उद्धव ठाकरेंच्या पुण्यातील गडाला(कोथरुड) सुरंग?; पदाधिकाऱ्यांचा सामुहिक ‘जय महाराष्ट्र’; हे मोठं कारण समोर

0

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते असलेले उद्धव ठाकरे यांना नवीन वर्षांत जोरदार धक्का बसणार आहे. विधानसभा निवडणुकीत आलेल्या अपयशानंतर उद्धव ठाकरे यांच्या पुण्यातील गडाला सुरंग लागणार असल्याची चिन्ह निर्माण झाली आहे. पुणे येथील पाच माजी नगरसेवक उद्धव ठाकरे यांच्या पक्षाला सोडणार आहे. पुणे विभागामध्ये भारतीय जनता पक्षाचे वाढते वर्चस्व लक्षात घेता आगामी भविष्य सुरक्षित करण्याच्या दृष्टीने ते सर्व भारतीय जनता पक्षात प्रवेश करणार आहे. मुळात पुणे शहरातील मुख्य निर्णयाची पदे उपभोगणाऱ्या आणि पुणे महापालिकेमध्ये सक्रिय असलेला गटच सुरक्षित भविष्यासाठी पक्षांतर करत असल्यामुळे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत उद्धव ठाकरे यांना हा मोठा झटका असणार आहे.

अधिक वाचा  जनशक्ती पुढे महाशक्ती पराभूत! जैन बोर्डिंग व्यवहार रद्द होणार, नैतिकता अखेर जागृत व्यवहारातून बाहेर पडण्याचा विशाल गोखलेंचा निर्णय

नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)पक्षातर्फे पुणे शहरातील तीन आणि जिल्ह्यातील दोन मतदारसंघांमध्ये दावा करण्यात आला होता परंतु महाविकास आघाडी बरोबरची गणिते जुळताना शिवसेनेला नरमाईची भूमिका घ्यावी लागली त्यामुळे संघटनेमध्ये प्रचंड नैराश्य आले आहे. यामध्ये सर्वात आश्चर्यकारक गोष्ट म्हणजे कोथरूड विधानसभा मतदारसंघांमध्ये शिवसेनेला निवडणूक लढण्याची संधी मिळालेली असतानाही दारुण पराभव झाल्याने संघटनेमध्ये मरगळ आलेली आहे त्यातच कायम निर्णायक भूमिका घेणारा घटक भाजपवासी होत असल्याने पाच जानेवारी रोजी यामध्ये आणखी किती भर (माजी मंत्री आणि सुपुत्र यांचीही चर्चा आहे) पडणार हेही पहावे लागणार आहे.

अधिक वाचा  हैदराबाद गॅझेट जीआरला तात्काळ ‘स्थगिती’स सुप्रीमचा नकार; आता मुंबई उच्च न्यायालयात नियमित सुनावणी होणार

पालिका निवडणुकीत होणार अडचण

पुण्यात उद्धव ठाकरे यांच्या शिवसेना पक्षाला मोठा धक्का बसणार आहे. भाजपकडून हा झटका उद्धव ठाकरे यांना देण्यात येणार आहे. उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे ५ माजी नगरसेवक भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत.

राज्यातील रखडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होण्याची चिन्ह निर्माण झाली आहे. राज्य सरकार यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयात भूमिका मांडणार आहे. त्यामुळे राज्यातील विविध पक्ष स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी मोर्चा बांधणी करण्यास लागले आहे. त्यावेळी शिवसेना उबाठाला पुण्यात धक्का बसणार आहे. आगामी पालिका निवडणुकीच्या तोंडावर ठाकरे यांना हा मोठा धक्का समजला जात आहे.

काय आहे या नेत्यांचा आरोप

अधिक वाचा  हवामान विभागाकडून नकोसा इशारा जारी…अवकाळीचा वादळी मारा सोसण्यासाठी तयार राहा!

उद्धव ठाकरे यांचे पुण्यात लक्ष नाही. त्यामुळे माजी नगरसेवक अस्वस्थ झाले आहेत. त्यातील पाच जणांना भाजपमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे. हे सर्व जण मुंबईत पाच जानेवारी रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. त्यामध्ये बाळा ओसवाल, विशाल धनवडे यांच्यासह आणखीन चार नगरसेवकांचा समावेश आहे.

विधानसभा निवडणुकीत उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला मोठा धक्का बसला. त्यांचे केवळ २० आमदारच निवडून आले. त्याचवेळी राज्यातील त्यांच्या पक्षाचे कार्यकर्ते स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावर लढण्याची भाषा करत आहेत. या परिस्थिती स्थानिक पातळीवर नेते पक्ष सोडत असल्यास उद्धव ठाकरे यांच्यासमोर मोठे आव्हान असणार आहे.