निष्ठीत कार्यकर्त्याच्या पाठीवर ‘पवारांची थाप’; जनसंपर्क, सेवा आणि संघर्षाला वरिष्ठांची दाद

0

कोथरुड: कोथरूडमध्ये जनहिताच्या प्रश्नांसाठी सातत्याने लढणारे आणि प्रत्येक छोट्या-मोठ्या स्थानिक समस्यांवर ठाम भूमिका घेणारे गिरीश गुरुनानी यांच्या कार्याची आज राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरदचंद्र पवार यांनी दखल घेतली. कोथरूड राष्ट्रवादीचे सक्रिय कार्यकर्ते असलेले गिरीश गुरुनानी यांनी आज पवार साहेबांना आपला सविस्तर कार्यअहवाल सादर केला. जनतेशी असलेला त्यांचा थेट संपर्क, विविध माध्यमांतून केलेली पाठपुरावा मोहीम, अनेक आंदोलने आणि सामाजिक उपक्रमांचा तपशील ऐकून पवार साहेबांनी त्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप दिली आणि पुढील कामासाठी मार्गदर्शनही केले. पवार साहेबांसारख्या अनुभवी नेतृत्वाकडून मिळालेली ही दाद गिरीश यांच्या राजकीय प्रवासातील एक महत्त्वाचा क्षण ठरला.

कोथरूडमध्ये मागील काही वर्षांपासून पाणीपुरवठा, कचरा व्यवस्थापन, रस्त्यांची अवस्था, वाहतूक कोंडी, नागरिकांसाठीच्या मूलभूत सोयी, पर्यावरणाशी संबंधित मुद्दे अशा विविध प्रश्नांवर गिरीश सातत्याने आवाज उठवत आहेत. प्रशासनाशी बैठक, निवेदनं, स्थानिक पातळीवरील आंदोलनं, मोर्चे आणि जनसंवाद यांद्वारे त्यांनी केलेल्या प्रयत्नांमुळे अनेक प्रश्न मार्गी लागत आहेत तर काही निर्णायक टप्प्यावर पोहोचले आहेत. यामुळेच त्यांच्या कार्याची चर्चा कोथरूडमध्ये अधिक जोरात होत असून, “कोण आपल्या समस्यांसाठी खऱ्या अर्थाने लढतं?” या प्रश्नाचे उत्तर नागरिकांना गिरीश यांच्या स्वरूपात दिसू लागले आहे.

अधिक वाचा  राहुल गांधींच्या आंदोलनाला यश, दिल्ली पोलिसांत पेलेट गनप्रकरणी अखेर गुन्हा दाखल, FIR मध्ये मात्र अजब नोंद

सामाजिक बांधिलकीही गिरीश यांच्या कार्याचा अविभाज्य भाग आहे. स्वच्छता मोहिमा, आरोग्य तपासणी शिबिरे, रक्तदान उपक्रम, वृक्षारोपण, महिलांसाठी जनजागृती कार्यक्रम, तरूणांसाठी मार्गदर्शन सत्रे आणि नागरिक संवाद मेळावे यांसह अनेक उपक्रम त्यांनी राबवले आहेत. या सर्व कामांचा आढावा असलेला अहवाल पवार साहेबांना सादर करताना गिरीश यांनी कोथरूडमधील लोकजीवन अधिक सुकर करण्यासाठी आपल्या संघटनेतर्फे घेतलेल्या पुढाकारांची माहिती मांडली. अहवालातील प्रत्येक मुद्यावर पवार साहेबांनी बारकाईने नजर टाकली आणि गिरीश यांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांचे मनापासून कौतुक केले.

भेटीनंतर गिरीश यांनी आपल्या भावना व्यक्त करताना सांगितले, “मी केलेल्या प्रत्येक कामामागे जनहित हा एकमेव उद्देश आहे. ही कामे जनता पाहतेच, पण पक्षश्रेष्ठींनीही त्याची दखल घेतली, हे माझ्यासाठी अत्यंत प्रेरणादायी आहे. पवार साहेबांसारख्या महान नेत्यांनी माझ्या कामावर समाधान व्यक्त करत मार्गदर्शन दिलं, ही माझ्या पुढील कार्याला दिशा देणारी आणि उर्जा देणारी गोष्ट आहे.” त्यांच्या या भावना त्यांच्या कामाबद्दलची निष्ठा आणि कृतज्ञता स्पष्ट करतात.

अधिक वाचा  वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरण, आरोपीला जेवण किंवा जागा देणे म्हणजे गुन्हा नाही युक्तीवाद कामी निर्दोष सुटका

गिरीश यांच्या या भेटीमुळे त्यांच्या सहकाऱ्यांमध्येही नवचैतन्य निर्माण झाले आहे. पक्षाच्या वरिष्ठांकडून मिळालेल्या दादेमुळे संघटनेत उत्साह वाढला असून पुढील काळात अधिक व्यापक आणि प्रभावीपणे काम करण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला आहे. कोथरूडमधील अनेक नागरिकांनीही या घटनेचे स्वागत केले आहे. “आपल्या समस्या प्रामाणिकपणे मांडणारा आणि त्यावर उपाययोजना मिळेपर्यंत पाठपुरावा करणारा नेता आजच्या काळात दुर्मिळ झाला आहे. गिरीश यांच्या चिकाटीला मिळालेलं पवार साहेबांचं कौतुक हा कोथरूडसाठी अभिमानाचा क्षण आहे,” अशा प्रतिक्रिया नागरिकांकडून उमटत आहेत.

या सर्व घडामोडींमधून एक गोष्ट स्पष्ट होते, काम केल्यावर त्याची दखल घेतली जाते, आणि काम प्रामाणिक असेल तर नेतृत्वही ते मनापासून स्वीकारते. गिरीश गुरुनानी यांच्या संघर्षशील आणि लोकाभिमुख कार्यशैलीला मिळालेली ‘पवारांची थाप’ हा केवळ गौरवाचा क्षण नाही, तर पुढील जबाबदारीची आणि नवी उर्जा देणारी सुरूवात आहे. कोथरूडमधील जनतेच्या प्रश्नांसाठी सातत्याने लढत राहण्याचा त्यांचा निर्धार या भेटीनंतर आणखी दृढ झाला आहे. अशा कार्यकर्त्यांमुळेच लोकाभिमुख राजकारणाची आशा जिवंत राहते. याचीच जाणीव आजच्या या घटनेने पुन्हा एकदा करून दिली.

अधिक वाचा  NDA सरकारमध्ये मोठा फेरबदल? काही मंत्रिपदांमध्ये आधीच बदल या 2 नव्या मंत्र्यांची एंट्री पक्की; कोणाला मिळणार संधी?