‘नियत, नीती आणि निर्णय’ यांच्या एकत्रित परिणामामुळे भारताचा विकास; हे आपणा सर्वांचे यश: पंतप्रधान मोदी

0

देशाची दीर्घकाळ सेवा करण्याचे भाग्य लाभले. ‘नियत, नीती आणि निर्णय’ यांच्या एकत्रित परिणामामुळे भारताचा विकास झाला आहे. केंद्रातील एनडीए सरकारलाही १२ वर्षे पूर्ण झाली. हे वैयक्तिक नव्हे, तर आपणा सर्वांचे यश आहे. या क्षणी मी भावूक झालो आहे असे उद्गार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी काढले.

मोदी हे भारताचे सलग सर्वाधिक काळ कार्यरत राहिलेले निवडून आलेले पंतप्रधान ठरले. यानिमित्त दिल्लीत भारत मंडपम येथे एनडीएची विशेष बैठक झाली. पंतप्रधानपदावर ४,३९९ दिवसांचा कालावधी पूर्ण करून विक्रम केल्याबद्दल त्यांचे एनडीएतील घटक पक्षांच्या प्रमुख नेत्यांनी याप्रसंगी अभिनंदन केले. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डाेनाल्ड ट्रम्प यांनीही साेशल मीडियावर पाेस्ट करत माेदींचे अभिनंदन केले आहे.

अधिक वाचा  मतदारसंघ पुनर्रचना नवा फॉर्म्युला, दक्षिण-उत्तर वादही मिटणार? उत्तर अन् दक्षिण भारताचे असे होणार संतुलन

मंद आर्थिक वाढीला काॅंग्रसने ‘हिंदू टॅग’ लावला

पंतप्रधान माेदी म्हणाले, १२ वर्षात देशाला काॅंग्रेसच्या दुष्टचक्रातून मुक्ती मिळाली आहे. काँग्रेस सत्ताकाळातील मंद आर्थिक वाढीला चलाखीने हिंदू ग्रोथ रेट असे नाव देण्यात आले, मात्र तिला ‘काँग्रेस ग्रोथ रेट’ असे म्हणायला हवे.काँग्रेसने आपल्या अपयशाचा ठपका देशातील हिंदू समाजावर ठेवला. काँग्रेसने देशाला असहायता, दारिद्र्य आणि न्यूनगंडाच्या गर्तेत ढकलले. भारतामध्ये वेगवान प्रगती शक्य नाही, अशी मानसिकता तयार केली. परंतु, आता देशातील जनतेने राजकीय स्थैर्य आणि निर्णायक शासनाचे महत्त्व ओळखले आहे, असेही ते म्हणाले.

‘विकसित भारता’मागे ‘सबका प्रयास’ हीच प्रेरणा –

अधिक वाचा  भाजपच्या बंडखोरामुळे शिवसेनेला घाम फुटला; दोन्ही संकटमोचक फेल, आता चेंडू मुख्यमंत्र्यांच्या कोर्टात

मोदी यांनी सांगितले की, ‘विकसित भारत’ घडवण्यामागे ‘सबका प्रयास’ हीच प्रेरक शक्ती आहे. एनडीए सरकारच्या १२ वर्षांत इतकी कामे होऊ शकतात, तर मागील अनेक दशकांत ती का झाली नाहीत? हा एक महत्त्वाचा प्रश्न आहे. काँग्रेस सत्तेत असतानाच्या काळातील विकासदर आणि एनडीए सरकारच्या विकासदरातील यात मोठा फरक आहे..

मोदी यांच्या कार्यकाळात महाराष्ट्र विकासाला दिशा –

नव्या आत्मनिर्भर भारताच्या उभारणीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे स्थान अढळ असून त्यांच्या बारा वर्षांच्या कारकिर्दीत महाराष्ट्राच्याही विकासाला नवी दिशा मिळाली, असे गौरवोद्गार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी नवी दिल्लीत काढले. पंतप्रधान म्हणून सर्वाधिक काळ सलग सेवा देण्याचा ४ हजार ३९९ दिवसांचा ऐतिहासिक टप्पा पूर्ण केल्याबद्दल पंतप्रधान मोदी यांचे मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्राच्यावतीने अभिनंदन केले.

अधिक वाचा  महाराष्ट्रात २५ जिल्ह्यांना यलो अलर्ट! मुंबई-पुण्यात पाऊस कधी? स्कायमेटनं सांगितली तारीख