टीम इंडियाने बांगलादेशला पहिल्या कसोटी सामन्यात विजयासाठी 515 धावांचं आव्हान दिलं आहे. टीम इंडियाने तिसऱ्या दिवशी आपला दुसरा डाव हा 287 धावांवर घोषित केला. टीम इंडियाकडे पहिल्या डावातील 227 धावांची आघाडी होती. त्यामुळे बांगलादेशला 515तं टार्गेट मिळालं आहे. भारताकडून दुसऱ्या डावात शुबमन गिल आणि ऋषभ पंत या जोडीने शानदार भागीदारी केली. तसेच दोघांनीही फटकेबाजी करत वैयक्तिक अर्धशतकं झळकावली. त्या जोरावरच भारताला 500 पार मजल मारण्यात यश आलं. आता फलंदाजांनंतर भारतीय गोलंदाजांवर बांगलादेशला पहिल्या डावाप्रमाणे दुसऱ्या डावातही झटपट गुंडाण्याची जबाबदारी असणार आहे.
टीम इंडिया प्लेइंग ईलेव्हन : रोहित शर्मा (कर्णधार), यशस्वी जयस्वाल, शुबमन गिल, विराट कोहली, केएल राहुल, ऋषभ पंत (विकेटकीपर), रवींद्र जडेजा, रवीचंद्रन अश्विन, जसप्रीत बुमराह, आकाश दीप आणि मोहम्मद सिराज.
बांगलादेश प्लेइंग ईलेव्हन : नजमुल हुसेन शांतो (कॅप्टन), शादमान इस्लाम, झाकीर हसन, मोमिनुल हक, मुशफिकुर रहीम, शाकीब अल हसन, लिटन दास (विकेटकीपर), मेहदी हसन मिराझ, तस्किन अहमद, हसन महमूद आणि नाहिद राणा.