पुणे महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये कर्वेनगर प्रभाग 30 चे आराखडे बांधताना भारतीय जनता पक्षाने राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने अनेक फेरबदल करत नव्या चेहऱ्यांना संधी देण्यात आली असली तरी प्रभागाची गरज आणि होतकरू तरुणीला मदत या एकमेव उद्दिष्ट प्राप्तीसाठी संसदरत्न खासदार सुप्रियाताई सुळे आणि महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी प्रभाग क्रमांक (30 क) एकत्र येत पुणे शहरातील एकमेव मैत्रीपूर्ण लढत अधिकृत ‘तुतारी वाजवणारा माणूस’ चिन्हासह लढण्याची भूमिका घेतली आहे. नव्या तरुणांमधील नेतृत्व गुण ओळखण्याची पारख असलेल्या ताई दादांनी मनिषाताई विरेश शितोळे यांच्यासाठी घेतलेला निर्णय प्रभागाची गणिते बदलण्यास पूरक झाला असून प्रचाराच्या उत्साहाला नवा रंग चढला आहे.






कर्वेनगर भागात शितोळे परिवाराबाबत असलेली सहानुभूती आणि नव्या पिढीतील नेतृत्व गुणामुळे निर्माण झालेली वेगळी ओळख मनिषा शितोळे यांच्या जमेच्या बाजू बनल्या आहेत. कर्वेनगर भागातील मतदारांच्या प्रचंड आग्रहास्तव राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील ताई दादा दोन्ही शीर्षस्थ नेतृत्वाने मनीषा शितोळे यांच्या नेतृत्व गुणाला वाव देण्यासाठी ‘तुतारी वाजवणारा माणूस’ ही अधिकृत चिन्ह दिले आहे. पुणे महापालिकेच्या हद्दीमध्ये कोथरूड आणि वारजेच्या अगोदर कर्वेनगर भागाचा समावेश झाला तरीसुद्धा गावकी-भावकीच्या राजकारणामध्ये ‘विकासगंगा’ आटलेली असतानाच विनम्र अभ्यासू युवा नेतृत्व म्हणून मनिषा विरेश शितोळे आशादायी पर्याय मतदारांच्या समोर निर्माण झाला आहे. काल संध्याकाळी कर्वेनगरचे ग्रामदैवत श्री. काळभैरवनाथ यांच्या चरणी नतमस्तक होत प्रचाराचा शुभारंभ झाला असून आज सकाळी नऊ वाजल्यापासून मतकौल मागण्यासाठी होतकरू तरुणी प्रभागामध्ये सक्रिय झाली आहे.
कर्वेनगर प्रभाग 30 लढतीचे चित्र बदलले; युवा ‘छावा’ मैदानात १० हजार लाडक्या बहिणींसह ‘भवानीमाते’च्या चरणी
सुशिक्षित युवा चेहरा अन लाडक्या बहिणींची हक्काची आधार मनिषा विरेश शितोळे यांनी सक्रिय होत कर्वेनगर भागातील लढतीचे चित्र बदलले आहे. कर्वेनगर परिसरात सत्ताधारी भारतीय जनता पक्षाला प्रथमच लक्षणीय यश मिळूनही आपापसातील वाद-विवादामुळे प्रभागामध्ये कोणताही विशेष प्रकल्प घडले नाही. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष यांच्या वतीने उच्चशिक्षित मितभाषी युवा ‘तरुणी’ मैदानात उतरली असून मतरुपी आशीर्वाद मिळवण्यासाठी अहोरात्र प्रयत्न करत आहे. कर्वेनगरमध्ये गेली चार वर्ष अनेकांना ‘भावी’ची दिवास्वप्ने रंगवली होती अनेकांनी सुरक्षित जागी कोलांटउड्याही मारल्या; परंतु सामाजिक पिंड अन सलोख्याची भावना जपत ‘प्रभावी’ एकच! म्हणत राजकीय गणिताची जुळवा-जुळव बदलली आहे. विनम्र मितभाषी आणि गोरगरिबांच्या अडचणी सोडवण्यास आग्रही मनिषाताईचे कार्यच निवडणुकीच्या रणांगणात स्नेह परिवाराचे वलय म्हणून उभे राहिले आहे. राजमुद्रा प्रतिष्ठानच्या मार्फत या ‘शिवकन्ये’ने ‘प्रत्येक कुटुंबासाठी कुटुंबातील प्रत्येकासाठी – विरेश शितोळे’ घोषउद्गाराने प्रचाराचा शुभारंभ करण्यात आला आहे.











