याबद्दल महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट कर्मचारी सेनेच्या कार्याध्यक्षा शालिनी ठाकरे म्हणाल्या, “फुले चित्रपटाच्या टीमने राज ठाकरेंची भेट घेतली. चित्रपटात खरा इतिहास दाखवला असेल तर काहीच बदल करायची गरज नाही. बिनधास्त चित्रपट प्रदर्शित करा. फुलेंच्या जयंतीदिनीच हा चित्रपट प्रदर्शित व्हायला हवा होता, असंदेखील राज ठाकरेंनी म्हटलंय. यात कोणत्याही जातीचं राजकारण नाही. महापुरुषांना जातीच्या राजकारणात का आणत आहात असा राज ठाकरे यांचा प्रश्न आहे. महाराष्ट्रात अनेक मोठे विषय आहेत. असे इतर विषय घेऊन त्या मुख्य विषयांना बगल देण्याचं काम केलं जात आहे.”






राष्ट्रीय पुरस्कार विजेते अनंत महादेवन यांनी या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे. ज्योतिबा फुले यांच्या भूमिकेत ‘स्कॅम 1992’ फेम प्रतीक गांधी आणि सावित्रीबाई फुले यांच्या भूमिकेत अभिनेत्री पत्रलेखा झळकणार आहेत.











