बुलढाण्यात अपघात असा? जवान हादरले, टायर फुटला, डिझेल टाकीचा स्फोट फक्त कोळसा उरला

0
2

बुलढाण्यात एका प्रवासी बसचा भीषण अपघात झाला आहे. या अपघातात 25 प्रवाशांचा जागीच मृत्यू झालाय. तर यामधील आठ प्रवाशी सुखरुप बचावले आहेत. ही प्रवासी बस नागपूरहून पुण्याला निघाली होती. त्यावेळी ही भीषण घटना घडली. दरम्यान, या अपघातानंतर सुखरुप बाहेर पडलेल्या प्रवाशांनी अपघाताचा थरार सांगितला आहे. 19 आणि 20 नंबरच्या सीटवर बसलेल्या दोन प्रवाशांनी या अपघाताची माहिती सांगितली आहे.

बसची वरची खिडकी तोडली आणि बाहेर पडलो
नागपूरहून औरंगाबादकडे निघालेला काही प्रवाशांनी घडलेल्या या अपघाताचा थरार सांगितला. आम्ही रात्री जेवण करुन बसमध्ये बसलो होतो. त्यानंतर साधारण अर्ध्या तासानं बस रस्त्याच्या दुभाजकाला धडकली. त्यानंतर ही बस पलटी झाली. पलटी झाल्यानंतर लगेच बसने पेट घेतल्याची माहिती बसमधील प्रवाशांनी दिली. आम्ही 19 आणि 20 नंबरच्या सीटवर बसलो होतो. बस पलटी झाल्यानंतर आम्ही खाली पडलो, त्यानंतर आम्ही बसची वरची खिडकी तोडली आणि त्यातून बाहेर पडल्याचे प्रवाशांनी सांगितले.

आग एवढी भयंकर लागली होती की…
बस पलटी झाल्यानंतर लगेच बसला आग लागली. त्यानंतर टायरही फुटल्याची माहिती प्रवाशांनी सांगितली. परत डिझेलच्या टाकीचा मोठा स्फोट झाल्याचे प्रवाशांनी सांगितले. अपघात झाल्यानंतर लगेच घटनास्थळी पोलीस आले. त्यानंतर अग्निशामक दलाच्या गाड्यादेखील दाखल झाल्या. पण आग एवढी भयंकर लागली होती की, काही वेळातच संपूर्ण बसने पेट घेतल्याची माहिती प्रवाशांनी सांगितली.

अधिक वाचा  संविधानाच्या माध्यमातून पंचशीलेला कायद्याचे अधिष्ठान प्राप्त झाले आहे – विनोद मोरे

पोलीस अधिकारी काय म्हणाले
साधारण रात्री दोन वाजण्याच्या सुमारास या बसचा अपघात झाला. यामध्ये 33 प्रवाशी होते. यातील 25 प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला. तर आठ प्रवाशी बचावले आहेत. पलटी झाल्यानंतर बसने पेट घेतला. त्यामुळं आतील प्रवाशांना बाहेर पडता आलं नाही, त्यांचा जागीच मृत्यू झाल्याचे पोलिसांनी सांगितले. बस पलटी झाल्यानंतर टायर फुटल्याची माहिती ड्रायव्हरने दिली आहे. त्यानंतर डीझेल टँकला धडक बसली त्यानंतर टँक फुटल्याने बसने पेट घेतला. त्यानंतर काचा फोडून काही प्रवासी बाहेर पडल्याचे पोलिसांनी सांगितले. जिथून रस्ता मिळाला तेथून प्रवासी बाहेर पडले. मृतांमध्ये लहान मुलांचाही समावेश असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. बसच्या कॅबिनमध्ये दोन ड्रायव्हर होते. त्यातील एक जण झोपला होता. तर दुसरा ड्रायव्हर गाडी चालवत होता. यातील एक ड्रायव्हर बचावला आहे, तर एक ड्रायव्हरचा जागीच मृत्यू झाल्याची माहिती मिळाली आहे.

