भाजपकडून निवडणुकीत फेरफार कार्यकर्ते मरण्यासही तयार ‘पराभव झाल्यास मोदी राजीनामा देणार?’: तृणमूल

0

”पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीत भाजप फेरफार करण्याचा प्रयत्न करत असून, केंद्रीय सुरक्षा दले आणि निवडणूक निरीक्षक हे भाजपच्या सांगण्यानुसार काम करत आहेत,” असा आरोप पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी बुधवारी केला.तसेच “इथे गुंडाराज आहे का?” असा सवाल करत, ”आमचे कार्यकर्ते मरण पत्करण्यासही तयार आहेत, असेही ममता यांनी भवानीपूरमधील चक्रबेऱ्या येथील मतदान केंद्राबाहेर पत्रकारांशी बोलताना सांगितले.

भाजपने मात्र हे आरोप फेटाळले आहेत. तृणमूल काँग्रेसविरोधात जनतेत रोष वाढत आहे, त्यामुळे जनतेचे लक्ष विचलित करण्यासाठी गोंधळाची परिस्थिती निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे, असा दावा भाजपने केला आहे.

तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना आणि नेत्यांना केंद्रीय सशस्त्र पोलिस दलांकडून होणाऱ्या अत्याचाराला सामोरे जावे लागत आहे, मात्र आमचे कार्यकर्ते मरण्यासही तयार आहेत, असा दावा ममता बॅनर्जी यांनी केला आहे.

अधिक वाचा  भीमाशंकर मंदिर तब्बल ५ महिन्यांनी १५ जूनला खुले; एका दिवसात फक्तं ‘एवढेच’ प्रवेश; दर्शनाचे हे नवे नियम

‘पराभव झाल्यास मोदींनी राजीनामा द्यावा’

”पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीत भाजपाचा पराभव झाल्यास नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधान पदाचा राजीनामा द्यावा,” असे आव्हान तृणमूल काँग्रेसचे राज्यसभा खासदार डेरेक ओ’ब्रायन यांनी बुधवारी दिले आहे. ओ’ब्रायन एका व्हिडिओद्वारे हे आव्हान देत म्हटले आहे की, मोदी यांनी राज्यातील सर्व २९४ मतदारसंघांत स्वतःलाच भाजपचा चेहरा म्हणून पुढे केले आहे. त्यामुळे त्यांनी हे आव्हान स्वीकारावे. ”मोदीजी आपणच जाहीर केले की, बंगालमधील सर्व २९४ जागांवर आपणच उमेदवार आहात. मोठमोठ्या घोषणा करणे थांबवा आणि हे आव्हान स्वीकारा. चार मे रोजी ममता बॅनर्जी आणि तृणमूल काँग्रेस हे पश्‍चिम बंगालमध्ये विजयी झाल्यावर पंतप्रधानपदाचा राजीनामा देण्याचे धैर्य दाखवा,” असे ओ’ब्रायन यांनी म्हटले आहे.

अधिक वाचा  दोघांचा पाठलाग, भररस्त्यात गोळ्या, ओमराजेंना आज न्याय मिळेल? 20 वर्षानंतर वडिल पवनराजे निंबाळकर हत्याकांडाचं गूढ उलगडणार

भाजपने फेटाळले आरोप

भाजपने ममतांचे आरोप फेटाळले आहेत. सुवेंदू अधिकारी म्हणाले की मुख्यमंत्री ममता बॅनर्जी ही निवडणूक हरतील. लोक मोठ्या संख्येने मतदानासाठी बाहेर पडत आहेत. निवडणूक आयोगाने मुक्त आणि निष्पक्ष मतदानासाठी योग्य व्यवस्था केली आहे. तर, तृणमूलचे नेते आणि ममता यांचे भाचे अभिषेक बॅनर्जी यांनी मात्र तृणमूल काँग्रेसला २०२१ पेक्षा अधिक जागा मिळतील असा दावा केला आहे.

ममतांचे हे आहेत आरोप

बाहेरून आलेले अनेक निरीक्षक भाजपच्या सूचनांनुसार काम करत आहेत

बाहेरील लोक मतदान प्रक्रियेत हस्तक्षेप करत आहेत

भवानीपूर मधील वॉर्ड क्रमांक ७० च्या नगरसेवकाला बाहेर पडू दिले जात नाहीये

अधिक वाचा  यंदा जांभळाचा सडा पडतोय म्हणजे दुष्काळ निश्चित येणार?

राज्याबाहेरील काही लोक मतदारसंघात गोंधळ निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत

सात विधानसभा मतदारसंघांत एनआयए तैनात

कोलकता : पश्चिम बंगालमध्ये दुसऱ्या टप्प्यातील मतदान सुरू असताना निवडणूक प्रक्रियेत अडथळा आणण्यासाठी बाँबचा वापर होऊ नये, यासाठी निवडणूक आयोगाने दिलेल्या निर्देशानंतर किमान सात विधानसभा मतदारसंघांत राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या (एनआयए) अधिकाऱ्यांना तैनातच करण्यात आले आहे. कसब, भांगड, बारुईपूर आणि विष्णुपूर यांसह सात मतदारसंघांत केंद्रीय दहशतवादविरोधी यंत्रणेचे अधिकारी तैनात करण्यात आले असल्याची माहिती अधिकृत सूत्रांनी दिली. विशिष्ट माहितीच्या आधारे हा निर्णय घेण्यात आला आहे, असे संबंधित अधिकाऱ्यांच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे.