देशात हिंदू धर्मशास्त्रानुसार, 28 ऑगस्ट रोजी रक्षाबंधनाचा सण साजरा केला जाणार आहे. या दिवशी ग्रहांचे अनेक दुर्लभ संयोग जुळून येणार आहेत. या दिवशी चंद्रग्रहण, भद्रा आणि पंचकसह ग्रहांच्या विशेष स्थितीचे अशुभ संकेत आहेत. हिंदू पंचांगानुसार, रक्षाबंधनच्या दिवशी तीन ग्रह वक्री चाल चालणार आहेत. तर, एक ग्रह अस्त होणार आहे. त्यामुळे चार ग्रह या दिवशी अशुभ फळ देणार आहेत.







या दिवशी राहू-केतू व्यतिरिक्त शनि ग्रह उलटी चाल चालणार आहेत. तर, बुध ग्रह अस्त अवस्थेत असमार आहे. त्यामुळे याचा प्रभाव चार राशींच्या लोकांवर होणार आहे.
या राशी कोणत्या आहेत ते जाणून घेऊयात.
मेष रास
मेष राशीच्या लोकांवर शनिच्या साडेसातीचा पहिला टप्पा सुरु आहे. त्यामुळे चंद्रग्रहणाचा परिणाम या राशीच्या अडचणीत वाढ निर्माण करु शकतो. या काळात तुमचा मानसिक तणाव वाढेल. तसेच, तुमची कामे रखडली जातील. तुमचा आत्मविश्वास कमी पडेल. मुलांच्या करिअरमध्ये देखील तुम्हाला चढ-उतार जाणवतील.
मिथुन रास
मिथुन राशीच्या लोकांसाठी हे चंद्रग्रहण फार भावनिक असणार आहे. या काळात तुमच्या उत्पन्नात झालेली घट दिसून येईल. पैशांच्या बाबतीत तुम्हाला सावधानता बाळगण्याची गरज आहे. तसेच, लांबचे प्रवासाचे योग टाळा.तुमच्या कामांवर लक्ष केंद्रित करा. आर्थिक बाबतीत निर्णय घेताना नीट विचारपूर्वक घ्या.
सिंह रास
सिंह राशीच्या लोकांवर शनिच्या ढैय्याचा प्रभाव सुरु आहे. तसेच, चंद्रग्रहण असल्यामुळे तुम्हाला मनाप्रमाणे काम करता येणार नाही. या काळात तुम्हाला तुमच्या आरोग्यावरही लक्ष केंद्रित करावं लागेल. तुमची धनहानी होऊ शकते. आर्थिक बाबतीत निर्णय घेताना सावध राहण्याची गरज आहे.
कुंभ रास
कुंभ राशीतच चंद्रग्रहण लागणार आहे. तसेच, या राशीवर शनिच्या साडेसातीचा तिसरा टप्पा सुरु आहे. या काळात तुमच्या वैवाहिक जीवनात तणाव जाणवू शकतो. तुमच्यातील धैर्य, साहस आणि आत्मविश्वास कमी दिसून येईल. तसेच, तुमच्या मेहनतीचं फळ न मिळाल्यामुळे तुम्ही निराश व्हाल.
(टीप : वरील बाबी केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून लोकायत न्यूज कोणताही दावा करत नाही.)












