‘ऑपरेशन सिंदूर’ची मोठी बातमी : मसूद अजहरचं आख्खं कुटुंब संपलं, भाऊ, बहिणीसह 14 जण यमसदनी!

0

भारताने पाकव्याप्त काश्मीरसह पाकिस्तानातल्या दहशतवाद्यांच्या नऊ तळांवर मध्यरात्री जोरदार आक्रमण करत ‘ऑपरेशन सिंदूर’ ही मोहीम फत्ते केली आहे.भारताने केलेल्या एअर स्ट्राईकमध्ये अनेक दहशतवादी मारल्या गेल्याची माहिती समोर आली आहे. 22 एप्रिल रोजी झालेल्या पहलगाम हल्ल्यानंतर भारत नक्कीच मोठी कारवाई करेल याची कल्पना असताना भारतीय सैन्यानं अचूक वेळ साधत दहशतवाद्यांसह पाकिस्तानलाही धडा शिकवला आहे. अशातच या एअर स्ट्राईकच्या आघाताचे पडसाद सोमोर येत असताना या संदर्भात अतिशय महत्वाची माहिती समोर आली आहे. भारताच्या या हल्ल्यात देशाचा सर्वात मोठा शत्रू असलेल्या मसूद अजहरचं आख्खं कुटुंब संपलं असल्याची माहिती समोर आली आहे.

अधिक वाचा  शिवसेना खासदाराचं तळ्यात-मळ्यात; चार खासदार मतदारसंघात परतले ‘ऑपरेशन टायगर’चा डाव फसणार?

मसूद अझहरच्या भाऊ, बहिणीसह 14 जणांना मृत्यू

पुढे आलेल्या माहितीनुसार, पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवादी तळांवर भारतीय हवाई दलाने हल्ला करत दहशतवाद्यांच्या तळाला लक्ष्य केलं आहे. यातील एका तळावर वास्तव्यास असलेल्या मसूद अझहरच्या कुटुंबातील 14 सदस्यांचा मृत्यू झाला असल्यावची माहिती समोर आली आहे. सोबतच या हल्यात मसूद अझहरचा भाऊ रौफ असगर हा गंभीर जखमी झाला आहे. तर ठार झालेल्यांमध्ये मसूद अझहरचा भाऊ आणि भारताचा मोस्ट वॉन्टेड दहशतवादी रौफ असगरचा मुलगा हुजैफा यांचा देखील समावेश असल्याची माहिती पुढे आली आहे.

मसूद अझहरने आजवर भारताविरुद्ध अनेक वेळा मोठे कट रचले आहेत. मौलाना मसूद अझहर हा पाकिस्तानमध्ये वाढलेल्या जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेचा प्रमुख आहे. 2001 मध्ये संसदेवरील हल्ल्याचा कट त्यानेच रचला होता. यासह उरी हल्ल्यातही मसूद अझहर हाच सूत्रधार होता. गेल्या वर्षी जानेवारीमध्ये पठाणकोट येथील लष्कराच्या तळावरील हल्ल्यातही त्यांनी भूमिका बजावली होती.

अधिक वाचा  महाराष्ट्रासह १९ राज्यांत ‘मुसळधार’चा इशारा; ४८ तास महत्त्वाचे! २३जूनपर्यंत मान्सून महाराष्ट्रकडे पुढे सरकण्याची शक्यता

भारताकडून कोणत्या 9 ठिकाणांवर एअर स्ट्राईक?

(India Air Strike On Pakistan)

1. बहावलपूर जैश-ए-मोहम्मदचे मुख्यालय (आंतरराष्ट्रीय सीमेपासून 100 किमी अंतरावर)

2. मुरीदके लष्कर-ए-तैयबाचे मुख्यालय (सीमेपासून 30 किमी अंतरावर)

3. सवाई लश्कर-ए-तोयबाचा अड्डा (सीमेपासून 30 कि.मी.दूर)

4. गुलपूर दशतवाद्यांचा अड्डा ताबारेषेपासून 35 कि.मी. दूर (हल्ल्यावेळी 80 दहशतवादी)

5. बिलाल जैश-ए-मोहम्मदचं हवाई तळ (सीमेपासून 35 कि.मी.दूर)

6. कोटली नियंत्रण रेषेपासून 15 किमी अंतरावर (50 दहशतवादी उपस्थित होते.)

7. बरनाला दहशतवाद्यांचा अड्डा (सीमारेषेपासून 10 कि.मी.दूर)

8. सरजाल जैश-ए-मोहम्मद चा अड्डा (सीमेपासून 8 कि.मी.दूर)

9. महमूना हिजबुल्लाचं प्रशिक्षण केंद्र (सीमेपासून 15 कि.मी.दूर)

अधिक वाचा  संकल्प संस्थेच्या वतीने ‘पॅरा कौन्सिलिंग कोर्स’चा शुभारंभ; मानसिक आरोग्य क्षेत्रासाठी प्रशिक्षित समुपदेशक घडविण्याचा संकल्प

सर्वाधिक दहशतवाद्यांची उपस्थिती असलेले तळ केले बेचिराख-

बहावलपूरमध्ये 250 हून अधिक दहशतवादी

मुरिदकेमध्ये 120 हून अधिक दहशतवादी

मुजफ्फराबादमध्ये 110 ते 130 दहशतवादी

कोटलीमध्ये 75 ते 80 दहशतवादी

सियालकोटमध्ये 90 ते 100 दहशतवादी

गुलपूरमध्ये 75 ते 80 दहशतवादी

भिंबरमध्ये 60 हून अधिक दहशतवादी

चाक अम्रूमध्ये 70 ते 80 दहशतवादी