…तर नरेंद्र मोदींना पंतप्रधान पदाची संधी नाही? महाराष्ट्र, प. बंगाल, बिहार आणि ओडिशा राज्यांत गणिते बिघडली!

0
1

लोकसभेचे शेवटच्या टप्प्यातील मतदान १ तारखेला होणार आहे. सर्व राजकीय पक्षांनी लोकसभा निवडणूकीत आपली ताकद पणाला लावली, मुख्यमंत्री योगी, पंतप्रधान मोदी, गृहमंत्री अमित शाह यांनी देशभरात प्रचंड प्रचार सभा घेतल्या. मात्र तरीही नरेंद्र मोदी सरकार पडणार म्हणून विरोधक खात्री देत आहेत. त्यामुळे खरंच मोदी इतिहास घडवतील की विरोधकांचा दावा खरा ठरेल हे पाहणे महत्वाचे आहे. भारताच्या इतिहासात पंडित जवाहरलाल नेहरू यांनी आतापर्यंत तीनवेळा पंतप्रधानपद भूषवले. आता मोदी पुन्हा पंतप्रधान झाले तर ते नेहरूंच्या विक्रमाची बरोबरी करतील. भाजपने मित्रपक्षाच्या मदतीने ४००(स्वबळावर ३७० जागा) पारचा विश्वास व्यक्त केला होता, लोकसभा बहुमतास आवश्यक असलेल्या २७२ जागांपेक्षा भाजप तब्बल ९८ जास्त जागा जिंकेल असा दावा करण्यात येत आहे.

२०२४ च्या लोकसभा निवडणुका निकाल समजून घेण्यासाठी एकूण ५४३ लोकसभा जागा ३ भागात (१००, २०० आणि २४३) विभागणे गरजेचं आहे.

१०० जागा अशा जिथे भाजप निवडणूक लढतही नाही

२०० जागा अशा वर्गवारीत (भाजपचा स्कोअर १० टक्के)

अधिक वाचा  मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण मागे घेतलं मराठे पुन्हा तहात हरले? शासन निर्णयावर कोण कोण काय म्हणालं?

भाजपचे या राज्यांत २० उमेदवार तरी ९ जागा जिंकतात.

२४३ जागा अशा जिथे भाजपची प्रादेशिक पक्षाशी टक्कर. 

त्यामुळे जर भाजपला ४०० पार जागा मिळवायच्या असतील तर २४३ जागांच्या विभागात स्ट्राइक रेट सुधारण्याची गरज आहे, असे सी-व्होटरचे संस्थापक यशवंत देशमुख यांनी टाइम्स ऑफ इंडियाला सांगितले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना तिसऱ्यांदा पंतप्रधान व्हायचे असेल तर दक्षिणेकडील राज्यांमध्ये भाजपची स्थिती समजून घेणे महत्वाचे आहे. तामिळनाडू, आंध्र प्रदेश, केरळ आणि तेलंगणा या दक्षिणेकडील चार राज्यांमध्ये आपला ठसा उमटवण्यासाठी भाजप अजूनही धडपडत आहे. गेल्या दोन लोकसभा निवडणुकीत या पक्षाला १०१ पैकी फक्त 4 जागा जिंकता आल्या. मात्र, यावेळी दक्षिणेकडील चार राज्यांमध्ये भाजपच्या जागा वाढण्याची शक्यता आहे.

भाजपला तामिळनाडूत २०१४ ला १ जागा तर २०१९ मध्ये ० जागा मिळाल्या होत्या. आंध्र प्रदेशमध्ये २०१४ ला २ तर २०११ ला ०, केरळमध्ये ० तर तेलंगनामध्ये भाजपला २०१४ ला १ तर २०१९ ला ४ जागा मिळाल्या होत्या.

अधिक वाचा  पुणे महापालिका प्रभाग रचनेवर हरकतींचा पाऊस; शेवटचा दिवस; उत्तर आणि दक्षिण टोकावरील या प्रभागावर सर्वाधिक हरकती

२०१९ मध्ये ११० मतदारसंघात भाजप विरुद्ध काँग्रेस, अशी थेट लढत होती. मात्र, यापैकी केवळ १५ जागा जिंकण्यात काँग्रेसला यश आले, उर्वरित १७५ जागा भाजपच्या वाटघाला गेल्या. गेल्या लोकसभा निवडणुकीत ज्या राज्यात भाजप विरुद्ध काँग्रेस असा सामना झाला तिथे भाजपने मोठ्या फरकाने विजय मिळवला.

२०२४ मध्ये प्रादेशिक पक्ष महत्वाचे

पंतप्रधान नरेंद्र मोदी तिसन्यांदा पंतप्रधान होणार की नाही हे प्रादेशिक पक्षावर अवलंबून आहे. देशातील 6 प्रमुख राज्यांमध्ये एकूण २४४ जागा आहेत जिथे भाजपची प्रादेशिक पक्षांशी थेट स्पर्धा आहे. २०१४ प्रमाणेच समाजवादी पक्ष (एसपी) आणि बहुजन समाज पक्ष (बसपा) वेगळे लढत आहेत. त्या वर्षी सपा आणि बसपा वांची युती नव्हती तेव्हा भाजपने ८० पैकी ७१ जागा जिंकल्या होत्या. आणि ही राज्ये २०२४ च्या लोकसभा निवडणुकीचा निकाल मोठ्या प्रमाणावर ठरवतील, जनमत सर्वेक्षण आणि विधानसभा निवडणुका २०२२ नुसार महाराष्ट्र, पश्चिम बंगाल, बिहार, पंजाब, ओडिशा, छत्तीसगड आणि उत्तर प्रदेश या सहा राज्यांपैकी उत्तर प्रदेशमध्ये भाजप मजबूत आहे.

अधिक वाचा  जगाने भगवान बुद्धांना आद्य संशोधक व सुपर सायंटिक्स म्हणून मान्य केले – संदीप गमरे

अस्वस्थतेचं राजकारण चार राज्य कोणते?

पंजाबमध्ये भाजपची ताकद फार काही नाही. तर महाराष्ट्र (४८ जागा), पश्चिम बंगाल (४२), बिहार (४०) आणि ओडिशा (२१). या चार राज्यांतील एकूण १५१ जागांपैकी भाजपने २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत ६६ जागा जिंकल्या होत्या. मात्र यावेळी महाराष्ट्रात २ राष्ट्रवादी आणि २ शिवसेना आहेत. राज्यात अस्वस्थतेचं राजकारण आहे. त्यामुळे लोकसभा निवडणुकीत भाजपला फायदा होईल की नुकसान होईल, हे कोणीही ठामपणे सांगू शकत नाही.

बिहारमध्ये, राष्ट्रीय जनता दल (आरजेडी) सोबत त्यांची दुसरी टर्म सेवा केल्यानंतर, नितीशकुमार पुन्हा एनडीएमध्ये आले आहेत. पश्चिम बंगालबद्दलमध्ये भाजप आणि टीएमसी यांच्यात चुरशीची लढत होणार आहे, असे म्हणता येईल. ओडिशात भाजप आणि बिजू जनता दल (बीजेडी) यांच्यात युतीची चर्चा होती, परंतु आता ते एकमेकांच्या विरोधात थेट लढत आहेत. त्यामुळे भाजपला बहुमत महाराष्ट्र, पश्चिम बंगाल, बिहार आणि ओडिशाचा निकालांवरून निश्चित होईल, असे राजकीय विश्लेषकांनी म्हटले आहे.