महाराष्ट्रात मान्सून अडकला! प्रशांत महासागरातील वादळामुळे वाढलं टेन्शन; मान्सून अति संथ गतीनं पुढे राज्यातील हे जिल्हे कोरडे राहणार

0

मान्सून 30 जूनपर्यंत महाराष्ट्रातच राहणार आहे. मान्सूनची वाट पुन्हा संथ होण्याची शक्यता आहे. गुजरातपर्यंत जाण्यासाठी त्याला जुलैचा पहिला आठवडा जाणार आहे. नवी मुंबई आणि मुंबई उपनगरात पावसाने विश्रांती घेतली आहे. मात्र मुंबईत पहाटेपासून हलक्या स्वरुपाचा पाऊस आहे. महाराष्ट्रात अचानक वातावरण बदललं आहे. पालघरपासून सिंधुदुर्ग अगदी गोव्यापर्यंत अचानक अति मुसळधार ते मुसळधार पाऊस सुरू झाला आहे.

पश्चिम महाराष्ट्र आणि मध्य महाराष्ट्राचा काही भागांत अति मुसळधार पाऊस सुरू आहे. मराठवाडा आणि विदर्भात हलक्या ते मध्यम स्वरुपाचा पाऊस राहणार आहे. कोणत्याही वादळाचा धोका नाही किंवा भूस्खलनाचा धोका तूर्तास कुठेही वर्तवण्यात आलेला नाही. महाराष्ट्रात पश्चिमी तटावर सर्वात जास्त पावसाचा अंदाज पुढच्या 48 तासांत वर्तवण्यात आला आहे. आतापर्यंत मान्सूनची ४२ टक्के कमतरता आहे. त्यामुळे पाण्याची तूट भरून अजूनही भरून निघालेली नाही. मान्सून अजूनही वाईट स्थितीत आलेला. मान्सूनने २३ जूनपासून पुन्हा वेग पकडला आहे.

अधिक वाचा  राहुल गांधी यांच्या वाढदिवसानिमित्त युवक काँग्रेसकडून ‘सीड बॉल’ वाटप; ५ हजार सीड बॉल शाळांमध्ये वाटपाचा संकल्प

आंध्र प्रदेश, बिहार, सिंध अफगाणिस्तान आणि पाकिस्तानच्या आसपास सायक्लोनिक सर्क्युलेशन तयार झाले आहेत. हे जरी असले तरी ते पुरक नाहीत. मान्सूनमुळे पुढचे 48 तास मुसळधार पाऊस होईल मात्र त्यानंतर पुन्हा पावसाचा जोर कमी होऊ शकतो हे सर्वात मोठं टेन्शन आहे. पश्चिम बंगालच्या खाडीत जर कमी दाबाचा पट्टा तयार झाला तर मान्सूनचे वारे पुढे सरकण्यासाठी मदत होते. मात्र सध्या अशी कुठलीही स्थिती तयार न झाल्यामुळे मान्सून अति संथ गतीनं पुढे सरकत आहे. हे सध्या तरी धोकादायक आहे. त्यामुळे पावसाची तूट जाणवत आहे.

अधिक वाचा  राज्य विधीमंडळाचं पावसाळी अधिवेशन ‘या’ मुद्द्यांवरुन गाजणार; विरोधी पक्षांचा सरकारच्या चहापानावर बहिष्कार

पश्चिमी प्रशांत महासागरात वादळ तयार झालं आहे. हे वादळ सगळीकडचे वारे स्वत: ओढून घेत आहे. त्यामुळे मान्सूनसाठी पुरक असलेलं वातावरण देखील बिघडलं आहे. हे वादळ भारताच्या दिशेनं पुढं सरकण्याऐवजी आणखी लांब चाललं आहे. त्यामुळे जे मान्सूनसाठी लागणारे पोषक वारे आहेत ते देखील या वादळासोबत जाताना सॅटलाइ़ट इमेजेसमधून दिसत आहेत. त्यामुळे येत्या काळात मान्सूनच्या पावसाबाबत हवामान तज्ज्ञांनी चिंता व्यक्त केली आहे. पाच दिवस अजून मान्सूनच्या प्रवासासाठी वाट पाहावा लागणार आहे. त्यानंतर मान्सून कसा वेग पकडतो ते पाहावं लागणार आहे.

सिंधुदुर्ग, पुणे, सातारा, लातूर, धाराशिव, यवतमाळ या जिल्ह्यांमध्ये 50 किमी वेगानं वारे वाहणार आहेत. या जिल्ह्यांमध्ये अति मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. दुसरीकडे उर्वरित महाराष्ट्र मुसळधार ते रिमझिम पावसाचा अंदाज वर्तवला आहे. बुलढाणा, गोंदिया, नांदेड, परभणी आणि जालना या जिल्ह्यांमध्ये पावसाचा कोणताही अंदाज वर्तवण्यात आलेला नाही. मान्सूनने जवळपास अर्ध्याहून अधिक महाराष्ट्र व्यापला आहे. उर्वरित ठिकाणी देखील पुढच्या चार दिवसांत व्यापला जाईल.

अधिक वाचा  महायुती नव्हे, हे ५६ टक्के कमिशनचे सरकार; विरोधकांचा चहापानावर बहिष्कार