नववर्षालाच मुख्यमंत्री फडणवीसांचा गडचिरोली दौरा; जहाल माओवादी तारक्काचं फडणवीसांसमोर आत्मसमर्पण

0

गडचिरोली : गडचिरोलीमध्ये पोलिस अतिशय चांगले काम करत आहेत, या भागातला माओवाद्यांचा प्रभाव आपण संपवला आहे. आत्मसमर्पणामुळे नक्षलवाद्यांच कंबरडे तोडण्याचे काम झाले आहे, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले. आज ते गडचिरोली दौऱ्यावर होते. देवेंद्र फडणवीसांसमोर आठ पुरूष आणि तीन महिलाांनी आत्मसमर्पण केले. जहाल नक्षलवादी तारक्कांनी देखील त्यांच्यासमोर आत्मसमर्पण केले.

जहाल महिला माओवादी नेता तारक्काने आज गडचिरोलीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर आत्मसमर्पण केले आहे. तारक्का ही माओवाद्याच्या संघटनेचं देशभरातलं दुसऱ्या क्रमांकाचं नेतृत्व असलेल्या केंद्रीय समिती सदस्य भूपतीची पत्नी आहे. पश्चिम बंगालमध्ये चकमकीत ठार झालेला जहाल माओवादी नेता किशनजीची वहिनी आहे. तारक्का 1983 मध्ये माओवाद्यांच्या संघटनेत दाखल होणारी गडचिरोलीतली पहिली महिला माओवादी आहे.

अधिक वाचा  जैन बोर्डिंग होस्टेल व्यवहाराशी माझा काही संबंध नाही! माहिती न घेता चुकीचे आरोप मोहोळांचा कागदपत्रांसह खुलासा

माओवाद्याची भरती बंद : देवेंद्र फडणवीस

देवेंद्र फडणवीस म्हणाले. माओवाद्यांचा प्रभाव संपवून आम्ही गडचिरोली हा महाराष्ट्रातील पहिला जिल्हा बनविण्यास सुरुवात केली आहे. गडचिरोलीमध्ये एकेकाळी माओवाद्यांचे पूर्ण वर्चस्व होते. आज ते वर्चस्व आम्ही संपवत आहोत. येथे दोन मोठ्या चौक्या बांधल्या आहेत. आता इथे माओवाद्यांना नवीन लोक भेटत नाहीत. माओवाद्याची भरती बंद असून मोठ्या प्रमाणात शरणागती पत्करत आहेत, त्यामुळे ती संपुष्टात येत आहे.

उत्तर गडचिरोली माओवादापासून मुक्त : मुख्यमंत्री

आमच्या पोलिसांनी गडचिरोली जिल्ह्यात माओवाद हा संपुष्टात आणण्याचे काम केलं आहे. उत्तर गडचिरोली माओवादापासून मुक्त झाली असून दक्षिण देखील लवकरच मुक्त होईल. गेल्या 4 -5 वर्षात एकही जण माओवादामध्ये सहभागी झाले नाही. अनेक जहाल माओवाद्यांना कंठस्नान घालण्यात आले. अटक करण्यात आली . माओवादाचे कंबरडे मोडण्याचे काम झाले आहे, असे फडणवीस म्हणाले.

अधिक वाचा  कोथरूडला ऐन दिवाळीत ‘तात्काळ’ कारवाई धडाका?; भाजपाची एक तक्रार अन् पालिका प्रशासन तडफदार

गडचिरोलीच्या पोलीस दलाने महाराष्ट्राची मान अभिमानाने उंचावली : फडणवीस

फडणवीस,   गडचिरोलीच्या पोलीस दलाने महाराष्ट्राची मान अभिमानाने उंचावली आहे. हे सगळ्या पोलीस दलाचे यश आहे.जी काही मदत राज्य सरकार करत राहील,राज्याचा गृह विभाग उभा राहील. 2025 चा हा सूर्य उगवला आहे तो असाच राहिला पाहिजे. ज्यांनी आत्मसमर्पण केलं आहे त्यांचे योग्य काळजी घेतली जाईल.