मागील ३५ वर्ष शरद पवारांच्या पावलावर बारामतीत काम! मी सर्वस्व गमावलं, सुनेत्रावाहिनीची भावनिक साद! डोळ्यात टचकन पाणी

0

बारामती विधानसभा पोटनिवडणुकीसाठी येत्या 23 एप्रिल रोजी मतदान होणार आहे. या पोटनिवडणुकीसाठी महायुतीकडून उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांना उमेदवारी देण्यात आली आहे. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज बारामतीमध्ये महायुतीची सांगता सभा पार पडली. या सभेत बोलताना सुनेत्रा पवार या अजितदादांची आठवण निघताच चांगल्याच भावुक झाल्याचं पहायला मिळालं, त्यांच्या डोळ्यात पाणी आलं. या निवडणुकीत सर्व पक्षांनी पाठिंबा दिला आहे. शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांचे विशेष आभार मानते. अजित पवार यांच्या आजी शारदाबाई पवार यांचेही खूप आभार मानते, कारण त्यांनी कुटुंबापुरते मर्यादित न राहता समाजासाठी काम केलं. शरद पवारांचे आशीर्वाद अतिशय महत्वाचे आहेत. आशाताई पवार सर्वात मोठा आधार आहेत, असं यावेळी सुनेत्रा पवार यांनी म्हटलं.

अधिक वाचा  राज्य सरकारी कर्मचारी आज संप; सरकार थेट पोलिस मदत घेणार! ….रजा, वेतन अन् कारवाईचे हे मोठे आदेश

सुनेत्रा पवार नेमकं काय म्हणाल्या?

आज प्रचार सभेची सांगता होतं आहे. या प्रांगणात अजित पवारांचा नागरी सत्कार तुम्ही केला आहे. सांगता सभेला उसळलेला जनसागर पाहता ही दादांच्या कामाची पोचपावती आहे. मागील ३५ वर्ष शरद पवारांच्या पावलावर पाऊल टाकत बारामती अजित पवारांनी उभी केली. अजूनही बारामतीकर दादांच्या आठवणीत शोककुल आहेत. बारामतीकर अजूनही त्यांचे रील पाहतात तेव्हा त्यांच्या डोळ्यातून पाणी येत राहत. अनेकांना वाटत अजित पवार परत येतील परंतु आता ते आपल्याला नाहीत असे यावेळी सुनेत्रा पवार यांनी म्हटलं.

पुढे बोलताना त्या म्हणाल्या की, बारामतीला देशात 1 नंबर करण्याच स्वप्न अजित पवारांच होतं. वक्तशीरपणा आणि आर्थिक शिस्त या जोरावर राज्याची आर्थिक घडी त्यांनी बसवली. त्यांनी विकासाच्या आड कधीच राजकारण आणलं नाही. लोकांच्या मनात त्यांनी कामाच्या माध्यमातून स्थान निर्माण केलं होतं. बारामतीतील 3 पिढ्या दादांच्या कार्याशी आणि कामाशी जोडल्या गेल्या आहेत. मला आणि माझ्या 2 मुलाना लोकांचं भरभरून प्रेम आणि आधार मिळाला आहे.

अधिक वाचा  सुनेत्रा पवारांची ‘अजितनिती’ विधान परिषद फक्तं १ जागा त्यातही ही रणनीती; मतदारसंघ अन् परिवार हित अबाधित

दादांच्या अपूर्ण राहिलेल्या स्वप्नांची पूर्तता करण्यासाठी मी रणांगणात उतरली आहे. माझ्यासाठी हा प्रवास सोप्पा नाही, मात्र बारामतीकरांची ताकद माझ्या पाठीशी उभी आहे. मी तुमचा विश्वास कधीच कमी होऊ देणार नाही. माझ दुःख मोठ आहे. मी माझ सर्वस्व गमावलं आहे, असंही यावेळी सुनेत्रा पवार यांनी म्हटलं, दरम्यान यावेळी बोलताना त्या चांगल्याच भावुक झाल्याचं पहायला मिळालं.