डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी मराठा ओबीसी आरक्षणासाठी आणि भारतीय स्त्रियांच्या न्यायहक्कासाठी मंत्रिपदाचा राजीनामा दिला – डॉ. आशिष तांबे

0

मुंबई दि. १८ (रामदास धो. गमरे) विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर हे घटना समितीवर गेल्यावर त्यांनी प्रथम जर कोणत काम केलं असेल तर ते मराठा ओबीसी आरक्षणाचा प्रस्ताव त्यांनी घटना समितीसमोर मांडला परंतु मराठा समाजाच्या पुढाऱ्यांनी त्या प्रस्तावास कडाडून विरोध केला तेव्हा बाबासाहेब त्यांना म्हणाले पुढील काळात जसजसा कुटूंब विस्तारत जाईल तसतसे जमिनीची वाटणी होत जाईल तेव्हा नवीन येणाऱ्या पिढीच्या हातात काही उरणार नाही आणि तेव्हाची परिस्थिती ही बदलेली असेल हाताला काम नसेल तेव्हा मराठा तरुण पिढीला आरक्षणासाठी रस्त्यावर उतराव लागेल पण त्यावेळी मी त्यांच्यासोबत नसेल असे म्हणून हिमालया इतके मोठे बाबासाहेब पण ढसाढसा रडले होते तसेच भारतीय स्त्रियांच्या न्याय हक्कासाठी आणि त्यांना गुलामीतून मुक्त करण्यासाठी बाबासाहेबांनी हिंदू कोड बिल आणले पण ते ही नेहरू मंत्री मंडळाने फेटाळून लावले म्हणून मराठा ओबीसी आरक्षणासाठी आणि भारतीय स्त्रियांच्या न्यायहक्कासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी स्वतःच्या मंत्रिपदाचा राजीनामा दिला असे भारतीय राजकारणातील एकमेव स्वाभिमानी एकमेव व्यक्तिमत्व म्हणजे बाबासाहेब आंबेडकर होय, आज इतर जाती धर्मीय बांधव बाबासाहेबांनी आमच्यासाठी काय केलं तर आपण त्या बांधवांना समजून सांगितल पाहिजे की बाबासाहेबांनी स्त्रियांना वडिलांच्या प्रॉपर्टीमध्ये समान हक्क, मतदानाचा अधिकार, समान दर्जा, घटस्फोट, पोडगी, प्रेग्नसी लिव्ह हे सर्व अधिकार एका विशिष्ट जाती अथवा धर्मातील स्त्रियांना न देता भारतातील तमाम स्त्रियांना दिले आहेत, त्याचबरोबर कामगारांना बोनस, आठ तासाची ड्युटी असे अनेक अधिकारी भारतातील प्रत्येक नागरिकांकरता दिले आहेत त्याचबरोबर नद्यांच राष्ट्रीयीकरण,
बँकांचे राष्ट्रीयीकरण, उद्योगांचे राष्ट्रीयीकरण सारख्या अनेक योजना बाबासाहेबांनी दिल्या, मराठा आणि ओबीसी आरक्षणासाठी बाबासाहेब आंबेडकरांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला” असे प्रतिपादन डॉ. आशिष विजय तांबे यांनी प्रमुख वक्त्या म्हणून बोलत आपल्या भाषणात केले.

अधिक वाचा  ‘पल्टीमार’ ते जुळवाजुळवीचे तज्ज्ञ, महिला सशक्तीकरण इन्फ्रास्ट्रक्चर मॅनचा प्रवास; २० वर्षांच्या कारकिर्दीचा आढावा!

बौद्धजन पंचायत समिती शाखा क्र. ५७८, त्यागमूर्ती माता रमाई महिला मंडळ, पंचशील सेवा मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने आणि अण्णाभाऊ साठे नगर कमिटी, स्थानिक रहिवाशी बांधव यांच्या सहकार्याने विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा १३५ वा जयंती भीम महोत्सव श्रीधर गंगाराम मोरे यांच्या अध्यक्षतेखाली अण्णाभाऊ साठे नगर, गृहनिर्माण हौसिंग सोसायटी, नायगाव डिव्हिजन, मुंबई – १४ येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाला.

सदर प्रसंगी कार्यक्रमाचे प्रास्ताविक आणि सूत्रसंचालन राजाभाऊ तथा रामदास धो. गमरे आणि अनंत गोविंद मोहिते यांनी आपल्या भारदस्त आवाजात लाघवी भाषाशैलीत केले. सदर कार्यक्रम ११ एप्रिल ते १५ एप्रिल या कालावधीत मुलांची रनिंग, चित्रकला, वकृत्व, नृत्य कलाविष्कार स्पर्धा, महिलांसाठी खेळ खेळूया पैठणीचा अशा अनेक उपक्रमांचे स्थानिक रहिवाशांकरता आयोजन करण्यात आले, १५ एप्रिल रोजी पाहुण्यांच्या शुभहस्ते बक्षीस वितरण तसेच भारतीय नागरिकांसाठी डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेले योगदान व तरुण वर्गा करता करिअर आणि स्पर्धा परीक्षा बाबत मार्गदर्शन या विषयावर प्रबोधनात्मक जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले होते. फटाक्यांच्या आतिषबाजीत, घोषणांच्या निनादाने दुमदुमलेल्या या पाच दिवसीय जयंती महोत्सवाने संपूर्ण शिवडी विभाग दणाणून गेला.

अधिक वाचा  अविनाश भोसले यांना मोठा दिलासा! ईडी कारवाईस न्यायाधिकरणाची लगाम, मालमत्तेवरील जप्ती रद्द, तपासाचे निष्कर्षही विसंगतच 

सदर कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडण्यासाठी पंचशील सेवा मंडळ च्या सर्वच कार्यकर्त्यांनी व रमाई महिला मंडळाच्या सर्वच कार्यकर्त्यांनी अभूतपूर्ण अफाट व अचाट असे दैदिप्यमान परिश्रम घेऊन मोठ्या उत्साहात खेळीमेळीच्या वातावरणात प्रचंड जनसमुदायाच्या उपस्थितीत सदर कार्यक्रम यशस्वीपणे सादर केल्याबद्दल तसेच दीपक बनसोडे, दांडेकर बुवा, विकास गजानन शिंगरे यांनी आपले योगदाब दिल्याबद्दल व मातंग युवक संघ, साई सेवा संघ, राजे शिवाजी प्रतिष्ठान यांनी सहकार्य केल्याबद्दल त्या सर्वांचे व उपस्थितांचे, स्थानिक रहिवाश्यांचे अनंत मोहिते यांनी आभार मानून कार्यक्रमाची सांगता केली.