नागपूर शहर परिसरात सोमवारी तणावाचे वातावरण झाले होते. काही भागात जाळपोळही करण्यात आला होता. या पार्श्वभूमीवर शहरातील काही शाळांनी विद्यार्थ्यांना सुटी दिली आहे. सोमवारी झालेल्या दंगलीच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय शाळा प्रशासनाकडून घेण्यात आला आहे. तसेच मुख्याध्यापकांनी स्थानिक स्थिती बघून निर्णय घ्यावेत, अशा सूचनाही जिल्हा प्रशासनाने दिल्या होत्या.






शाळांच्या ग्रुपवर सकाळी सुटीचे मेसेज टाकून शाळा प्रशासनाने विद्यार्थ्यांना सूचना दिली आहे. स्कूल बसेसच्या स्टॉपवर जाऊन विद्यार्थी परत आले. शिक्षकांसाठी शाळा सुरू ठेवण्यात आल्या आहेत. महाल परिसरातील कॉलेजेसनीदेखील विद्यार्थ्यांना वर्ग होणार नसल्याची सूचना दिली आहे.
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील खुलताबाद येथील औरंगजेबाची कबर हटविण्याच्या मागणीसाठी विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी सोमवारी सकाळी महाल येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात आंदोलन केले. या आंदोलनामध्ये मुस्लिम प्रतीकांचा अवमान केल्याचा आरोप करीत आंदोलकांविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची मागणी मुस्लिम समाजाच्या शिष्टमंडळाने पोलिसांकडे केली. अफवा पसरल्यामुळे सायंकाळी महाल येथे तणाव वाढला. चिटणीस पार्कजवळ काही असामाजिक तत्त्वांद्वारे जोरदार दगडफेक करण्यात आली. वाहनांची तोडफोड आणि जाळपोळ करण्यात आली. यात पोलिस, अग्निशमन दलाचे कर्मचारी जखमी झाले. जमाय पांगविण्यासाठी पोलिसांना अनुधुराच्या नळकांड्या फोडल्या, रात्री धरपकड सुरू आली.
काय घडले दिवसभरात?
- खुलताबाद येथील औरंगजेबाची कबर हटविण्याच्या मागणीसाठी विहिप बजरंग दलाचे सकाळी ११.३० वाजता आंदोलन झाले.
- आंदोलनात हिरव्या कापडात गुंडाळलेला औरंगजेबाचा पुतळा पेटविल्याचे विडीओ दुपारी व्हायरल झाले.
- दुपारी ३.३० ते ४ वाजतादरम्यान मुस्लिमांच्या शिष्टमंडळाने गणेशपेठ पोलिसठाण्यात प्रतीकांचा अवमान झाल्याचा आरोप करीत आंदोलकांविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची मागणी केली.
- सायंकाळी मुस्लिमांच्या पाचशे ते सहा जणांच्या शिष्टमंडळाने पुन्हा एकदा गणेशपेठ पोलिसवाणे गाठत संबंधितांविरुद्ध गुन्हे दाखल करण्याची मागणी केली.
- सायंकाळी ७ ते ७.३० वाजतादरम्यान महालातील गांधीगेटजवळ जमाव गोळा झाला.
- कुठलीही अनुचित घटना घडू नये म्हणून पोलिसांनी परिसरात बंदोबस्त
- रात्री ८ वाजताच्या सुमारास महाल भागातील चिटणीस पार्क येथे दगडफेक सुरू झाली
- रात्री ८.३० वाजता शिर्के गल्ली येथे वाहनांची तोडफोड करण्यात आली.
- रात्री ८.३० ते ९ दरम्यान शिकेगी चिटणीस पार्क पेचे जाळपोळ करण्यात अहली.
- जमाच पांगविण्यासाठी रात्री ९ ते ९.१५ वाजतादरम्यान पोलिसांनी अश्नुधुराच्या नळकांड्या फोडल्या
‘महाराष्ट्रामध्ये औरंगजेबाच्या कबरीचे उदात्तीकरण होऊ देणार नाही. तसा प्रयत्न कोणी केल्यास ते खपवून घेतले जाणार नाही,’ असा इशारा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी दिला. ‘खरेतर औरंगजेबाची कबर हवी कशाला, मात्र, भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण विभागाने त्याला ५० वर्षांपूर्वी संरक्षित स्थळ म्हणून घोषित केले. त्याचे संरक्षण करण्याची जबाबदारी केंद्र आणि राज्य सरकारवर आहे. हजारो लोकांना मारणाऱ्या औरंगजेबाच्या कबरीचे संरक्षण करावे लागते, हे दुर्दैव आहे,’ असे मुख्यमंत्री म्हणाले.













