वारजे माळवाडी सुमारे एक लाख लोकवस्ती असलेल्या नागरिकांसाठीची एकमेव स्मशानभूमीकडे जाणारा मुख्य रस्ता मुंबई बेंगलोर बाह्यवळण महामार्गाच्या सेवा रस्त्यामुळे विस्कळीत झालेला पूर्ण करण्यात युवा नगरसेवक भारत भूषण बराटे यांना यश आले असून स्थानिक पातळीवरील सर्वात मोठी अडचण या निमित्ताने दूर झाली आहे. माजी उपमहापौर दिलीपभाऊ बराटे यांच्या मार्गदर्शनाखाली महानगरपालिकेचे पथ विभाग, विद्युत विभाग आणि NHAI यांच्या सोबत मे २०२६ ला झालेल्या पाहणी नंतर दिलेल्या वेळेत रस्ता पूर्ण करण्यासाठी स्थानिक नगरसेवक भारत भूषण मराठी यांनी प्रशासकीय पातळीवर पाठपुरावा करून जागामालकांच्या सामंजस्यातूनरस्त्याचे काम पूर्ण केले.






मुंबई बेंगलोर सेवा रस्त्याचे काम सुरू झाल्यानंतर नदी पात्रालगत असलेल्या वारजे स्मशानभूमी परिसराला सर्वात जास्त फटका बसला. संबंधित ठेकेदाराकडून स्थानिक नागरिकांना विश्वासात न घेता कामाला सुरुवात केल्यामुळे परिसरातील नागरिकांना प्रचंड अडचणींचा सामना करावा लागला. स्थानिक प्रशासनाला कोणतेही कल्पना न देता संबंधित पूर्वीच्या वापरातील रस्त्यावर काम सुरू करण्यात आल्याने प्रचंड गैरसोयी मध्ये वारजे कर अंत्यविधी व तत्सम कार्यक्रम करत होते. युवा नगरसेवक भारत भूषण बराटे यांनी संबंधित प्रश्नासाठी प्रशासकीय व स्थानिक पातळीवर सामंजस्यांनी मार्ग काढण्यासाठी विविध बैठका आणि पाठपुरावा करत वारजेकरांची मुख्य समस्या होऊन मुक्तता केली आहे.
वारजे माळवाडी परिसरातील नागरिकांचा होणारा त्रास कमी व्हावा यासाठी पुणे महानगरपालिका पथ विभाग आणि माजी नगरसेवक श्री. दत्ता चौधरी यानी त्यांची जागा उपलब्ध करून दिल्याबद्दल संपूर्ण वारजेकरांच्या वतीने स्थानिक नगरसेवक म्हणून भारतभूषण मराठी यांच्या वतीने विशेष आभारही मानण्यात आले.