नागपूरहून पुण्याला जाणाऱ्या खासगी बसचा मध्यरात्री भीषण अपघात झाला. समृद्धी महामार्गावर पिंपळखुटा येथे डिव्हायडरवर आदळल्याने ही बस पलटी झाली. त्यानंतर या बसला भीषण आग लागली. या आगीत बसमधील 25 प्रवाशांचा जागीच होरपळून मृत्यू झाला. तर चालकासह आठ जणांचे प्राण वाचले आहेत. हे आठही जण जखमी झाले असून त्यांच्यावर उपाचर सुरू आहेत. हा अपघात अत्यंत भीषण होता. त्यामुळे सर्वच हादरून गेले आहेत. हा अपघात इतका भीषण होता की मृतांची ओळखही पटणं मुश्किल झालं आहे.

अधिक वाचा  मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण मागे घेतलं मराठे पुन्हा तहात हरले? शासन निर्णयावर कोण कोण काय म्हणालं?

विदर्भ ट्रॅव्हल्सची ही बस होती. नागपूरहून ही बस पुण्याकडे जायला निघाली होती. मध्यरात्री 1 ते 1.30च्या सुमारास समृद्धी महामार्गावरील पिंपळखुटा येथे बस डिव्हायडरला धडकली. त्यामुळे बस पलटी झाली. बस पलटी झाल्याने दरवाजाही तुटला. त्यामुळे प्रवाशांना दरवाजातून बाहेर पडणं मुश्किल झालं. तितक्यात बसने पेट घेतला. त्यामुळे सर्वच प्रवाशी हादरून गेले. प्रवाशांनी एकच टाहो फोडला. त्यातच आग लागल्याने प्रवाशांनी जीव वाचवण्यसााठी जीवाच्या आकांताने आक्रोश केला. पण त्यांना कुणीही वाचवू शकले नाही.

जवानही हादरले
अग्निशमन दलाच्या जवानांनी तात्काळ घटनास्थळी येऊन आग विझवली. त्यानतंर बसमधील दृश्य पाहून अग्निशमन दलाचे जवानही हादरून गेले. बसमध्ये 25 प्रवाशांचे मृतदेह पडलेले होते. सर्व मृतदेह जळालेले होते. अनेक मृतदेह अर्धवट अवस्थेत जळालेले होते. कुणाचाही मृतदेह ओळखता येत नव्हता. त्यानंतर जवानांनी एक एक मृतदेह बाहेर काढून त्यांच्यावर चादर टाकली. बस पलटी झाली तेव्हा चालक आणि काही प्रवाशांनी बसच्या खिडक्या फोडल्या आणि बसमधून बाहेर पडले. त्यामुळे एकूण 8 जणांचे प्राण वाचले आहेत. तर बाकीचे सर्व प्रवासी आगीच्या भक्ष्यस्थानी पडले.

अधिक वाचा  भाजपकडून राजकीय सोयीसाठी प्रभागरचनेत नियमांचे उल्लंघन; काँग्रेस-राष्ट्रवादीचा संयुक्त पत्रकार परिषदेत आरोप

काहीच करू शकले नाही
आपल्यासमोरच बस पेटलेली असताना आणि प्रवासी होरपळून मरत असताना चालक आणि वाचलेले इतर प्रवासीही काहीच करू शकले नाहीत. कारण त्यांच्याकडे प्रवाशांना वाचवण्याची काहीच साधने नव्हती. त्यांनी पोलीस आणि अग्निशमन दलाला घटनास्थळी पाचारण केलं. पण तोपर्यंत संपूर्ण खेळ संपलेला होता. अग्निशमन दलाने तात्काळ ही आग नियंत्रणात आणली. त्यानंतर बसमधून मृतदेह बाहेर काढले. रात्रीची वेळ असल्याने मदत कार्यात अडथळा येत होता.

फक्त कोळसा उरला
बसचा अक्षरश: जळून कोळसा झाला आहे. बसच्या सर्वच सीट जळून खाक झाल्या आहेत. प्रवाशांचे सामानही जळून खाक झाल्याने काहीच उरलेलं नाही. घटनास्थळी फक्त कोळसा आणि कोळसाच उरला आहे. पोलिसांनी घटनास्थळी दाखल होऊन पंचनामा केला आहे. मृतदेहांची ओळख पटवून त्यांच्या कुटुंबीयांना कळवले जात आहे.