बौद्धजन पंचायत समितीच्या विद्यमाने म. ज्योतिबा फुले यांचा १९९ वा जयंती महोत्सव मोठ्या उत्साहात संपन्न

0

मुंबई दि. १२ (रामदास धो. गमरे) क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांचा १९९ वा जयंती महोत्सव बौद्धजन पंचायत समितीच्या विद्यमाने कार्यसम्राट कार्याध्यक्ष लक्ष्मण भगत यांच्या अध्यक्षतेखाली मध्यवर्ती मुख्य कार्यालय, भाईवाडा, परेल, मुंबई – १२ येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाला.

सदर प्रसंगी कार्यसम्राट कार्याध्यक्ष लक्ष्मण भगत यांनी महात्मा ज्योतिबा फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून मानवंदना दिली तर सरचिटणीस राजेश घाडगे यांनी ज्योत प्रज्वलित करून कार्यक्रमाला सुरुवात केली. सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मंगेश पवार यांनी आपल्या पहाडी आवाजात अत्यंत लाघवी भाषाशैलीत सादर केले.

सरचिटणीस राजेश घाडगे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक सादर करीत असताना महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जीवनपटाचा आढावा घेत अत्यंत कठीण काळात त्यांनी केलेल्या अचाट व अफाट क्रांतीचे अनेक पैलू विस्तारीत स्वरूपात मांडत त्यांच्या कार्याची महती सांगत त्यामुळे एका जुलमी सनातनी पर्वाला कसा सुरुंग लागला हे सांगितले डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी म. फुलेंना गुरुस्थानी मानले पण प्रत्यक्षात त्यांनी फुलेंना कधी पाहिले देखील नव्हते कारण फुलेंच्या देहवसना नंतर बाबासाहेबांचा जन्म झाला परंतु म. फुलेंनी जे अद्वितीय कार्य केले होते त्यामुळेच बाबासाहेबांनी त्यांना गुरु मानल होत, म. फुले हे उत्तम कवी, लेखक, साहित्यिक, विचारवंत होते त्यांनी ज्या ज्या परिवर्तनीय क्रांती केल्या आणि समाज परिवर्तन करून एक नवीन अध्याय सुरू केला. म. फुले हे त्याकाळी टाटा बिर्ला पेक्षा ही गडगंज श्रीमंत होते परंतु एका मित्राच्या लग्नात त्यांना कटू अनुभव आला त्यामुळे मी सुशिक्षित आणि गर्भश्रीमंत असताना माझ्या सोबत अस होऊ शकत तर दलित, पीडित, वंचित समाजाची काय अवस्था होत असेल असा विचार करून त्यांनी स्वतःला समाज परिवर्तनाच्या कार्याला वाहून घेतल अशा अनेक आठवणी त्यांनी मांडल्या व आपणही म. फुलेंचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून जीवन व्यतित केले पाहिजे असा संदेश देऊन जयंतीच्या शुभेच्छा दिल्या.

अधिक वाचा  राज्य सरकारचा मोठा निर्णय तळपत्या उन्हातही कष्टकरी सुरक्षित; या 15 जिल्ह्यांवर विशेष लक्ष SOP जाहीर

