.अखेर महाराष्ट्र एकीकरण समिती कोर्टाची लढाई जिंकली; ‘या’ प्रकरणी ८ कार्यकर्ते निर्दोष सुटले

0

बेळगाव : उचगाव येथील ‘महाराष्ट्र राज्य’ फलक प्रकरणामध्ये दाखल गुन्ह्यातून महाराष्ट्र एकीकरण समितीच्या आठ कार्यकर्त्यांची निर्दोष सुटका प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी चतुर्थ न्यायालयामध्ये (ता. १) झाली. जुलै २०१४ मध्ये हे प्रकरण घडले होते. याबाबत माहिती अशी की, उचगाव ग्रामपंचायत सचिव सद्याप्पा बसाप्पा तारेकर यांनी २८ जुलै २०१४ रोजी दिलेल्या फिर्यादीनुसार काकती पोलिस ठाण्यात आठ जणांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला. मनोहर लक्ष्मण होनगेकर, अरुण अप्पाजी जाधव, विवेक सुभाष गिरी, अनंत शंकर देसाई, संतोष गुंडू पाटील, गणपती शंकर पाटील, भास्कर कृष्णा कदम आणि राजेंद्र वसंत देसाई अशी त्यांची नावे आहेत.

अधिक वाचा  पद्मश्री नारायण सुर्वे काव्यजागर आणि सन्मान सोहळा संपन्न सुर्वे यांची कविता म्हणजे संस्कृतीचे सुगंधी पर्व! – डाॅ. श्रीपाल सबनीस

येळ्ळूरमधील महाराष्ट्र राज्य फलक जुलै २०१४ मध्ये हटविण्यात आला. त्याला विरोध व आक्षेप घेतल्यानंतर पोलिसांनी लाठीहल्ला केला. निष्पापांना बेदम मारहाण केली. त्यासाठी बेळगावसह सीमाभागात त्याचे पडसाद उमटले. उचगावला ‘महाराष्ट्र राज्य उचगाव’ असा फलक उचगाव बसथांब्याजवळ उभारला.

यामुळे कन्नड व मराठी भाषिकांमध्ये वाद आणि तेढ निर्माणचा प्रयत्न करण्यात आल्याचा आरोप करत गुन्हा दाखल केला. पोलिस अधिकारी आर. टी. लखमगौडर यांनी घटनेचा तपास करून दोषारोपपत्र दाखल केले. चौथ्या जेएमएफसी न्यायालयात साक्ष झाली. यात म. ए. समिती कार्यकर्त्यावरील गुन्हे सिद्ध झाले नाहीत. त्यासाठी सर्वांची निर्दोष सुटका करण्यात आली. महाराष्ट्र एकीकरण समिती कार्यकर्त्यांतर्फे ॲड. महेश बिर्जे, ॲड. एम. बी. बोंद्रे, ॲड. बाळासाहेब कागणकर आणि ॲड. वैभव कुट्रे यांनी काम पाहिले.

अधिक वाचा  मुळशीकरांचा एकजुटीचा निर्धार : मुळशीची बदनामी थांबवण्यासाठी लोकचळवळ उभारण्याचे आवाहन