श्री दुर्ग संवर्धन संस्था, महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने विसापूर किल्ला स्वच्छता व संवर्धन मोहीम

0

श्री दुर्ग संवर्धन संस्था, महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेली विसापूर किल्ला स्वच्छता व संवर्धन मोहीम उत्साहात व यशस्वीरित्या पार पडली. या मोहिमेत संस्थेचे पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच दुर्गप्रेमी मावळे मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. मोहिमेदरम्यान गड परिसर स्वच्छ ठेवण्याबाबत जनजागृती करण्यात आली.

याचबरोबर किल्ल्यावर असलेल्या पाण्याच्या टाक्यांमधील दूषित व गाळ साचलेले पाणी काढून टाक्यांची स्वच्छता करण्यात आली. साचलेला गाळ बाहेर काढून पाणीसाठा स्वच्छ व वापरयोग्य करण्याचे महत्त्वपूर्ण काम मावळ्यांनी श्रमदानातून पूर्ण केले.
इतिहास वारसा जपण्यासाठी व गड-किल्ल्यांचे संवर्धन करण्यासाठी अशा मोहिमा सातत्याने राबविण्याचा संस्थेचा मानस व्यक्त करण्यात आला. ही मोहीम यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतलेल्या सर्व मावळ्यांचे व सहकार्य केलेल्या दुर्गप्रेमींचे संस्थेतर्फे आभार मानण्यात आले.

अधिक वाचा  शरद पवारांचा ब्लड टेस्ट अन् सिटीस्कॅनही रिपोर्ट नॉर्मल; डॉक्टरांकडून महत्त्वाची अपडेट