केळेवाडी, किष्किंधानगर, सुतारदरा आयुष्य डोंगर कड्यावर ‘वाड्यावर नाही जिवाभावाच्या गड्यावर’; प्रभाग 11 विकासासाठी नवी चर्चा

0

कोथरूड विधानसभा मतदारसंघात ‘हातावर पोट आणि उरी भविष्याचे स्वप्न’ बाळगत दिनचर्यची गुन्हा गुजराण करणाऱ्या प्रभाग 11 मधील नागरिकांच्या नशिबी आजपर्यंत वाडा संस्कृती आणि त्यांचे सेवक अशी पाचवीला पुजलेली परिस्थिती बदलण्यासाठी भारतीय जनता पक्षाच्या वतीने कारभार ‘वाड्यावर नाही तर जिवाभावाच्या गड्यावर’ अशा समर्पित पॅनल च्या माध्यमातून नवा पर्याय निर्माण केल्याने प्रभाग 11 मध्ये विकासाची नवी चर्चा सुरू झाली आहे. राज्याचे उच्चतंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांच्या रणनीतीचा भाग म्हणून सर्वसामान्य कुटुंबात दिलेली उमेदवारी व रात्रंदिवस प्रचारार्थ गुंतलेली कार्यकारणी या सर संगमामुळे प्रभागातील गणित बदलण्यास सुरुवात झाली आहे.

कोथरूड विधानसभा मतदारसंघांमध्ये या प्रभागात कायमच वेगळ्या ‘धाटणी’च्या राजकारण्याला महत्त्व दिल्याने सर्वसामान्य नागरिकांच्या पदरी कायमच निराशा आली आहे. कोथरूड विधानसभा मतदारसंघाच्या या डोंगरकड्यालगत असलेल्या नागरिकांचेही काही म्हणणं आहे, त्यांच्या काही अपेक्षा आहेत, त्यांची काही स्वप्न आहेत. याची परवा न करता कायम वाड्यावरून जनमताच्या कौलाचा वापर करण्यामध्ये धन्यता मानल्याने या भागातील प्राथमिक सोयी सुविधा खरंच पूर्ण झाल्यात का हा प्रश्न प्रत्येकाला जाणवत असतो.  त्यातच निवडणुकीच्या दरम्यान विरोधात उभे राहण्यासाठी चेहरेच नसणे ही विरोधकांची खूप मोठी अडचण लक्षात घेऊन भारतीय जनता पक्षाने उच्च तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या आदेशानुसार गेली चार वर्षे घरोघरी दारोदारी तुमची आमची भाजपा सर्वांची! असे सेवाकार्य पोहोचवल्याने प्रभागात असलेल्या या वेगळ्या धाटणीच्या राजकारणाच्या विरोधात एल्गार पुकारला आहे.

अधिक वाचा  देश पातळीवर घडामोडी अन् अजितदादांचा घातपात? आमदार रोहित पवारांच्या नवीन पुराव्यामुळे मोठी खळबळ

प्रभाग क्रमांक 11 मधील राजकीय समीकरणे बदलण्यासाठी चंद्रकांतदादा पाटील यांनी व्यक्तिशः लक्ष घालत गेल्या तीन-चार वर्षांपासून विनम्र अभ्यासू आणि जनसेवा हेच आद्य कर्तव्य मानलेल्या कार्यकर्त्यांची फळी तयार करण्याचे काम केले. मितभाषी नेतृत्व अन् दांडगा जनसंपर्क या दोन तत्वांच्या जीवावर या प्रभागातील उमेदवारी जाहीर करण्यात आली असली तरी सुद्धा प्रादेशिक समीकरणांचाही विचार करण्यात आल्याने माणूस जिवाभावाचा या एकाच उक्तीनुसार संपूर्ण प्रभागामध्ये जनमताची पसंती वाढत आहे. जागतिक महामारीच्या काळात स्थानिक आमदार उच्च तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी जिव्हाळा आणि आपुलकीच्या जीवावर सर्वसामान्य नागरिकांच्या चेहऱ्यावर आनंद आणण्याचे काम केले आणि याच कामात अहोरात्र व्यस्त असलेल्या अभिजीत राऊत, शर्मिला शिंदे, मनीषा बुटाला व अजय मारणे या कार्यकर्त्यांना संधी देऊन नवा संदेश देण्याचे काम मा.चंद्रकांतदादा पाटील यांच्या वतीने केले गेले आहे.

अधिक वाचा  असंख्य दिव्यांगांच्या आयुष्यात नवी पहाट! पुन्हा उमलले हासू; ना. चंद्रकांतदादा यांची अशी ही संवेदनशीलता

या परिसरातील लाडक्या बहिणींच्या आरोग्य आणि सुरक्षा याला प्राधान्य देत भारतीय जनता पक्षाने या प्रभागात पक्की बांधणी केली आहे. भाजपच्या वतीने शिधावाटप, औषध फवारणी, सुखदा मानसी यासारखे महत्वकांशी प्रकल्प सुद्धा याच भागात सुरू करण्यात आले. किष्किंदानगर, सुतारदरा, जय भवानी नगर, रामबाग कॉलनी, म्हातोबानगर भागातील नागरिकांचे एक प्रकारे पालकत्व घेण्याचे काम विद्यमान आमदार चंद्रकांतदादा पाटील यांनी केल्याने प्रभागात भाजपच्या चारही उमेदवारांविषयी एक आपुलकीची भावना निर्माण झाली आहे. …..दादांची माणसं! ही एवढीच ओळख या प्रभागाचा विजय साजरा करण्यासाठी वापरण्यात येत असल्याने प्रभागाची गणिते बदलण्यास सुरुवात झाली आहे. त्यातच विरोधकांची पक्की बांधणी तोडण्यासाठी महायुतीतील मित्रपक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाबरोबरही वरिष्ठ स्तरावरून चर्चा केली जात असल्याने आगामी काळात या भागातील राजकीय गणिते बदलण्यास सुरुवात होणार आहे. उमेदवारांसमवेत गाठीभेटी प्रचार रॅली आणि संवाद यामार्फत फक्त तुमची आमची भाजपा सर्वांची एवढा संदेश दिला जात आहे.

अधिक वाचा  डिजिटल मीडिया संघटनेच्या अध्यक्षपदी राजा माने