सत्ताधारी आणि विरोधक देशाच्या दृष्टीने विषय मांडत आहेत. सत्ताधारी उत्तर देत आहे. असं म्हणतात. पण दुर्देवाने असं होत नाही. महत्त्वाच्या विषयांना बगल देऊन चर्चा नको त्या दिशेने भरकटवली जात आहे. गेल्या काही दिवसांपासून बांगलादेशात हिंदूंवर अत्याचार होत आहे. हल्ले होत आहे. दोन तीन महिन्यापूर्वी बांगलादेशचा संघ आला होता. बांगलादेशात हिंदूंवर अत्याचार होत असेल तर त्या संघासोबत खेळणं कितपतयोग्य आहे असं आदित्य म्हणाला होता. पण त्यावर उत्तर नाही, असं उद्धव ठाकरे म्हणालेत.