राज्यातील बहुतांश भागात पावसाने उघडीप दिली आहे. कोकण आणि घाटमाथ्यावर काही ठिकाणी हलक्या ते मध्यम सरी सुरू आहेत. मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात पावसाने उघडीप दिली आहे. त्यामुळे पिकांना पावसाची प्रतीक्षा आहे. पुढील ४ दिवस ऊन-सावल्यांचा खेळ सुरू राहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.







पुणे आणि सातारा जिल्ह्यांच्या घाटमाथ्यासह मुंबई, ठाणे, रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यांना येलो अलर्ट देण्यात आला आहे. या भागांत काही ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे. उर्वरित राज्यात अंशतः ढगाळ हवामान राहण्याची शक्यता आहे. काही ठिकाणी ऊन-सावल्यांचा खेळ सुरू राहील.
तुरळक ठिकाणी हलक्या सरी पडण्याचा अंदाज आहेउद्या पुणे घाटमाथ्यावर जोरदार पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. नाशिक, सातारा आणि कोल्हापूर घाटमाथ्यासह मुंबई, ठाणे, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांना येलो अलर्ट देण्यात आला आहे.
उत्तर-पश्चिम मध्य प्रदेश आणि परिसरात कमी दाबाचे क्षेत्र कायम आहे. त्यामुळे राज्यातील काही भागांत पावसाच्या सरींची शक्यता कायम आहे.













