बंगळुरु IPL चेंगराचेंगरीमुळे RCB आत्ता पुणेकर होणारं? RCB 2026 साठी मध्ये मोठा निर्णय घेण्याची शक्यता….

0

IPL 2026 मध्ये RCB मोठा निर्णय घेण्याची शक्यता आहे. आगामी हंगामासाठी RCB घरच्या मैदानातील सामने बंगळुरू ऐवजी पुण्यातील एससीएच्या मैदानावर खेळण्याच्या विचारात आहे. याबाबत अधिकृत निर्णय झालेला नाही, मात्र तशी चर्चा सुरू असल्याचं सांगितलं जातं आहे. गेल्या वर्षी बंगळुरूमध्ये झालेल्या चेंगराचेंगरीमुळे हा निर्णय घेतला जात असल्याची माहिती आहे.

यासंदर्भात बोलताना एमसीएचे सेक्रेटरी कमलेश पिसाळ म्हणाले, “RCB चे घरचे सामने पुण्यात खेळवले जाण्याची शक्यता आहे. मात्र, याबाबत अद्याप अंतिम निर्णय झालेला नाही. गेल्या वर्षी बंगळुरूमध्ये झालेल्या चेंगराचेंगरीच्या घटनामुळे त्यांनी हा निर्णय घेतला आहे. यात आणखी बऱ्याच तांत्रिक अडचणी आहेत. जर सर्व काही सुरळीत पार पडलं तर RCB चे सामने पुण्यात खेळवले जातील.”

अधिक वाचा  आखाती युद्ध कांदा-केळी-द्राक्षांचे 1 हजार कंटेनर अडकले, काही कंटेनर मुंबई बंदराकडे पुन्हा वळवले!

दरम्यान, IPL 2026 च्या तयारीला सुरुवात झाली आहे. 15 आणि 16 डिसेंबर रोजी अबू धाबी येथे आगामी हंगामासाठी लिलाव होणार आहे. त्यापूर्वी 15 नोव्हेंबरपर्यंत सर्व संघांना त्यांची रिटेन्शन खेळाडूंची यादी द्यावी लागणार आहे. त्यानुसार RCB काही खेळाडूंना रिलीज करण्याची शक्यता आहे.

यामध्ये ऑलराउंडर लियाम लिव्हिंगस्टन, रसिख सलाम, श्रीलंकेचा वेगवान गोलंदाज नुवान तुषारा आणि मोहित राठी या खेळाडूंच्या नावाची चर्चा आहे. याशिवाय RCB जोश हेजलवूड, फिल सॉल्ट, टीम डेविड आणि विराट कोहली यांना रिटेन करणार असल्याचं सूत्रांनी सांगितलं आहे. तसेच भुवनेश्वर कुमार, जितेश शर्मा, सुयश शर्मा तसेच क्रुणाल पांड्या या खेळाडूंनाही RCB कडून रिटेन केलं जाण्याची शक्यता आहे.

अधिक वाचा  DGCA अहवालावर थेट छगन भुजबळांचाच सवाल, गुंता वाढणार? मलाही आश्चर्य वाटलं….