मराठवाड्याचा पाणी प्रश्न कायमचा सोडवण्यास मुख्यमंत्र्यांचा शब्द; विरोधी पक्षाच्या खासदारांसोबत आज नेमकं काय घडलं?

0

कोल्हापूरच्या कृष्णा नदीच्या पुराच पाणी उजनी धरणात घेऊन ते पाणी धाराशिव आणि बीड जिल्ह्यासाठी देण्यात येणार, शिवाय मराठवाड्याचा पाण्याचा कायमस्वरूपी प्रश्न सोडवण्या त येणार असल्याची माहिती राज्याचे मुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस यांनी दिली आहे. यंदा दुष्काळाची चाहूल मराठवाड्यात जाणवत असल्याने त्यावरचे उपाय देखील करण्याचे आश्वासन मुख्यमंत्र्या कडून देण्यात आले आहे . विरोधी पक्षांच्या खासदारां सोबतच्या बैठकीत त्यांनी हा शब्द दिला असून या निर्णया मुळे मराठवाड्याला मोठा दिलासा मिळण्याची शक्यता आहे.

विरोधी पक्षांच्या खासदारांची मुख्यमंत्र्यांसोबतच्या चर्चेत नेमकं काय घडलं?

दरम्यान, महाराष्ट्रातील खासदारांनी आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. यावेळी राज्यातील अनेक मुद्यांवर चर्चा झाल्याची माहिती आहे. खासदारांचा मतदारसंघात काय अडचणी आहेत याबाबत आम्ही चर्चा केली. आमच्या बाबत का भेदभाव केला जातो, याबाबत आम्ही बोललो आहोत. आम्ही बैठकीबाबत समाधानी आहोत. आता आश्वासन इम्प्लिमेंट व्हायला हवा अशीमाहितीखासदार शाहू छत्रपती यांनीदिलीआहे. तरअमरावतीमधील जाळीत कांड प्रकरणी चर्चा झाली आहे. व्हेंटिलेटर बाबत तक्रारी आहेत, त्या कंपनीला ब्लॅकलिस्ट करायची मागणी आम्ही केली आहे. अशीमाहितीखासदार बळवंत वानखेडे यांनीदिली. तर धुळे मतदारसंघातील मनमाड इंदौर रेल्वे प्रकल्पाबाबत आम्ही बोललो आहे. जमीन अधिग्रहण सुरू आहे. त्यात येत असलेल्या अडचणी बाबत बोललो. मुख्यमंत्री यांनी याबाबत बैठक घेण्याचे आश्वासन दिलं आहे, अशीमाहिती खासदार शोभा बच्छाव यांनी दिली.

अधिक वाचा  पुण्यात रुपाली चाकणकरांच्या तक्रारीनंतर १९ जणांवर गुन्हा दाखल; अंधारे, ठोंबरेंसह अनेक मोठ्या चेहऱ्यांचा समावेश

खासदार सुप्रिया सुळे यांची पुन्हा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांबरोबर बैठक

दरम्यान, राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांची पुन्हा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांबरोबर बैठक होणारआहे. या बैठकीला राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचे स्थानिक आमदार शंकर मांडेकर, भारतीय जनता पक्षाचे स्थानिक माजी आमदार संग्राम थोपटे आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे उपस्थित राहणार आहे. भोर तालुक्यातील भोंगवली सब स्टेशन बाबत मुख्यमंत्री यांनी ही बैठक बोलावली असल्याची माहिती आहे.

मुंबईत गुरुवारी दुपारी तीन वाजता सह्याद्री अतिथीगृह इथे बैठक बोलावण्यात आली आहे. भोर तालुक्यातील भोंगवली येथे प्रस्तावित असलेल्या 765 केव्ही क्षमतेच्या GIS सबस्टेशन तसेच भोर आणि राजगड तालुक्यातील विविध गावांमधून जाणाऱ्या टॉवर लाईनविरोधात भोर राजगड सबस्टेशन व टॉवर लाईन हटाव संघर्ष समितीच्या वतीने कापूरहोळ चौक येथे पुणे-बेंगलोर महामार्गावर रस्ता रोको आंदोलन करण्यात आलं होतं. यासंदर्भात याबैठकीत चर्चा होणार असल्याची माहिती आहे.

अधिक वाचा  पिकांवर पाण्याच्या ताणाचे संकट निर्माण होण्याची शक्यता पुढील एक महिना पाऊस नाही? हवामान विभागाचा अंदाज