बौद्धजन पंचायत समितीच्या वतीने अमृत महोत्सवी संविधान दिन मोठ्या उत्साहात संपन्न

0

मुंबई दि. २७ (रामदास धो. गमरे) विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी देशाला २६ नोव्हेंबर १९४९ साली संविधान बहाल केले त्याला ७५ वर्षे पुर्ण होत असून या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त संविधानाचा वर्धापनदिन कार्याध्यक्ष लक्ष्मण भगत यांच्या अध्यक्षतेखाली बौद्धजन पंचायत समिती कार्यालय परेल, मुंबई १२ येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाला.

सदर प्रसंगी लक्ष्मण भगत यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण केले उपकार्याध्यक्ष मनोहर सखाराम मोरे यांनी ज्योत प्रज्वलन करून कार्यक्रमाला प्रारंभ केला तद्नंतर लक्ष्मण भगत व उपस्थितांनी सामूहिक रित्या बुलंद आवाजात संविधान उद्देशिकेचे वाचन केले.

अधिक वाचा  राज्यावर दुहेरी संकट उष्ण लाटेचाही ‘येलो अलर्ट’ जारी अतिमहत्वाच्या कामाशिवाय घराबाहेर पडणे टाळा, या जिल्ह्यात शाळांना सुट्टी जाहीर

अध्यक्षीय भाषणात लक्ष्मण भगत यांनी “डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दोन वर्षे अकरा महिने सतरा दिवस रक्ताच पाणी करून एकट्याने हे संविधान लिहून पूर्ण केले आणि २६ नोव्हेंबर १९४९ रोजी देशाला बहाल केले म्हणून हा देश अनेक धर्म, अनेक पंथ, अनेक जाती, अनेक भाषावादी असला तरी एकसंध गेली ७५ वर्षे आहे ही संविधानाची ताकद आहे आज आपण सर्वसामान्य माणूस आनंदाने जीवन जगतोय ही संविधानाने दिलेली देणगी आहे म्हणून प्रत्येक नागरिकांनी संविधाना बद्दल कृतघ्न व्यक्त करणे हे आपले कर्तव्य आहे” असे नमूद केले.

अधिक वाचा  कात्रज-कोंढवा रस्ता आयुक्तांची पाहणी रुंदीकरणास वेग; ५२,६३० चौ.मी. चे भू-संपादन होणार मोठ्या निधीची तरतूद

सदर कार्यक्रमास उपकार्याध्यक्ष मनोहर सखाराम मोरे, अतिरिक्त चिटणीस यशवंत कदम, विवाह मंडळाचे अध्यक्ष राजाभाऊ तथा रामदास धो. गमरे, कार्यालयीन सचिव संजय मोहिते, बगाडे, मंगेश पवार, अशोक कदम, गौतम जाधव, प्रदीप तांबे, अनंत सावंत, सुनील जाधव आदी मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते या सर्वांनी संविधानाबद्दल कृतघ्नता व्यक्त केली. सरतेशेवटी राजाभाऊ तथा रामदास धो. गमरे यांनी सर्वांचे आभार मानून कार्यक्रमाची सांगता केली.