महायुती सरकारने विधानसभा निवडणुकीच्या प्रचारावेळी शेतकऱ्यांना कर्जमाफीच आश्वासन दिलं होतं. असं म्हसळेकरांनी आरोप केला. पण निवडणूक जिंकल्यानंतर सरकारला आश्वासनाचा विसर पडला. आजही महाराष्ट्रातील हजारो शेतकरी बँक आणि सावकारांच्या कर्जाच्या ओझ्याखाली दबलेले आहेत. पण सरकारची प्राथमिकता दुसरीच आहे असं म्हसळेकरने आरोप केला.






झाडावर चढून प्रदर्शन
कारभारी म्हसळेकरने अशा प्रकारच प्रतिकात्मक, अनोख आंदोलन करण्याची ही पहिली वेळ नाहीय. याआधी 7 फेब्रुवारी 2025 रोजी झाडावर चढून प्रदर्शन केलं होतं. शेतकऱ्यांची स्थिती, सरकार आणि समाजाच लक्ष वेधणं हा या आंदोलनांमागे उद्देश होता. सरकार जो पर्यंत कर्जमुक्तीचा निर्णय जाहीर करत नाही, तो पर्यंत वेगवेगळ्या स्वरुपात हे आंदोलन सुरु राहिलं असं कारभारी म्हसळेकरने सांगितलं.











