वारजे शिवणे परिसरात निष्ठावानांच पॅनल म्हणून घरोघरी पोहोचलेल्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या उमेदवारांचे पक्षप्रमुख निष्ठावानांचा ‘विठोबा’ राज ठाकरे थेट प्रभाग क्रमांक 32 मधील कार्यकर्त्यांशी संवाद साधण्यासाठी वारजे माळवाडी मध्ये येणार असल्याने मनसैनिकांचा उत्साह शिगेला पोचला आहे. राजगादीसाठी अनेक पक्षांतरे आणि आरोप प्रत्यारोप सुरू असताना निष्ठावनांचे पॅनल फक्त वारजे भागातील नागरिकांची …. फक्त जनसेवा! या उदात्त हेतूने प्रचार करत असल्याने नुकत्याच हाती आलेल्या सर्वेक्षणानुसार या भागामध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला दिलासादायक वातावरण निर्माण झाले आहे. विशिष्ट पातळीवर याची नोंद घेण्यात आल्याने कार्यकर्त्यांना योग्य दिशा आणि प्रचाराचा आढावा घेण्यासाठी दस्तूर खुद्दराज साहेब ठाकरे मैदानात उतरले आहेत.






वारजे माळवाडी प्रभाग क्रमांक 32 मधील राजकीय वातावरण तापले असून राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या उमेदवारांनी या प्रभागात प्रचारात आघाडी घेतली असून आपल्या निष्ठावान कार्यकर्त्यांसाठी राज ठाकरे यांची प्रत्यक्ष हजेरी ही दुर्मिळ पर्वणी ठरणार आहे. राज साहेब ठाकरे यांच्या भेटीने वारजे भागातील राजकीय समीकरणे बदलणार असल्याची चर्चा आहे. वारजे माळवाडी परिसरातील स्थानिक ज्वलंत प्रश्नांवर भाग्यश्री दांगट यांनी घेतलेल्या जनहितवादी भूमिकेला नागरिक मोठ्या प्रमाणात साथ देताना दिसत आहे.
पुणे महापालिका निवडणूक प्रचारासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे उद्या मंगळवारी पुणे दौऱ्यावर येत आहेत. प्रभाग क्रमांक 32 वारजे पॉप्युलर नगर मधील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी राज ठाकरे उदया सकाळी 11 वाजता वारजे माळवाडी चौकातील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे निष्ठावान कार्यकर्ते कैलास दांगट यांच्या संपर्क कार्यालयात येणार असून यावेळी ते उमेदवार, कार्यकर्ते, पदाधिकारी आणि नागरिकांशी संवाद साधणार आहेत.
प्रभाग क्रमांक 32 वारजे माळवाडी पॉप्युलर नगर प्रभागातील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उमेदवार भाग्यश्री कैलास दांगट, केशर प्रवीण सोनवणे, गणेश धुमाळ, रियाज शेख या उमेदवारांच्या प्रचारासाठी राज ठाकरे वारजे माळवाडी परिसरात मंगळवारी सकाळी 11 वाजता येणार आहेत. मनसे नेते कैलास दांगट याबाबत बोलताना म्हणाले, वारजे माळवाडी पॉप्युलर प्रभागातील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या उमेदवारांचा जोरदार प्रचार सुरू आहे. फक्त आणि फक्त नागरी प्रश्नांनाच प्राधान्य देत प्रचार यंत्रणा राबवल्यामुळे सध्या या भागातील लढतीमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेना वरचढ ठरली आहे. या ठिकाणी उद्या आमचे नेते राज ठाकरे या भागातील उमेदवार, कार्यकर्ते पदाधिकारी आणि नागरिकांशी संवाद साधणार आहेत.










