आजच्या काळात शिक्षण घेणे म्हणजे डोक्यावर कर्ज होते. आपल्या देशातले शिक्षण सर्वसामान्य नागरिकांना न परवडणारे आहे. आम्हाला देशातल्या शिक्षण क्षेत्रात क्रांती घडवायची आहे. लोकांचा सर्वात जास्त राग देशातल्या मिडीयावर आहे.60 टक्के लोक 35 वयाच्या खालचे आहेत. कोर्टात जाऊन पक्षही फोडले जात आहेत. सामान्य लोकांना न्यायालयात तारीखही मिळत नाही. लोकांचा न्यायव्यवस्थेवरचा विश्वास उडाला आहे, बेरोजगारी हा भारतातला सर्वात मोठा मुद्दा आहे. डिलिव्हरी बॉय होण्याचे कोणत्याच युवकाचे स्वप्न नसते. जंतरमंतरवर विद्यार्थीच नव्हे तर बेरोजगारही होते असे अभिजीत दिपके यांनी म्हटले आहे.







जंतरमंतर आंदोलनानंतर कॉक्रोज जनता पार्टीचे अभिजीत दिपके प्रसिद्ध झाले आहेत.त्यांनी संभाजीनगरात दोन दिवसात बैठका घेतल्यानंतर आज आपली भूमिका मांडली आहे. अभिजीत दिपके यावेळी म्हणाले की CJP नेमकी काय आहे हा प्रश्न सगळ्यांना पडला आहे.डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा गांधी आणि पंडित जवाहरलाल यांनी जे स्वप्न पाहिलं होतं, त्यांच्या विचारावर चालणारी ही पार्टी असणार आहे. जी संविधानाची विचारधारा आहे तीच आमची विचारधारा आहे.आम्ही सेक्युलर आहोत, लोकशाहीवर भरोसा ठेवतोय असे कॉक्रोच जनता पार्टीचे संस्थापक अध्यक्ष अभिजीत दिपके यांनी म्हटले आहे.
‘क्या बोलती पब्लिक’
कॉक्रोच जनता पार्टी (CJP) चे संस्थापक अभिजीत दिपके यांनी दोन दिवसांच्या चर्चेनंतर आता आपला पुढचा प्लान जाहीर केला आहे. कॉक्रोच जनता पार्टी या वर्षी सप्टेंबरमध्ये ‘क्या बोलती पब्लिक’ नावाने एक राष्ट्रव्यापी कँपेन सुरु करणार आहे. या मोहिमेचा मुख्य उद्देश्य देशभरातील लोकांच्या आकांक्षा, अपेक्षा आणि चिंतेला जवळून समजणे आणि संवाद स्थापित करणे हा आहे. आम्ही देशभरात दौरा करणार आहोत,लोकांच्या समस्या आणि अडचणी समजून घेणार आहोत. शिक्षण आणि बेरोजगारी याबद्दल कोणी बोलत नाही, संसदेत कोणी बोलत नाही. सरकारला तर असं वाटते की हा काही मुद्दा नाही. सरकार फक्त एकच मुद्दा आणते तो म्हणजे हिंदू आणि मुसलमान असेही दीपके यांनी म्हटले आहे.
बेरोजगारी हा भारतातला सर्वात मोठा मुद्दा
आजच्या काळात शिक्षण घेणे म्हणजे डोक्यावर कर्ज होते. आपल्या देशातले शिक्षण सर्वसामान्य नागरिकांना न परवडणारे आहे. आम्हाला देशातल्या शिक्षण क्षेत्रात क्रांती घडवायची आहे. लोकांचा सर्वात जास्त राग देशातल्या मिडीयावर आहे. 60 टक्के लोक 35 वयाच्या खालचे आहेत. कोर्टात जाऊन पक्षही फोडले जात आहेत. सामान्य लोकांना न्यायालयात तारीखही मिळत नाही. लोकांचा न्यायव्यवस्थेवरचा विश्वास उडाला आहे, बेरोजगारी हा भारतातला सर्वात मोठा मुद्दा आहे. डिलिव्हरी बॉय होण्याचे कोणत्याच युवकाचे स्वप्न नसते. जंतरमंतरवर विद्यार्थीच नव्हे तर बेरोजगारही होते असेही अभिजीत दिपकेयांनी म्हटले आहे.
