10 दिवसांत तिसऱ्यांदा वाढलं पेट्रोल डिझेल; तेल कंपन्यांचा आर्थिक ताण कमी करण्यासाठी ही दरवाढ मुंबईत आजचे दर काय

0

जागतिक बाजारातील घडामोडींमुळे देशात सलग पेट्रोल आणि डिझेलच्या किमती वाढत असून, आज शनिवारी पुन्हा एकदा इंधन दरात ८७ ते ९१ पैशांची वाढ करण्यात आली आहे. महागाईनं सर्वसामान्य लोकांचं कंबरडं पार मोडून गेलं आहे. १० दिवसांत आता तिसरा धक्का बसला आहे. सलग तिसऱ्यांदा पेट्रोल डिझेलच्या दरात वाढ करण्यात आली आहे. गेल्या अवघ्या १० दिवसांच्या आत झालेली ही तिसरी मोठी दरवाढ आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात सुरू असलेल्या घडामोडींमुळे तेल कंपन्यांवर असलेला आर्थिक ताण कमी करण्यासाठी ही दरवाढ सलगपणे लागू केली जात असल्याचे सांगितले जात आहे.

अधिक वाचा  सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात ‘महात्मा फुले अध्ययन पीठ’ वर्षानुवर्षे रिक्त केवळ राजकीय वापर नको : ओबीसी नेते मृणाल ढोले पाटील

नव्या दरवाढीनुसार, दिल्लीमध्ये पेट्रोलच्या दरात प्रति लिटर ८७ पैशांची वाढ झाली आहे. यामुळे आधी ९८.६४ रुपये प्रति लिटर मिळणारे पेट्रोल आता ९९.५१ रुपयांवर गेले आहे. दुसरीकडे, डिझेलच्या दरातही प्रति लिटर ९१ पैशांची मोठी वाढ करण्यात आली असून, दिल्लीत डिझेल ९१.५८ रुपयांवरून थेट ९२.४९ रुपयांवर पोहोचले आहे. दिल्लीत पेट्रोल आता अवघ्या ४९ पैशांनी शंभरी गाठण्यापासून दूर आहे, तर मुंबईसह देशातील इतर मोठ्या शहरांमध्ये पेट्रोलने आधीच शंभरी पार केली असून आजच्या वाढीमुळे ते आणखी महाग झाले आहे.

2022 नंतर आता इराण विरुद्ध अमेरिका सुरू झालेल्या युद्ध संघर्षामुळे दरवाढ सुरू झाली आहे. १५ मे पासून सलग तिसऱ्यांदा दरवाढ झाली. तेल कंपन्यांनी वाढलेल्या किमतींचा बोजा आता हळहळू सर्वसामान्य जनतेच्या खिशावर टाकण्यास सुरुवात केली. 15 मे रोजी पेट्रोल-डिझेलच्या दरात थेट ३ रुपयांची वाढ करण्यात आली होती. १९ मे रोजी पुन्हा एकदा ९० पैशांची दरवाढ झाली. आज पुन्हा एकदा ८७ ते ९१ पैशांची वाढ झाली आहे. या सर्व वाढींची एकूण गोळाबेरीज केली, तर गेल्या अवघ्या १० दिवसांत पेट्रोल आणि डिझेलचे दर प्रति लिटर जवळपास ५ रुपयांनी वाढलं आहे.

अधिक वाचा  सुनेत्रावाहिनी भाजपबद्दल पहिल्यांदाच थेट बोलल्या; ‘अधिवेशनानंतर 7 दिवसांत अर्थखातं राष्ट्रवादीला देणार होते, मात्र, 2 महिन्यानंतरही..’

पश्चिम आशियामध्ये सुरू असलेल्या युद्धाच्या तणावामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचे दर सतत बदलत आहेत. जागतिक पातळीवर ऊर्जा पुरवठा साखळीवर मोठा दबाव आल्यामुळे कच्चे तेल महाग झाले आहे. भारतीय तेल कंपन्यांना होणारा तोटा भरून काढण्यासाठी ही दरवाढ केली जात आहे. मात्र, ऐन उन्हाळ्यात आणि महागाईच्या काळात सलग होणाऱ्या या इंधन दरवाढीमुळे वाहतूक खर्च वाढून सर्वसामान्य नागरिकांचे बजेट पूर्णपणे कोलमडण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. या सगळ्याचा परिणाम म्हणून महागाई वाढत आहे.