मुंबई दि. ७ (रामदास धो. गमरे) बौद्धजन सहकारी संघ तालुका गुहागर जिल्हा रत्नागिरी यांच्या विद्यमाने गाव व मुंबई संयुक्त कौन्सिल सभा रविवार दि. ७ जून २०२६ रोजी मुंबई संघाचे चेअरमन दिपक मोहिते यांच्या अध्यक्षतेखाली डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक सभागृह, भोईवाडा, परेल, मुंबई – १२ येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाली.






सदर प्रसंगी महापुरुषांच्या प्रतिमांना मान्यवरांच्या शुभहस्ते पुष्पहार अर्पण करून ज्योत प्रज्वलित करण्यात आली व सभेस सुरुवात झाली. सहकारी संघाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त संघांची पुढील वाटचाल या विषयाच्या अनुषंगाने बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. सदर बैठकीत गाव शाखेचे चेअरमन एम. जी. मोहिते, अध्यक्ष सुरेश दादा सावंत, उपाध्यक्ष विजय अप्पा कदम, सरचिटणीस सुनील गमरे आणि सहकारी तर मुंबई शाखेचे चेअरमन दिपक मोहिते, अध्यक्ष अशोक कदम उपकार्याध्यक्ष मंगेश कळंबे, उपकार्याध्यक्ष अरविंद जाधव, सरचिटणीस प्रदीप कदम, अनुराग जाधव, खजिनदार अजित पवार आणि सहकारी, विश्वस्त पांडुरंग गमरे, दीपक जाधव, पराग सावंत, माजी विश्वस्त संजय पवार, के. सी. जाधव, राजाभाऊ तथा रामदास धो. गमरे, माजी चिटणीस संजय तांबे, संदेश गमरे, कोषाध्यक्ष रामदास कळंबे, माजी न्यायदान कमिटी अध्यक्ष शशिकांत मोहिते, बौद्धाचार्य संदीप गमरे आदी मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सदर बैठकीत अमृत महोत्सवा निमित्त खालील प्रमाणे ठराव पारित करण्यात आले १. बौद्धजन सहकारी संघाच्या पंच्याहत्तरव्या अमृत महोत्सवा निमित्त पंचाहत्तर झाडांचे वृक्षारोपण करणे २. महिलांना सक्षम करण्यासाठी स्मारकात योजना राबविणे ३. रक्तगट तपासणी व रक्तदान शिबिर घेणे ४. स्मारक आहे त्या ठिकाणी तसेच ठेवून नवीन स्मारकासाठी जागा खरेदी करून त्याठिकाणी भव्यदिव्य स्मारक निर्माण करणे त्यासाठी प्रत्येक सभासदाने आपला एकदिवसाचा रोज देणे ५. वर्षावास मालिका कार्यक्रमाचा प्रारंभ २ ऑगस्ट रोजी गावी स्मारकात होईल आणि समारोप ही संयुक्त विद्यमाने त्याठिकाणी करण्यात येईल ६. चौथी घटना दुरुस्ती व नवीन कमिटी गठित करून त्यास मान्यता देणे ७. बुद्ध जयंती नंतर तालुक्याची जयंती होईल त्यादिवशी विभागात किंवा शाखेत कार्यक्रम असता कामा नये इतर वेळी शाखा व विभागाने आपल्या सवडीप्रमाणे तारखा निश्चित करणे त्यास संघाचा विरोध असणार नाही ८. काही गावागावात वाद असतील तर ते विभागाने मिटविणे आणि बाहेर गेलेल्या सभासदांस पुन्हा संघात आणणे ९. अठरा वर्षावरील प्रत्येक तरुणास संघाचा सभासद करून घेणे १०. गाव शाखेचा अहवाल मुंबई शाखेस देणे ११. गाव शाखेचे आप्पा कदम यांनी मुंबई शाखेस चांगल्या पद्धतीने सहकार्य करून बैठकीचे आयोजन करून सभा यशस्वीपणे पार पाडण्यासाठी मदत केल्याबद्दल त्यांचे आभार मानले.
अध्यक्षीय भाषणात दीपक मोहिते यांनी दिवसभराच्या कार्यक्रमाचा आढावा घेत पारित करण्यात आलेल्या ठरावांची अंमलबजावणी करण्या संदर्भात गाव व मुंबई संघाच्या सर्वांच्या सही ने एकच परिपत्रक प्रसिद्ध करून ते विभाग अधिकाऱ्यांचा मार्फत शाखा शाखांना पोहोचवू अशी व्यवस्था करू आणि ही संयुक्त बैठक जवळपास पंधरा वीस वर्षानंतर ही दुसरी सभा पुन्हा ही पहिल्यांदाच गाव व मुंबई शाखांची कौन्सिल सभा खेळीमेळीच्या वातावरणात पार पाडण्यासाठी विभाग अधिकारी, मध्यवर्ती कार्यकारणी, विश्वस्त, आजी माजी कार्यकर्ते यांनी अथक परिश्रम घेतले त्यासाठी त्या सर्वांचे आभार मानून त्यांनी बैठकीची सांगता केली.













