ओम राऊत दिग्दर्शित आदिपुरुष या चित्रपटाबद्दल बरेच वाद विवाद सुरु आहे. आदिपुरुषमधील चित्रपट संवाद आणि दृश्यांवर प्रेक्षक अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत. यातच चित्रपटाचे लेखक मनोज मुंतशीर याच्यावर प्रेक्षकांचा जरा जास्तच राग आला आहे. सोशल मिडियावर त्यांचीच चर्चा जास्त आहे. नेटकरी मनोज मुंतशीर यांना सोशल मिडियावर वाईटरित्या ट्रोलही करत आहेत.






ये रामायण दिखाओगे ? नालासोपाराच्या थिएटरमध्ये ‘आदिपुरूष’ चा शो बंद पाडला
दरम्यान, आदिपुरुष चित्रपटाचे संवाद लेखक मनोज मुंतशीर यांनी मुंबई पोलिसांकडे संरक्षण पुरवण्याची मागणी केली आहे. या वादानंतर आपल्याला धोका असल्याचे मनोज मुंतशीर यांनी म्हटले आहे.
मुंबई पोलिसाकडे ही मागणी करण्यात आली आहे. पोलिस लेखकाच्या अर्जावर विचार करत होते. दरम्यान आता पोलिसांनी लेखक मनोज मुंतशीर यांना पोलिस संरक्षण दिलं आहे. या प्रकरणाचा तपास सुरू असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे.
सेन्सॉर बोर्ड धृतराष्ट्र झालंय का? समाजवादी पार्टीचे नेते अखिलेश यादव आदिपुरुषवर संतापले
चित्रपट रिलिज झाल्यापासून सोशल मीडियाद्वारे संवादावरुन ‘आदिपुरुष’ला ट्रोल करण्यात येत आहे. ‘कपडा तेरे बाप का, तेल तेरे बाप का, आग भी तेरे बाप की, तो जलेगी भी तेरे बाप की..” असा संवाद ऐकल्यानंतर तर प्रेक्षक भडकलेच. यासारखे आणखी काही डायलॉग आहेत ज्यावर आक्षेप व्यक्त करण्यात येत आहेत.
डायलॉग, लुक नंतर आता बिभिषणच्या पत्नीवरुन राडा! भाजप नेता भडकले..
अनेक संवादांवर आक्षेप घेण्यात आले आणि लेखक मनोज मुंतशीर यांच्यावर कडाडून टिका करण्यात आली. असे छपरी संवाद चित्रपटातुन काढून टाकण्यात यावेत अशी मागणीही चाहत्यांनी केली होती. त्यानंतर मनोज मुंतशीर यांनी देखील याची दखल घेतली होती.
त्यानंतर हे डायलॉग आम्ही चित्रपटातुन काढून टाकू असे सांगितले. एक पोस्ट शेयर करत त्यांनी ही माहिती दिली होती. या शेयर करण्यात आलेल्या पोस्टमध्ये मनोज मुंतशीर यांनी सांगितले की, त्यांनी या चित्रपटात 4000 हून अधिक संवाद लिहिले आहेत. मात्र त्यांनी लिहिलेल्या 5 डायलॉग्सवर लोकांचा आक्षेप आहे. अशा स्थितीत आठवडाभरात हे संवाद बदलले जातील.
‘दादा तुम्हाला आदिपुरुषबद्दल काय वाटतं?’, अजित पवारांनी कडक शब्दांत सुनावलं
‘आदिपुरुष’ 16 जून रोजी सिनेमागृहात प्रदर्शित झाला. या चित्रपटात प्रभास भगवान श्रीरामाच्या भूमिकेत आहे. तर क्रिती सेनन माता जानकीच्या भूमिकेत तर सैफ अली खानला रावणाच्या भूमिकेत आहे. रिलिजच्या तीन दिवसातच या चित्रपटाने तुफान कमाई करत 300 कोटींचा आकडा पार केला आहे.













