कौंढर काळसुर ग्रामपंचायतीत संविधान दिन उत्साहात साजरा

0

गुहागर दि. २६ (रामदास धो. गमरे) देशाच्या लोकशाही परंपरेला आणि संविधान निर्मात्यांच्या कार्याला अभिवादन म्हणून ग्रामपंचायत कौंढर काळसुर येथे बुधवार, दि. २६ नोव्हेंबर रोजी संविधान दिन सरपंच सौ. सिया गुजर यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच ग्रामपंचायत अधिकारी अप्पासाहेब राजेशिर्के यांच्या अध्यक्षतेखाली मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.

सदर प्रसंगी कार्यक्रमाच्या आरंभी सरपंच सौ. सिया गुजर आणि ग्रामपंचायत अधिकारी अप्पासाहेब राजेशिर्के यांनी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात केली. तद्नंतर उपस्थित ग्रामस्थ, मान्यवर आणि पदाधिकारी यांनी संविधानाच्या प्रस्तावनेचे एकसुरात व बुलंद आवाजात सामूहिक वाचन करून भारतीय लोकशाही मूल्यांना अभिवादन केले.

अधिक वाचा  कोथरूडमध्ये पौड रोड परिसरात एम एन जी एल गॅस ची गळती; स्थानिक नगरसेवकाची कार्यतत्पर योजना

सदर प्रसंगी आपल्या मार्गदर्शनपर भाषणात सरपंच सिया गुजर म्हणाल्या की “भारतीय संविधान हे देशाच्या एकात्मतेचा आणि लोकशाहीचा पाया आहे, प्रत्येक नागरिकाने संविधानातील मूल्ये आणि अधिकार यांसोबतच कर्तव्येही अंगीकारणे आवश्यक ही काळाची गरज आहे.

संविधान दिनानिमित्त सामाजिक बांधिलकी जपण्याच्या हेतूने कौंढर ग्रामस्थांच्या पुढाकारातून गावातील नदीपात्रात वनराई बंधारा उभारण्यात आला. “पाणी अडवा, पाणी जिरवा” या संदेशाचा पुनरुच्चार करत पाणीटंचाईवर मात करण्यासाठी हा उपक्रम राबवण्यात आला. या उपक्रमात गावातील महिला बचतगट, युवक मंडळ आणि सामाजिक संस्था यांचा उत्स्फूर्त सहभाग होता.

सरतेशेवटी ग्रामपंचायत अधिकारी अप्पासाहेब राजेशिर्के यांनी संविधानातील मूलभूत कर्तव्यांबाबत जनजागृतीपर संदेश देत उपस्थित ग्रामपंचायत सदस्य, कर्मचारी आणि ग्रामस्थांचे आभार मानून कार्यक्रमाची सांगता केली.

अधिक वाचा  देश पातळीवर घडामोडी अन् अजितदादांचा घातपात? आमदार रोहित पवारांच्या नवीन पुराव्यामुळे मोठी खळबळ