कट्टरवादाचा शिरकाव कर्वेनगरमध्ये रोखण्यासाठी जनसेवेचं नातं! अन् विकासाचे लक्ष्य ‘तुतारी’ घेऊन मनीषाताई मैदानात

0

महाराष्ट्राचे आराध्य दैवत श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विचारांची प्रेरणा संसदरत्न खासदार सुप्रियाताई सुळे आणि महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या भक्कम साथीच्या जोरावर घेऊन राजमुद्रा प्रतिष्ठानची कडवट ‘शिवकन्या’ मनिषाताई विरेश शितोळे प्रभाग क्रमांक 30 (क) गटातून नाते जनसेवेचे कायम राखत परिसरातील नागरिकांच्या विकासाचे लक्ष्य गाठण्यासाठी ‘तुतारी’ निशाणी घेऊन पुणे महापालिकेच्या निवडणूक मैदानात उभी राहिली आहे. कर्वेनगर प्रभागातील एका विशिष्ट धाटणीच्या घराशी संगनमत करून एक अनोख ‘कट्टरवादा’च विद्रोही वादळ राज्यसत्ता मिळवण्यासाठी प्रभागात सक्रिय झालेले असताना जनरक्षणार्थ छत्रपती शिवाजी महाराजांची ही शिवकन्या शांती प्रगती आणि गती या पुरोगामी विचाराची ढाल घेऊन प्रभागाच्या शांततेसाठी पुणे महापालिकेच्या निवडणुकीमध्ये प्रभाग क्रमांक 30 क मधून ‘तुतारी’ला पसंती देण्याचे आव्हान करत आहे.

भारतरत्न महर्षी धोंडो केशव कर्वे यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या कर्वेनगरच्या पावन भूमीमध्ये ज्या कट्टरवादी अपप्रवृत्तीने भर रस्त्यावर अत्यंत विदारक मारहाण करून त्याचे चित्रण करण्याची गलिच्छ प्रवृत्ती सुरू केली. या एका घटनेमुळे मनीषाताई शितोळे यांच्या हळव्या मनाला वेदना आणि यातना झाल्या. छत्रपती शिवाजी महाराजांची ही शिवकन्या परिसराची शांतता आणि सुराज्य टिकाव या एकाच भावनेने या कट्टरवादी प्रवृत्तीचा नायनाट करण्यासाठी सक्रिय झाली. परिसरामध्ये सर्वत्र फक्त आणि फक्त आपल्या घरात सत्ता मिळावी या एकमेव विचाराची चर्चा आणि त्यासाठी गणिते यामध्ये गुंग असताना या शिवकन्येने मध्यरात्रीच संसदरत्न खासदार सुप्रियाताई सुळे आणि कामाचा वादा अशी जगजाहीर व्याख्या असलेल्या लाडके उपमुख्यमंत्री आणि लाडक्या बहिणींचे तारणहार अजितदादा पवार यांचे घर गाठले आणि परिस्थितीचं गांभीर्य समजावून सांगताच या शांतता प्रिय नेतृत्वाने मैत्रीपूर्ण लढतीत या शिवकन्येच्या हाती ‘तुतारी’ देऊन माता-भगिनीच्या रक्षणासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

अधिक वाचा  पुणेकरांच्या वाहनांना नवी ओळख! आता ‘एमएच ६१’; ‘एमएच १२ वन ए’च्या पर्यायावर विचार करु सध्या काही तांत्रिक अडचणी काय?

प्रभाग क्रमांक 30 कर्वेनगर हिंगणी होम कॉलनी परिसरातील उच्चभ्रू लोकांप्रमाणेच परिसरातील जीवाभावाच्या बांधवांकडूनही मनीषाताई शितोळे यांच्या या अनोख्या भूमिकेचे स्वागत केले आहे. परिसरातील श्रीमान सोसायटी, कर्वेनगर गल्ली नंबर 1 ते 10, मावळे आळी, वनदेवी टेकडी परिसर, कर्वेनगर गावठाण, आकाशनगर, कॅनल रोड परिसर, शाहू कॉलनी, काकडी सिटी, न्यू कोपरे पुनर्वसन, भालेकर वस्ती, दुधाने नगर, भारत कॉलनी, राजाराम पूल परिसर, हिंगणे होम कॉलनी भागात कट्टरवाद रोखा विकासा ची दारे ठोका! सुप्त लाट सुरू झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अधिकृत उमेदवार शिवकन्या मनिषाताई विरेश शितोळे यांच्यासाठी जनसमुदाय एकवटू लागला आहे.

