ऑपरेशन ‘कावेरी’ सुदानमध्ये अडकलेले 2100 भारतीय सुखरुप परतले!

0

सुदानमध्ये गेल्या पंधरा दिवसांपासून अंतर्गत यादवी सुरू आहे. त्यामुळं तिथं वास्तव्यास असलेल्या भारतीय नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळं सुदानमध्ये अडकलेल्या भारतीयांना परराष्ट्र खात्याकडून मायदेशी आणण्यासाठी ‘ ऑपरेशन कावेरी
राबवण्यात येत आहे. सूदानची राजधानी खार्तुमसह बऱ्याच ठिकाणी सुरु असलेला हिंसाचार सुदानमधील स्थिती अस्थिर बनवत आहे.

भारत सरकारच्या ऑपरेशन कावेरी अंतर्गत सुदानमध्ये अडकलेल्या भारतीय नागरिकांना सुखरुप मायदेशी परत आणण्याचे काम सध्या सुरु आहे. याचदरम्यान 231 नागरिकांना सुखरुप परत घेऊन भारतीय वायुसेनाचे विमान नवी दिल्लीत पोहचले. यासंदर्भातली माहिती परराष्ट्रमंत्री डॉ.एस जयशंकर यांनी ट्विट करत दिली आहे.

अधिक वाचा  महाराष्ट्राच्या सहकार चळवळीला नवे धोरणात्मक बळ?; स्वतंत्र राज्य सहकार धोरण अंतिम स्वरूप सादर होणार

तसेच इंडिगो एअरलाईन कंपनीने देखील म्हंटले की, ‘सुदानमधील अडकलेल्या भारतीय नागरिकांना सुखरुप परत आणण्यासाठी भारत सरकारच्या ऑपरेशन कावेरीला आमचा पूर्ण पाठिंबा आहे.तसेच तसेच आम्ही यांकरिता भारत सरकारला सर्वतोपरी मदत करु”असे आश्वासनही त्यांनी दिले आहे. पुढे बोलतांना त्यांनी सांगितले की, ‘आम्ही मानवी सुरक्षेच्या दृष्टीने पुढचं पाऊल उचललं आहे, त्यामुळे अडकलेल्या भारतीय नागरिकांना सुखरुप त्यांच्या घरी पोहचवता येईल’.

आतार्यंत 2, 100 भारतीय नागरिक मायदेशी..

भारतीय वायुदलाने 27 आणि 28 एप्रिल रोजी एक साहसी गोष्ट करुन दाखवली. ऑपरेशन कावेरी अंतर्गत वायुसेनेच्या c-120J या विमानाने एका छोट्या हवाईपट्टीत विमान लँड करत 121 भारतीय नागरिकांचे प्राण वाचवले. वायुसेनेकडून मिळालेल्या माहितीनुसार, या 121 लोकांमध्ये एका गर्भवती महिलेचा देखील समावेश होता. तसेच गुरुवारी 20 एप्रिल रोजी 135 भारतीय नागरिकांना घेऊन वायुसेनेचे IAF C-130J विमान परतले. तसेच 1600 भारतीय सुखरुप मायदेशी परतत्याची माहिती परराष्ट्र राज्यमंत्री वी. मुरलीधरन यांनी ट्विट करत दिली.

अधिक वाचा  समुद्रात चीनचा मोठा खेळ अमेरिकेच्या नाकावर टिच्चून ‘रिच स्टारी’ होर्मुज पार; अमेरिकेचे हे सर्वात मोठे अपयश

सुदानमध्ये गेल्या 15 दिवसांपासून लष्करी आणि निमलष्करी दलात मोठ्या प्रमाणात हिंसाचार सुरु आहे. या हिंसाचारात अनेक लोकांचे प्राण गेले आहेत. भारत सरकारकडून सुदानमधील भारतीय नागरिकांना परत आणण्यासाठी 24 एप्रिलपासून ऑपरेशन कावेरी राबवले जात आहे.