कॉकरोच जनता पक्ष राष्ट्रीय कार्यकारिणी जाहीर; कुणाला कोणतं पद मिळालं?
कॉकरोच जनता पक्षाने आपल्या राष्ट्रीय कार्यकारी समितीच्या नावांची औपचारिक घोषणा केली आहे. पक्षाने स्पष्ट केले आहे की, पुढील सहा महिन्यांत देशभरात राज्य समन्वय समित्या आणि लोकसभा स्तरावरील समित्या स्थापन केल्या जातील.सीजेपीने हेही स्पष्ट केले आहे की, ६ ऑगस्ट रोजी घोषित केलेल्या नावांव्यतिरिक्त अद्याप इतर कोणत्याही व्यक्तीची पदाधिकारी म्हणून नावे जाहीर केलेली नाहीत.
महाराष्ट्रातील छत्रपती संभाजीनगरमध्ये सीजेपीच्या कोअर कमिटीवरूनही वाद निर्माण झाला. काही तरुणांनी अभिजीत दीपके यांच्या घराबाहेर जमून पक्ष नेतृत्वावर घराणेशाही आणि वशिलेबाजीचा आरोप केला. त्यांनी जंतर मंतर विद्यार्थी आंदोलनाशी संबंधित सर्व समन्वयकांना प्रतिनिधित्व देण्याची मागणीही केली. आंदोलन करणाऱ्या तरुणांनी दावा केला की, ते जंतर मंतर येथील विद्यार्थी आंदोलनाच्या सुरुवातीपासूनच त्यात सक्रिय होते आणि त्यांनी समन्वयक म्हणून काम केले होते.
तसेच कॉकरोच जनता पक्षाने आपल्या वेबसाइटद्वारे देशव्यापी सदस्य नोंदणी मोहिमेची घोषणा केली आहे. विद्यार्थी, तरुण व्यावसायिक आणि सामान्य नागरिकांना या चळवळीत सामील होऊन आपला आवाज बुलंद करण्यासाठी आमंत्रित करण्यात आले आहे. सीजेपीचे संस्थापक अभिजीत दीपके यांनी गुरुवारी ही घोषणा केली.ते म्हणाले की, ही संघटना बेरोजगारी, खाजगी शाळांचे शुल्क, सरकारी शाळांमध्ये सुधारणा आणि संस्थांवरील घटता विश्वास यांसारख्या मुद्द्यांवर लक्ष केंद्रित करेल. सीजेपीने सप्टेंबरमध्ये ‘क्या बोलती पब्लिक’ मोहिमेचीही घोषणा केली होती. या मोहिमेअंतर्गत, राजकीय चर्चा बदलण्याच्या उद्देशाने ते विविध राज्यांमध्ये प्रवास करतील. नागरिकांशी थेट संवाद साधतील आणि बेरोजगारी व शिक्षण यांसारख्या समस्यांवर काम करतील.
सीजेपीची राष्ट्रीय कार्यकारी समिती
- संस्थापक आणि राष्ट्रीय संयोजक: अभिजीत दीपक
- सहसंयोजक: आशुतोष रांका आणि सौरव दास
- राष्ट्रीय संघटना प्रभारी: अजिंक्य शिंदे
- संस्थेचे सहप्रभारी : दीपक बालियान
- राष्ट्रीय सचिव: अफरीन नवाज
- मीडिया प्रमुख: विजय रेड्डी मल्लांगी
- कायदेशीर व्यवहार प्रमुख: रत्ना सिंग
- संशोधन आणि धोरण लीड: वैष्णवी गौर
- तंत्रज्ञान प्रमुख: रोहन देशपांडे
- वित्त प्रमुख: योगेश इंगळे
- सीजेपीचे विभागीय प्रभारी
- उत्तर विभाग: दीपक बलियान
- दक्षिण विभाग: विजय रेड्डी मल्लांगी
- पूर्व आणि ईशान्य विभाग: अंकित भारद्वाज (35)
- पश्चिम विभाग: योगेश इंगळे












