पिकांवर पाण्याच्या ताणाचे संकट निर्माण होण्याची शक्यता पुढील एक महिना पाऊस नाही? हवामान विभागाचा अंदाज

0

पुढील चार आठवड्यांत महाराष्ट्रात पावसाचे प्रमाण सरासरीपेक्षा कमी राहण्याची शक्यता असल्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. त्यामुळे राज्यात मॉन्सूनचा जोर ओसरत असतानाच आता पिकांवर पाण्याच्या ताणाचे संकट निर्माण होण्याची शक्यता आहे. दरम्यान, आज (ता. २१) मराठवाड्यातील जालना, परभणी, हिंगोली, लातूर आणि नांदेड जिल्ह्यांत विजांसह पावसाचा अंदाज असून, उर्वरित राज्यात हलक्या सरींची शक्यता आहे.

राज्यातील काही भागांत गेल्या काही दिवसांपासून पावसाचा जोर कमी झाला आहे. काही ठिकाणी हलक्या ते मध्यम सरी सुरू असल्या, तरी बहुतांश भागांत पावसाने विश्रांती घेतली आहे. मराठवाड्यात मात्र वातावरणात काही प्रमाणात अस्थिरता असल्याने आज पाच जिल्ह्यांत वादळी पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

अधिक वाचा  सरकारविरोधी वातावरणाची संधी साधण्यास काँग्रेसची ‘छात्रों की गुंज’ पुण्यातून का ? यासाठी हर्षवर्धन सपकाळ यांचा पुण्यात तळ

हवामान विभागाच्या माहितीनुसार, मॉन्सूनचा आस अमृतसर, नजीबाबाद, फतेहगड, हरदोई, ईशान्य मध्य प्रदेशातील ठळक कमी दाबाचे केंद्र ते दिघा आणि पुढे ईशान्य बंगालच्या उपसागरापर्यंत सक्रिय आहे. वायव्य उत्तर प्रदेशापासून ईशान्य मध्य प्रदेशातील कमी दाबाच्या क्षेत्राशी संबंधित चक्राकार वाऱ्यांपर्यंत समुद्रसपाटीपासून ०.९ किलोमीटर उंचीवरील हवेचे जोडक्षेत्र आता कमी ठळक झाले आहे.पुढील चार आठवड्यांच्या अंदाजानुसार, महाराष्ट्रात पावसाचे प्रमाण सरासरीपेक्षा कमी राहण्याची शक्यता आहे. पावसाची नकारात्मक तफावत कायम राहिल्यास पक्व अवस्थेतील पिकांवर पाण्याचा ताण निर्माण होण्याची शक्यता आहे. तसेच दुसऱ्या आठवड्यापासून कमाल तापमान सरासरीपेक्षा अधिक राहण्याचा अंदाज असल्याने शेतकऱ्यांनी पिकांच्या पाणी व्यवस्थापनाकडे लक्ष देणे आवश्यक आहे.

अधिक वाचा  दोन अनाथ विद्यार्थिनींना कोंडलं, Whatsapp Status अन्… रात्रभर पुण्यात राडा; काँग्रेस-भाजपामध्ये नेमकं घडलं काय? A To Z माहिती