गेल्या आठ वर्षांपासून रखडल्या 125 उपजिल्हाधिकाऱ्यांना पदोन्नती; लवरकच 80 अतिरिक्त जिल्हाधिकारी पदे तयार करणार: शासन निर्णय

0

राज्यातील पदोन्नती रखडलेल्या अधिकाऱ्यांना महसूल विभागाने दिलासा दिला आहे. राज्यातील 125 उपजिल्हाधिकाऱ्यांना निवड श्रेणी पदावर पदोन्नती करण्यात आली आहे. ही पदोन्नती गेल्या आठ वर्षांपासून रखडली होती. आता त्यासंबंधित आदेश राज्याचे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले आहेत. तसेच राज्यात लवकरच 80 अतिरिक्त जिल्हाधिकारी पदे तयार करण्यात येणार आहेत. तसा शासन निर्णय जारी करण्यात आला आहे.

गेल्या आठ वर्षांपासून 125 उपजिल्हाधिकाऱ्यांच्या पदोन्नती रखडल्या होत्या. त्यावर आता महसूल विभागाने निर्यण घेतला आहे. या 125 उपजिल्हाधिकाऱ्यांची निवड श्रेणी पदावर पदोन्नती करण्यात आली आहे.

गेल्या वर्षी राज्यसेवेतील 23 अधिकाऱ्यांना IAS पदी बढती देण्याचा निर्णय घेण्यात आला होता. भारतीय प्रशासकी सेवा (भरती) नियम, 1954 च्या बढतीद्वारे नियुक्तीच्या नियमानुसार या राज्यसेवेतील अधिकाऱ्यांना IAS पदी देण्यात आली होती.

अधिक वाचा  महाराष्ट्रातील नव्हे, तर देशातील पहिलं ४० लाखांचे महापालिकेचे टॉयलेट स्वच्छतागृह की आलिशान घर बेडरूम हॉल अन् किचन!

राज्यसेवेतील कोणत्या अधिकाऱ्यांना IAS पदी बढती?

1. संजय ज्ञानदेव पवार

2. नंदकुमार चैतराम भेडसे

3. सुनील बजाजीराव महिंद्रकर

4. रवींद्र जीवाजीराव खेबुडकर

5. निलेश गोरख सागर

6. लक्ष्मण भिका राऊत

7. जगदीश गोपाळकृष्ण मनियार

8. माधवी समीर सरदेशमुख

9. बाळासाहेब जालिंदर बेलदार

10. डॉ. जोत्स्ना गुरुराज पडियार

11. आण्णासाहेब दादू चव्हाण

12. गोपीचंद्र मुरलीधर कदम

13. बापू गोपीनाथराव पवार

14. महेश विश्वास आव्हाड

15. वैदही मनोज रानडे

16. विवेक बन्सी गायकवाड

17. नंदिनी मिलिंद आवाडे

18. वर्षा मुकुंद लड्डा

19. मंगेश हिरामन जोशी

अधिक वाचा  राहुल गांधींच्या आंदोलनाला यश, दिल्ली पोलिसांत पेलेट गनप्रकरणी अखेर गुन्हा दाखल, FIR मध्ये मात्र अजब नोंद

20. अनिता निखील मेश्राम

21. गितांजली श्रीराम बाविस्कर

22. दिलीप ज्ञानदेव जगदाळे

23. अर्जुन किसनराव चिखले