बिग बी यांची एक पोस्ट आणि राजकीय वातावरण तापलं; नेमकं प्रकरण काय ?

0
1

बिग बी अर्थात अमिताभ बच्चन हे चित्रीकरणामध्ये कितीही व्यस्त असले तरीही ते सोशल मीडियावरही चांगलेच सक्रीय असतात. इन्स्टाग्राम, फेसबूक किंवा X (पूर्वीचं ट्विटर) या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून ते चाहत्यांसाठी काही ना काही पोस्ट करत असतात. बिग बी यांचे चाहतेही त्यांच्या पोस्ट्सची आतुरतेने वाट पहात असतात. त्यावर अनेक लाइक्स आणि कॉमेंट्स येतात. नेहमीप्रमाणे अमिताभ यांनी नुकतंच एक ट्विट केलं, पण त्यांच्या या ट्विटमुळे नवा राजकीय वाद रंगताना दिसत असून सर्वांचंच त्याकडे लक्ष वेधलं गेलं आहे.

काय आहे बिग बींचं ते ट्विट ?

अमिताभ बच्चन त्यांच्या प्रोजेक्ट्सबद्दल, त्यांच्या दिवसातील एखाद्या खास घटनेबद्दल पोस्ट लिहून ट्विट करत असतातच. नेहमीप्रमाणे काल (2 मे) दुपारी त्यांनी एक ट्विट केलं पण त्यावरून राजकीय वाद सुरू झाला. अमिताभ बच्चन हे काही कामानिमित्त दक्षिण मुंबईत आले होते, त्यासाठी त्यांनी कोस्टल रोडद्वारे जुहू ते मरीन ड्राईव्ह असा प्रवास 30 मिनिटांत केला. त्याबद्दलची पोस्ट लिहीत अमिताभ यांनी त्यांचा अनुभव शेअर केला. ” वाह ! क्या बात है ! साफ़ सुथरी नयी बढ़िया सड़क, कोई रुकावट नहीं ” असे लिहीत त्यांनी ही पोस्ट शेअर केली.

अधिक वाचा  राज्य मंत्रीमंडळ बैठकीत 14 निर्णय; मुंबई- ठाणे नविन मेट्रो मार्गिका, पुणे-लोणावळा हा निर्णय, सर्व जाणून घ्या! 

मात्र त्यांच्या या पोस्टला राजकीय वादाचा रंग चढला आहे. खरंतर अमिताभ यांनी ही पोस्ट शेअर केल्यावर भाजप महाराष्ट्रतर्फे त्यांच्या ट्वीटला रिप्लाय करण्यात आला. आज हमारे पास ‘कोस्टल रोड’ है… असं म्हणतं भाजपने अमिताभ बच्चन यांचे आभार मानले. आज हमारे पास ‘कोस्टल रोड’ है… असे त्यांनी म्हटले.

भाजपाने मानले आभार

पंतप्रधान मोदी आणि देवेंद्र फडणवीस यांच्यामुळे मुंबईकरांचा प्रवास वेगवान होतोय असा दावा करण्यात आला. ‘ धन्यवाद अमिताभ बच्चन जी, धर्मवीर स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज मुंबई कोस्टल रोड टनल मधून तुम्ही प्रवास केलात याचा आम्हाला आनंद आहे. देशाचे आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वात आणि राज्याचे विकासपुरुष उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्यामुळेच मुंबईकरांचा प्रवास वेगवान होतोय. भविष्यातदेखील मुंबईकरांना आणि राज्यातील जनतेला उत्तम दर्जाचे रस्ते आणि पायाभूत सोयीसुविधा मिळणार हीच मोदीजींची गॅरंटी..’ असं म्हणत भाजप महाराष्ट्राने बिग बींचे ट्विट शेअर केले.

अधिक वाचा  राज्यव्यापी OBC नेते आक्रमक थेट मराठा आरक्षणाचा शासन निर्णय फाडला, राज्यव्यापी आंदोलनही करणार 

आज हमारे पास ‘कोस्टल रोड’ है….

आदित्य ठाकरेंचे प्रत्युत्तर

पण शिवसेना ठाकरे गटाते नेते आदित्य ठाकरे यांनी मात्र भाजपचा हा दावा खोडून काढला. भाजपच्या ट्विटला प्रत्युत्तर देत आदित्य ठाकरेंनी टीका केली. आपल्या ट्विटमध्ये त्यांनी कोस्टल रोडबाबात माहिती दिली. कोस्टल रोडचे श्रेय भाजपने घेणे हे हास्यास्पद असल्याचे त्यांनी ट्विटमध्ये नमूद केले.

या ट्विटमध्ये त्यांनी कोस्टल रोडबद्दल माहिती देत कोस्टल रोडच्या निर्मितीपासून ते आतापर्यंतचा घटनाक्रम कथन केला. तसेच उद्धव ठाकरे यांनी कोस्टल रोड प्रोजेक्टची घोषणा आणि अंमलबजावणी केली होती, असे त्यांनी नमूद केले. भाजपचं यात काहीही योगदान नसल्याचं त्यांनी ट्विटमध्ये लिहीले. त्यावेळेसचे फोटोही आदित्य यांनी पोस्ट केले, कोस्टल रोडसाठी काय काय उपाययोजना, याची माहिती पोस्ट केली.

अधिक वाचा  मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण मागे घेतलं मराठे पुन्हा तहात हरले? शासन निर्णयावर कोण कोण काय म्हणालं?