पुन्हा वर्क फ्रॉम होम? 2 कोटी लिटर पेट्रोल डिझेलची बचत; लॉकडाऊनची चर्चा? PM नेमकं काय म्हणाले…

0

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी तेलंगणामधील सिंकदराबाद इथे केलेल्या भाषणामुळे भारतात पुन्हा एकदा लॉकडाऊन लागतो की काय अशी भीती भारतीयांमध्ये निर्माण झाला आहे. अमेरिका – इराण युद्धाच्या पार्श्वभूमीवर मोदींनी देशाला एक विशेष आवाहननंतर लोकांना कोरोना काळाची आठवण होतेय. खरंतर मोदींनीही त्यांच्या भाषणातून कोरोना काळाचा उल्लेख केला आहे. मोदींनी भारतीयांना आवाहन केलं की, पेट्रोल आणि डिझेलचा वापर कमी करावा. त्यासाठी लोकांनी घरून काम करण्याचेही आवाहन मोदींनी भारतीयांना केलं आहे. त्यामुळे पुन्हा एकदा भारतात लॉकडाउनसारखी परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे का, यावर चर्चा सुरू झाली आहे.

पुन्हा एकदा भारतात लॉकडाउनसारखी परिस्थिती?

पंतप्रधान मोदी म्हणाले की, जागतिक अर्थव्यवस्था आणि वाढत्या तेल आणि वायूच्या किमती पाहता, लोकांनी शक्यतोवर सार्वजनिक वाहतूक, मेट्रो, बस आणि ट्रेनचा वापर करावा. याशिवाय, इंधनाची बचत करण्यासाठी लोकांनी कारपूलिंग करावे. तसंच इंधन बचतीसाठी घरुन काम करण्यावर भर द्या. जास्तीत जास्त लोक घरुन काम करतील याची काळजी घ्यावी. कोरोना काळाची आठवण करून देताना मोदी म्हणाले की, कोविड-19 महामारीच्या काळात आपण अनेक नियमांचे पालन केलंय, ज्यांचे आता पुन्हा पालन करणे कठीण नाही.

अधिक वाचा  प्रतीक्षा संपली, दहावीचा आज निकाल गुणपडताळणी छायाप्रतीसाठी अर्ज ९ मे ते २३ मे पर्यंत ऑनलाईनच

आठवड्यातून 3 दिवस वर्क फ्रॉम होम केल्यास काय परिणाम होईल?

तेल आयातदार देशांमध्ये जगातील भारत हा तिसरा मोठा देश आहे. भारत कच्चा तेलाच्या गरजेपैकी सुमारे 85% परदेशातून खरेदी करतो. मध्य पूर्व मधील संघर्षामुळे इंधन तुटवड्याचं संकट गेल्या काही महिन्यांपासून जगावर ओढवलं आहे. अमेरिका – इराण युद्धाचा फटका भारतालाही अप्रत्यक्ष बसला आहे. या सर्वांचा परिणाम भारतीय अर्थव्यवस्था, महागाई आणि सर्वसामान्यांच्या खिशाला बसताना दिसतोय. त्यामुळे हे संकट अधिक गडद होऊ नये म्हणून पंतप्रधान मोदींना लोकांना वर्क फ्रॉम होम करण्याचे आवाहन केलंय.

जर भारतातील प्रमुख शहर म्हणजे दिल्ली, मुंबई, बंगळूर, हैदराबाद, पुणे आणि गुरुग्राम यांचा विचार केला तर मोठ्या कंपन्यांनी आठवड्यातून दोन ते तीन दिवस वर्क फ्रॉम होम लागू केल्यास राष्ट्रीय अर्थव्यवस्थेलाही मोठा फायदा होईल असं आंतरराष्ट्रीय संबंध आणि भारताच्या परराष्ट्र धोरणा तज्ज्ञ डॉ. शैलेंद्र देवळाणकर यांचं मत आहे.

अधिक वाचा  पश्चिम बंगालमध्ये पहिल्या ४५ दिवसांत अजेंड्यावर ही कामे? यांना प्रति महिना ३०००, लव्ह लँड जिहाद, घुसखोरी, समान नागरी कायदा

दिल्ली, मुंबई, बंगळूर, हैदराबाद, पुणे आणि गुरुग्राम याठिकाणी सर्वाधिक वाहने हे रस्त्यावर असतात. इथे वर्क फ्रॉम होम सुरु झाल्यास दररोज अंदाजे 2 कोटी लिटर पेट्रोल आणि डिझेलची बचत होऊ शकते असा अंदाज तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे. त्यांनी पुढे इंधन बचतीबद्दलचं गणित सांगितलं. ते म्हणाले की, हा हिशोब वार्षिक स्तरावर बघितला तर अंदाजे 700 ते 750 कोटी लिटर इंधनाची बचत होऊ शकते. याचा किंमतीत बोलायंच झालं तर आर्थिक मूल्य 70000 कोटी रुपयांपेक्षा जास्त असणार आहे. ही रक्कम अनेक राज्यांच्या वार्षिक अर्थसंकल्पाएवढी असून याचा अर्थ केवळ आपल्या कार्यपद्धतीत बदल करून भारत हजारो कोटी रुपयांच्या परकीय चलनाची बचत होऊ शकते.

अधिक वाचा  ममतांच्या सत्तेला सुरुंग लावणारे ते ‘मुद्दे’ नक्की कोणते? ज्यामुळे निकाल पालटले