मुंबई: “आदिमकाळ हा मातृसत्ताक व मातृपूजक काळ असून नैऋत्ती ही भूमीपुत्रांची माता होती, तिच्याच नावावरून नैऋत्य ही दिशा आहे, आजही आदिवासी समाजात मातृसत्ताक संस्कृती अस्तित्वात आहे, इंग्रज भारतात आले तेव्हा त्यांनी ही भारत हा मातृसत्ताक देश आहे असे मान्य केले होते, वीस लाख वर्षांपूर्वी माणसाची निर्मिती झाली तेव्हा जलचर प्राणी, भूचर प्राणी आणि उभयचर प्राणी अशी निर्मिती झाली असे संशोधनातुन सिद्ध होत आहे म्हणजे पंधरा लाख वर्षाआधी मानव हा जनावर होता त्याची मानव उत्क्रांती झाल्यावर मातृसत्ताक संस्कृती अस्तित्वात आली, त्याकाळी लग्न झाल की नवरा शिकारीला जायचा व त्याची पत्नी घरात राही, त्या स्त्रियांनी त्याकाळात निरीक्षण करून अनेक शोध लावले त्यातील महत्वाचा शोध म्हणजे शेती एक दाना पेरला त्यापासून अनेक दाणे उगवतात हा शेतीचा शोध आदीमकाळातील महिलांनी लावला आहे, शेतीचा शोध ही महिलांनी लावला व मातृत्व असल्याने जेवण ही त्यांनी बनवून पुरुषांना खाऊ घातल म्हणजेच पुरुसांच्या सर्वांगीण विकासात महिलांचा मोठा वाटा आहे हे विसरून चालणार नाही” असे प्रतिपादन प्रा. विजय मोहिते यांनी जागतिक महिला दिनी प्रमुख वक्ता म्हणून बोलताना केले.






बौद्धजन पंचायत समिती संलग्न मध्यवर्ती महिला मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक महिला दिन आदरणीय सुशिलाताई जाधव यांच्या अध्यक्षतेखाली डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक सभागृह, परेल, मुंबई – १२ येथे मोठया उत्साहात संपन्न झाला, सदर प्रसंगी आदरणीय आनंदराज आंबेडकर आणि मानिषाताई आनंदराज आंबेडकर यांनी ज्योत प्रज्वलन व आदर्शांच्या प्रतिमांस पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाची सुरवात केली तसेच धार्मिक विधी संस्कार समितीचे अध्यक्ष मंगेश पवार गुरुजी व चिटणीस मनोहर बा. मोरे यांनी सुमधुर वाणीने केले.
प्राध्यापक विजय मोहिते हे आपल्या भाषणात पुढे म्हणाले की “महिला या पुर्वीपासून पुरुषापेक्षा आघाडीवर होत्या थेरीगाथा हा पाली भाषेतील महिलांनी लिहिलेला ग्रंथ वाचला तर लक्षात येईल की त्याकाळी महिला किती प्रगल्भ होत्या, बुध्दाने महिलांना आध्यत्मिक मुक्तीचा मार्ग दिला त्याप्रभावाने ७३ महिला त्याकाळी भिक्खुनी झाल्या म्हणून सर्व महिलांनी या जागतिक महिला दिनी मातृसत्ताक संस्कृतीचे महत्व समजून प्रगती करावी” असे मार्गदर्शन केले.
माननीय सभापती आनंदराज आंबेडकर यांनी सदर जागतिक महिला दिन प्रसंगी संपूर्ण कार्यक्रमाचा आढावा घेत महिलांना मार्गदर्शन करताना शाहू, फुले, आंबेडकरी विचारधारा व सनातन विचारधारा यातील तफावत समजावून सांगताना वैदिक, सनातन संस्कृतीमध्ये बेडीत अडकलेल्या स्त्रीला तथागत गौतम बुद्धांच्या विचाराने प्रेरित होऊन संतशिरोमनी जगतगुरु संत तुकाराम, तुकडोजी महाराज, छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले, माता जिजाऊ, माता सावित्री, माता रमाई, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी गुलामगिरीच्या बेडीतून मुक्त करून कसे पुरुषांच्या बरोबरीने हक्क देऊन स्वकर्तुत्वावर उभे केले यावर सौदाहरण मार्गदर्शन केले.
सदर प्रसंगी उपसभापती विनोद मोरे, कार्याध्यक्ष लक्ष्मण भगत, माजी कार्याध्यक्ष, विश्वस्त किशोर मोरे, उपकार्याध्यक्ष अशोक भा. कांबळे (कणगोलकर), एच. आर. पवार (धामणकर), मनोहर सखाराम मोरे, चंद्रमणी शांताराम तांबे, अंकुश सकपाळ, शिवडी विभाग गट क्र. १३ चे गटप्रमुख राजाभाऊ तथा रामदास धो. गमरे, रवी शिंदे, यशवंत कदम, भगवान तांबे यांची प्रमुख उपस्थिती लाभली होती, सदर प्रसंगी मध्यवर्ती महिला मंडळ सरचिटणीस अंजलीताई मोहिते यांनी अत्यंत प्रभावी व लाघवी शैलीने कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले, सर्व व्यवस्थापक मंडळ सदस्य, बौद्धाचार्य, पदाधिकारी, महिला मंडळ, शिवडी विभागातील महिला कार्यकर्त्या, कार्यकर्ते तसेच विशेष बाब म्हणजे शिवडी विभागातील शाखामधील महिलांवर झालेला प्रभाव बघून कुणबी, मराठा व इतर समाजातील महिलांनी ही मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवाली.
सरतेशेवटी सुशिलाताई जाधव यांनी सदर कार्यक्रम यशस्वीरीत्या पार पडण्यासाठी अथक परिश्रम करणाऱ्या सर्वांचे तसेच उपस्थितांचे आभार मानून कार्यक्रमाची सांगता केली.













