शेतकरी कर्जमाफी कृषीमंत्र्यांचं पुन्हा मोठं वक्तव्य; 2019मध्ये हे झालं हे सत्यचं! यामुळ मुख्यमंत्र्यांची एक कमिटी सक्रिय

0

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारकडून लवकरच राज्यात शेतकरी कर्जमाफीची घोषणा केली जाणार आहे. 30 जूनच्या आधी राज्यात शेतकरी कर्जमाफीची घोषणा केली जाईल, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. शेतकरी कर्जमाफीची गेल्या अनेक दिवसांपासून मागणी आहे. विशेष म्हणजे 2024 च्या विधानसभा निवडणुकीवेळीच भाजपकडून कर्जमाफीचं आश्वासन देण्यात आलेलं होतं. पण अद्याप कर्जमाफी जाहीर झालेली नाही. शेतकरी कर्जमाफी नेमकी कशी करावी, त्याचे निकष कसे असावेत, याचा अभ्यास करण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी एक कमिटी नेमली आहे. या कमिटीचा अहवाल समोर आल्यानंतर मुख्यमंत्र्यांकडून कर्जमाफी केली जाईल, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं होतं.

अधिक वाचा  “हा लढा स्त्रीत्वाच्या सन्मानाचा”; असभ्य आणि अश्लील भाषेत आरोप रुपालीताईचा लढा सुरू खरात प्रकरणी टीका कोर्टात खेचलं

यानंतर राज्यात सध्या विधान परिषदेची निवडणुकीची आचारसंहिता सुरु आहे. या आचारसंहितेमुळे राज्य सरकारला शेतकरी कर्जमाफीची घोषणा करता येत नाहीय, अशी चर्चा आहे. पण ही कर्जमाफी जाहीर झाली नसली तरी तिच्या एका अटीची सध्या चांगलीच चर्चा आहे. या अटीवरुन राजकीय घमासान रंगलं आहे. विशेष म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी संबंधित अट रद्द करावी यासाठी तीन दिवस पंढरपुरात उपोषण केलं.

यानंतर रोहित पवार आणि शेतकरी नेत्यांच्या शिष्टमंडळाची मुख्यमंत्र्यांसोबत बैठक होणार आहे. राज्य विधी मंडळाचं पावसाळी अधिवेशन येत्या 22 जूनपासून सुरु होणार आहे. त्याआधी याबाबत बैठक घेऊन निर्णय होईल, अशी चर्चा आहे. दरम्यान, शेतकरी कर्जमाफीबाबत राज्याचे कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी सूचक वक्तव्य केलं आहे.

अधिक वाचा  पवनराजे निंबाळकर हत्याकांड थेट निकाल 20 जूनला धक्कादायक कारण “निकाल तयार करण्यास आणखी….

दत्तात्रय भरणे नेमकं काय म्हणाले?

“दोन लाखांपेक्षा जास्त थकबाकी आहे, एखाद्या शेतकऱ्याचं अडीच लाख कर्ज असेल तर या शेतकऱ्याने वरचे 50 हजार रुपये भरले तर 2 लाखांचे कर्ज यावर्षाच्या कर्जमाफीची घोषणा केल्यानंतर माफ होईल”, अशी माहिती कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली.

“2019 च्या कर्जमाफीत जर एखाद्याचे कर्ज 2 लाखांपेक्षा 10 हजार, 20 हजार जास्त असेल तर त्याला कर्जमाफीत भाग घेता येत नव्हता. त्यांना कर्जमाफीचा लाभ मिळाला नाही. ते आजही 2019 मुळे वंचित राहत आहेत, त्या शेतकऱ्यांसाठी काय करता येईल याबाबत निर्णय जाहीर होतील. आचारसंहिता असल्यामुळे मला जास्त बोलता येणार नाही. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस याबाबत निश्चितपणे निर्णय घेतील”, अशी प्रतिक्रिया दत्तात्रय भरणे यांनी दिली.

अधिक वाचा  मंत्रालयीन प्रशासन अधिक गतिमान सरकारचा मोठा निर्णय!; सध्याच्या विभागांचे ४५ विभागांत रूपांतर