पुणे महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये निष्ठावान कार्यकारणीच्या विरोधात निर्णय घेऊन आयात 3 उमेदवार व 1 स्थलांतरित उमेदवार अशी बांधणी केल्याने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने ‘परफेक्ट नियोजन करेक्ट कार्यक्रम’ समाजसेवी प्रवृत्तीची भूमिका असलेल्या जीवाभावाच्या गड्यांची बांधणी केली. दोन माजी नगरसेवकांचा गेली 20 वर्षाचा जनसंपर्क आणि सलग दोन पिढ्या जनसेवा येत असलेल्या रामभाऊ बराटे यांचे सुपुत्र अशी पक्की बांधणी करून या परिसरातील विजयाची गणिते जुळवण्यास सुरुवात केली. मुळात दोन माजी नगरसेवकांनी या प्रभागातील 80 टक्के भागांमध्ये गेली वीस वर्षे केलेली कामे आणि गावकऱ्यांचं श्रद्धास्थान असलेल्या रामभाऊ बराटे यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांनी दिलेलं मानाचे स्थान! या भागातील गणिते फिरवण्यास फायदेशीर ठरले आहे. निवडणुकीच्या अंतिम टप्प्यात जाहीर झालेल्या सर्वेक्षणानुसार या प्रभागात पुन्हा एकदा राष्ट्रवादीचे प्राबल्य निर्माण झाल्याची जाणीव होताच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुन्हा मैदानात रणशिंग फुकण्याचे नियोजन केले आहे. स्थानिकांच्या नाराजींच्या स्वराला स्वाभिमानाचा संदेश देण्यासाठी आज भव्य बाईक रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे.






वारजे भागात सध्या पक्षातील कार्यकर्ते पदाधिकारी निवडणुकीच्या तोंडावर संधी हुकल्याने तप्त आणि उग्र भावनेत असून ‘जनप्रक्षोभ’ करण्याचे नियोजन करत असताना उपमुख्यमंत्री अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अधिकृत उमेदवारांच्या प्रचारार्थ मैदानात आल्याने वारजे माळवाडीच्या ज्या घरांमध्ये पिढ्यानपिढ्या सत्ता होती त्याच घरातील ३ चेहरे (खुल्या गटातील तीनही जागेसाठी) पक्षांतर करून गेल्याने अजित पवार यांना झालेल्या दुःखाला मलम लावण्याचे काम या परिसरातील निष्ठावान बाबा धुमाळ यांनी केल्याने या नव्या शिलेदारांच्या ताकतीसाठी आज अजित पवार पुन्हा वारजे माळवाडी च्या मैदानात आहेत.
प्रभाग क्रमांक 32 वारजे – पॉप्युलरनगर शिवणे भागात पारंपरिक विरोधक असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने मात्र हार न मानता काँग्रेस भाजपा पक्षामध्ये सक्रिय असलेले 2 चेहरे आयात करून येनवेळी भाजपला तगडी लढत देण्याची नियोजन केले. विरोधकांनी विजयाचे सोनेरी ‘दिवास्वप्न’ पाहण्याची रणनीती करणाऱ्या संधी साधू लोकांना धडे शिकवण्यासाठी मतदारांची एक सुप् लाट तयार झाली असून याच भूमिकेला पाठबळ देण्यासाठी आज परिसरामध्ये अजित पवार अधिकृत उमेदवारांसाठी मतांचा कौल मागणार आहेत.
वारजे माळवाडी भाग 30 वर्षांपूर्वी समाविष्ट पुणे महापालिकेत झाली असला तरीही पश्चिमेकडील इतर उपनगरांप्रमाणे(बावधन बाणेर बालेवाडी) विकास शक्य झाला आहे का? विकास आराखड्यातील प्रकल्प, रस्ते आणि सोयी सुविधा ज्यांनी अडवले तेच सत्तेच्या आसऱ्याला अशी स्थिती असल्याने प्रचंड नाराजी, रोष निर्माण झाला आहे. मुख्यमंत्री अजित पवार यांनी या जनरोषाच्या जीवावर ‘करेक्ट कार्यक्रम’ करण्याचे नियोजन केले आहे. एकीकडे सत्ताधारी विरोधक मोठे मोहरे गळाला लागले म्हणून निश्चित झाले असले तरीही विरोधकांनीही आपले महत्व अस्तित्व आणि नाळ जीवाभावाची! त्रिवेणी ताकतीच्या जोरावर निवडणुकीमध्ये रंगत आणण्याचे काम केले आहे.













