महापालिका ईव्हीएम मशीनमध्ये चारपैकी कमी मतदान केल्यास काय होईल? मतदारांच्या मनातल्या प्रश्‍नांची उत्तरं

0

महाराष्ट्रातील २९ महापालिकांच्या निवडणुकांची रणधुमाळी सुरु आहे. गुरुवारी १५ जानेवारीला महाराष्ट्रात सर्वत्र मतदान पार पडणार आहे. तर १६ जानेवारी रोजी निकाल लागणार आहे. मतदान करण्यासाठी सर्व राजकीय पक्षांसह निवडणूक आयोगाकडून मतदारांना आवर्जून मतदान करण्याचे आवाहन केले जात आहे. आज 3.5 कोटी मतदारांचा दिवस, ‘महा’मतदान करू, ‘योग्य’ सेवक निवडू; २,८६९ जागांसाठी दिग्गजांची प्रतिष्ठा पणालात्यामुळे प्रत्येक पात्र नागरिकाने मतदान करणे महत्त्वाचे असणार आहे.

यंदा महापालिकेच्या निवडणुकीचे मतदान पॅनेल पद्धतीने पार पडणार आहे. या ‘पॅनेल पद्धती’मध्ये मतदारांमध्ये मतदारांना एकाच वेळी चार उमेदवारांना मतदान करावे लागणार आहे. त्यामुळे मतदारांमध्ये गोंधळ निर्माण झाला असून अनेक प्रश्न मतदारांना पडले आहेत. त्याची उत्तरे जाणून घ्या…

प्रश्‍न : शहरातील प्रभाग रचना कशी आहे?

उत्तर : शहरात चार सदस्यांची प्रभाग रचना आहे, असे एकूण ४० प्रभाग आहे. एक प्रभाग पाच सदस्यांचा आहे.

अधिक वाचा  कोथरूड सकल हिंदू समाजाच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज स्मारक येथे अवमान विरोधात निषेध आंदोलन

प्रश्‍न : चार किंवा पाच सदस्यांच्या प्रभागात किती उमेदवारांना मतदान करावे लागले?

उत्तर : चार किंवा पाच सदस्यांचा प्रभाग असल्यास तेथे प्रत्क गटात मतदान करावे लागणार आहे.

प्रश्‍न : प्रत्येक गटासाठी स्वतंत्र ईव्हीएम असणार का?

उत्तर : प्रत्येक गटासाठी स्वतंत्र ईव्हीएम नसेल. एकाच मशिनवर १६ उमेदवारांची नावे बसू शकतात. अ गटातील उमेदवारांची नावे व चिन्ह आणि सर्वांत शेवटी त्या संबधिंत गटाचे नोटाचे बटण असेल. त्यानंतर एक रकाना रिकामा सोडून ब गटाची नावे टाकली जातील. त्यानंतर क गटाची व ड गटाची नावे असतील. जर उमेदवारांची संख्या जास्त असेल तर तेथे दोन, तीन इव्हीएम मशिन वापरल्या जाणार आहेत.

प्रश्‍न : एखाद्या गटात मतदान करायचे नसल्यास काय करावे लागेल?

उत्तर : एखाद्या गटातील कोणताही उमेदवार आपल्या पसंतीचा नसेल तर त्या गटातील नोटाचे बटण दाबावे लागेल.

अधिक वाचा  बौद्धजन पंचायत समितीच्या विद्यमाने छत्रपती शिवाजी महाराजांचा ३९६ वा जयंती महोत्सव मोठ्या उत्साहात संपन्न

प्रश्‍न : चार किंवा पैकी कमी मतदान केल्यास काय होईल?

उत्तर : चार किंवा पाच उमेदवार निवडायचे असल्याने या प्रत्क गटात मतदान एक करावेच लागणार आहे. जर एखाद्या गटात मतदाराने मतदान केले नाही तर त्याच्या मतदानाची प्रक्रिया पूर्ण होणार नाही.

प्रश्‍न : मतदानाची अर्धवट प्रक्रिया पूर्ण कशी होणार?

उत्तर : मतदाराने मतदानाची प्रक्रिया पूर्ण केली नसल्याचे केंद्र प्रमुखाच्या लगेच लक्षात येते. त्यामुळे ज्या गटातील मतदान पूर्ण झाले नसले अशा वेळी मतदान केंद्रातील राजकीय पक्षांच्या पोलिंग एजंटला ही गोष्टी निदर्शनास आणून दिली जाईल. उमेदवारांच्या नावावर कागद ठेवून नोटाचे बटन दाबून ही प्रक्रिया पूर्ण केली जाईल.

प्रश्‍न : चार किंवा पाच सदस्यांच्या प्रभागातील अ, ब, क, ड, इ हे गट कसे ओळखावे?

उत्तर : चार किंवा पाच सदस्यांच्या प्रभागात प्रत्क गटासाठी रंग ये निश्‍चित केला आहे. यात अ गटासाठी पांढरा, ब गटासाठी गुलाबी, क गटासाठी पिवळा, ड गटासाठी निळा आणि इ गटासाठी हिरवा रंग असणार आहे. त्यावरून गट ओळखता येतील.

अधिक वाचा  देशात UGC ची कारवाई! ३२ बनावट विद्यापीठे जाहीर; १२ विद्यापीठे या राज्यात महाराष्ट्राच्या २ संस्था समाविष्ट

प्रश्‍न : ईव्हीएमवर उमेदवारांच्या नावाचा क्रम कसा ठरतो?

उत्तर : राष्ट्रीय आणि राज्य पक्षांची नावे सर्वप्रथम टाकली जातात. त्यावेळी उमेदवाराच्या आडनावाचा मराठी वर्णमालेतील क्रम लक्षात घेऊन त्यांचा क्रमांक निश्‍चित केला जातो. त्यानंतर अपक्ष उमेदवारांची नावे टाकली जातात.

प्रश्‍न : उमेदवारांची माहिती, त्यांचा क्रमांक, गट मतदारांना कसे कळेल?

उत्तर : प्रत्येक राजकीय पक्षाने किंवा उमेदवाराने त्यांचे माहितीपत्रक मतदारांपर्यंत पोचविण्याचा प्रयत्न केला आहे. पण ज्यांना माहिती मिळाली नसेल तेथे निवडणूक आयोगातर्फे प्रत्क गटातील उमेदवाराचे नावे, ये चिन्ह याची मतपत्रिका बाहेर चिकटलेली असते. त्यावरून माहिती मिळू शकते.