अधिक वाचा  महाराष्ट्रात खळबळ माजी महामंत्र्यांची भाजपमधून हकालपट्टी, आगामी निवडणुकांवर परिणाम होणार मुंबईत डॅमेज कंट्रोल सुरू

कर्वेनगर 12 वर्षापासून विविध समाजातील सर्व स्थरात नागरीकांना विविध लोकोपयोगी उपक्रमातून राजमुद्रा प्रतिष्ठानच्या मार्फत सामाजिक लोकाभिमुख कार्य करणाऱ्या वीरेश शितोळे यांची ‘धर्मपत्नी’ यासाठी पुढे सरसावल्याने मतदारांचा वाढता प्रतिसाद प्रचारामध्ये वेगळाच उत्साह निर्माण करत आहे. ‘उतु नका मातु नका, घेतला वसा टाकु नका’ या तत्वाने नेहमी नम्रतेची, प्रेमाची व आपुलकीची भावना जपत वीरेश शितोळे मित्र परिवाराच्या वतीने यांनी केलेले कार्य या प्रचाराच्या दरम्यान मदतीस येत आहे. जिथे अन्याय तिथे हा सच्चा कार्यकर्ता म्हणून जनहितार्थ तुटून पडताना आजपर्यंत नागरिकांनी पाहिले आहे. 12 वर्ष केलेल्या कामाच्या भरोशावर घरोघरी मत देण्याचे आव्हान करत त्यांच्या प्रचाराचा शुभारंभ झाला आहे. वचन सामाजिक बांधिलकीचे… राजकारणाच्या पलिकडचे” या भूमिकेतून सुरू झालेला प्रचार जनमाणसात चर्चेचा विषय बनला आहे.

प्रभाग 30 : सुराज्याच्या नियोजित विकास योजना:- 

  • नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी सी.सी.टी.व्ही. कॅमेरे बसवणार.
  • पुनर्विकासाच्या धरतीवर झोपडपट्टीचा स्वयंपुनर्विकास करणार.
  • सोसायट्यांमध्ये महानगरपालिकेच्या माध्यमातून सुशोभीकरण करणार.
  • ज्येष्ठ नागरिकांसाठी विरंगुळा केंद्र उभे करणार.
  • स्त्री व पुरुषांसाठी शौचालय बांधणार.
  • यू.पी.एस.सी., एम.पी.एस.सी. विद्यार्थ्यांसाठी पूर्ण वेळ अभ्यासिका बांधणार.
  • खेळाच्या मैदानांचे सुशोभीकरण करणार व खेळाडूंना प्रोत्साहन देणार.
  • महिला व मुलींसाठी निर्भया केंद्र सुरु करणार.
  • बालकांसाठी पाळणाघराची उभारणी करणार.
  • व्यसनमुक्ती केंद्र सुरू करणार.
  • ज्येष्ठ नागरिकांसाठी दरमहा जीवनावश्यक वस्तूचे किट वाटप करणार.
  • सार्वजनिक ठिकाणी स्वच्छता अभियान राबविले जातील.
  • वाहतूक, पाणी, वीज, कचरा समस्या सोडवण्यासाठी सतत प्रयन्न केला जाईल.
  • नागरिकांसाठी कौटुंबिक सल्ला केंद्र उभारले जाईल.
  • शाळा महाविद्यालय या ठिकाणी मुला मुलींच्या सुरक्षेसाठी मदत केंद्र उभारले जाईल.
  • छोट्या व्यवसायिकांचे पुनर्वसन करणार.
  • धार्मिक स्थळांचे नूतनीकरण व सुशोभीकरण करणार.
  • मुला मुलींसाठी रोजगार मेळावे घेणार.
  • वृद्धांसाठी मोफत औषधे व उपचार केंद्र सुरू करणार.
  • महिला बचत गटांना प्रोत्साहन देऊन स्वतःचा व्यवसाय सुरु करण्यासाठी महिलांना सहकार्य करणार.
  • मुला-मुलींसाठी अभ्यासिका व व्यवसाय प्रशिक्षण सुरु करणार.
अधिक वाचा  दोन अनाथ विद्यार्थिनींना कोंडलं, Whatsapp Status अन्… रात्रभर पुण्यात राडा; काँग्रेस-भाजपामध्ये नेमकं घडलं काय? A To Z माहिती