कार्याध्यक्ष लक्ष्मण भगत यांनी आपले विचार मांडीत असताना “डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी २८ ऑक्टोबर १९५४ ला पुरंदर हॉल मध्ये झालेल्या सभेत माझे उपास्य दैवत तीन आहेत त्यातील एक तथागत भगवान गौतम बुद्ध, दुसरे संत कबीर व तिसरे महात्मा ज्योतिबा फुले असे सांगून त्यांना गुरु मानल परंतु या तिन्ही गुरुंना बाबासाहेबांनी पाहिलं नव्हतं पण त्यांच कुशल कर्म, उदात्त कार्य पाहून बाबासाहेबांनी त्यांना गुरु मानल व गुरुदक्षिणा म्हणून त्यांनी त्यांच्या कार्याची घटनेत तरतूद करून त्याच कायद्यात रूपांतर केलं तसेच पंच हा शब्द महात्मा फुलेंनी १८८९ च्या आपल्या पुस्तकात विचार मांडत असताना महार समाजाने न्याती पंचायतीत आपले प्रश्न सोडवावे इथूनच पंच शब्दाला चालना भेटली परंतु पंच या शब्दाचा संबंध गौतम बुद्धांच्या शाक्य कुळापर्यंत जातो हे आपण विसरता कामा नये, महात्मा ज्योतिबा फुले हे भारतातील एक महान समाजसुधारक, विचारवंत आणि शिक्षणप्रेमी व्यक्तिमत्व होते त्यांनी समाजातील अनिष्ट रूढी परंपरा, जातीव्यवस्था, अस्पृश्यता याविरुद्ध लढा दिला” असे नमूद करीत त्यांनी देखील सर्वांना मंगलकामना दिल्या.

अधिक वाचा  यंदा ‌’अल निनो‌’मुळे खडकवासला धरणातील राखीव पाण्याबाबत हा निर्णय; 1 कोटी नागरिकांसाठी जलसंपदा विभागाची कठोर उपाययोजना

माननीय उपसभापती विनोद मोरे यांनी आपले विचार मांडत असताना “महात्मा फुलेंचे एकूण सर्वच कार्य हे. महान कार्य आहे परंतु महिलांसाठी त्यांनी जे कार्य केले ते उल्लेखनीय आहे, सर्वात प्रथम मनुस्मृतीला विरोध करीत त्यातील महिलांवरील जाचक रूढी दूर करून त्यांनी महिलांना शिक्षण दिलं, स्वतः च्या पत्नीला शिकवलं, तसेच महिलांवर बालविवाह, सतीप्रथा, विधवा केशवपन असे रूढी परंपरेच्या नावावर जो अत्याचार होत होता त्यात ब्राम्हण समाजाच्या जास्त महिला होत्या त्या सर्व अनिष्ट रूढी परंपरेच्या विरोधात उभे ठाकून महिलांना ही माणूस म्हणून जगण्याचा अधिकार दिला, एका ब्राम्हण मुलीच्या मुलाला दत्तक घेऊन त्याला यशवंत नाव दिलं व त्याला उच्च शिक्षण देऊन त्याला डॉक्टर बनवलं, महात्मा फुलेंच काम हे अतुलनीय आहे अशा महान नेत्याची १९९ वी जयंती आपण साजरी करत असताना आपण ही त्यांचे आदर्श डोळ्यासमोर ठेवून चालल पाहिजे, तसेच संयुक्त महाराष्ट्र निर्मितीनंतर पहिलेच मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांनी नवीन महाराष्ट्र निर्माण झाला तेव्हा फुले शाहू आंबेडकर यांच्या विचारांचा वारसा या महाराष्ट्राला लाभलेला आहे असे नमूद केले होते म्हणून या देशाला फुले शाहू आंबेडकर यांच्या विचारांची गरज आहे” असे नमूद करीत सर्वांना जयंतीच्या मंगकामना दिल्या.

अधिक वाचा  महाराष्ट्राच्या सहकार चळवळीला नवे धोरणात्मक बळ?; स्वतंत्र राज्य सहकार धोरण अंतिम स्वरूप सादर होणार

सदर कार्यक्रमास संस्कार समितीचे अध्यक्ष मंगेश पवार, विवाह मंडळाचे अध्यक्ष विभाग गटप्रमुख राजाभाऊ तथा रामदास धो. गमरे, कार्यालयीन सचिव संजय मोहिते, प्रदीप तांबे, निवडणूक मंडळाचे अध्यक्ष अशोक कदम, महाड क्रांतीभूमीचे कार्यकर्ते आणि विविध शाखांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते सरतेशेवटी सदर कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडण्यासाठी अथक परिश्रम घेणाऱ्या सर्वांचे व उपस्थितांचे आभार मानून मंगेश पवार यांनी कार्यक्रमाची सांगता केली.