घटल्याने पुराचा धोका ४०% नी वाढला

दोघंही इथं एका हॉटेलमध्ये राहिले. यावेळी आरोपीनं पीडितेच्या शीतपेयात गुंगीच्या गोळ्या टाकल्या. तरुणीला गुंगी चढल्यानंतर आरोपीनं तिच्याशी जबदस्ती करत तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. यानंतर तो कारने पीडितेला पुण्याला घेऊन गेला. इथंही त्यांनी पीडितेवर अत्याचार केला. तमीमने कारमध्ये पीडितेवर अत्याचार केल्यानंतर त्याने फोन करून त्याच्या इतर तीन मित्रांना देखील बोलावून घेतलं.

यानंतर चारही जणांनी आळीपाळीने तरुणीवर अनैसर्गिक लैंगिक अत्याचार केला. नराधम आरोपी एवढ्यावरच थांबले नाही, तर त्यांनी पीडित तरुणीचे अश्लील फोटो काढले. हेच फोटो व्हायरल करण्याची धमकी देत आरोपीनं पीडितेकडून तब्बल ३० लाख रुपये उकळले. तसेच त्यांनी पीडितेकडून दोन आयफोन देखील घेतले. मागील अनेक महिन्यांपासून हे ब्लॅकमेलिंक सुरू होतं. आरोपींच्या त्रासाला कंटाळून अखेर पीडितेनं पुण्यातील काळेपडळ पोलीस ठाण्यात धाव घेतली. पोलिसांनी विविध कलमांतर्गत मुख्य आरोपी प्रियकर तमीम खान याच्यासह त्याच्या तीन मित्रांवर गुन्हा दाखल केला आहे. हे प्रकरण मुंबईच्या कांदिवली परिसरात घडल्याने हे प्रकरण कांदिवली पोलिसांकडे वर्ग करण्यात येणार आहे.

अधिक वाचा  आता ओबीसी आक्रमक सरकारने दोन आदेश लागू केले या निर्णयाचा अभ्यास करूनच लढाईची दिशा – भुजबळ