आत्ता गाव खेड्यापाड्यात निवडणुक धुरळा उडाला; पुण्यासह १२ ठिकाणी जिल्हापरिषद-पंचायत समितीत मतदान आणि निकाल कधी?

0

राज्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांची घोषणा झाली आहे. राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी आज मंगळवारी जिल्हापरिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीची घोषणा केली. मुंबईतील मलबार हिल येथील सह्याद्री अतिथीगृहात झालेल्या पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. यामुळे राज्याती १२ जिल्ह्यात निवडणुकीचा धुरळा उडणार आहे.

राज्य निवडणूक आयोगाने पत्रकार परिषद घेत जिल्हापरिषद आणि नगरपंचायतीच्या निवडणुकीविषयी माहिती दिली. निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे म्हणाले, ‘सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णायनुसार ज्या ५० टक्क्यांपेक्षा कमी आरक्षण आहे. अशा जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणूक घेण्याचे निर्देश दिले आहेत. त्यानुसार १२ जिल्हापरिषद आणि १२५ पंचायत समितीच्या निवडणुका घेण्यात येणार आहे.

अधिक वाचा  पुणे महापालिकेचा इमारत पुनर्विकासाचा नवा अध्यादेश अटींची जंत्री; बाबुगिरी बळवणार सोसायट्यांची डोकेदुखी वाढली

१२ ठिकाणी जिल्हा परिषदांच्या निवडणुका

रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर

छत्रपती संभाजीनगर, परभणी, धाराशीव, लातूर या ठिकाणी निवडणुका होतील.

मतदाराला दोन मते देता येणार

प्रत्येक मतदाराला दोन मते देता येतील. १ मत जिल्हा परिषद आणि १ मत पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी देता येईल. नामनिर्देशन प्रक्रिया ही ऑफलाइन प्रक्रिया राहणार असून महापालिका सारखीच होणार आहे. ज्या जागा राखीव आहेत. त्या जागेवर जातवैधता पडताळणी आवश्यक असणार आहे.

जातप्रमाणपत्र- उमेदवारी अर्जासोबत दाखल करण्याची आवश्यकता असणार आहे. जातप्रमाणपत्र नसेल तर जातपडताळणी समितीकडे अर्ज दाखल केल्याची सत्यप्रत सादर करणे आवश्यक आहे. निवडून आल्यावर ६ महिन्याच्या आत सादर करणे आवश्यक असणार आहे. जर नाही केलं, तर त्याची निवड रद्द होईल.

अधिक वाचा  महाराष्ट्राच्या सहकार चळवळीला नवे धोरणात्मक बळ?; स्वतंत्र राज्य सहकार धोरण अंतिम स्वरूप सादर होणार

निवडणूक वेळापत्रक

नामनिर्देशन – पत्र स्वीकारणे – १६ जानेवारी २६ ते २१ जानेवारी २६

छाननी – २२ जानेवारी

उमेदवारी माघारी अंतिम मुदत – २७ जानेवारी

अंतिम उमेदवार यादी – निवडणूक चिन्ह वाटप – २७ जानेवारी दुपारी साडेतीन नंतर

मतदान – ५ फेब्रुवारी

मतमोजणी  – ७ फेब्रुवारी सकाळी १० पासून