मनोज जरांगेंचा धनंजय मुंडेंवर हल्लाबोल गंभीर आरोप; दोन्ही प्रकरणात एक आरोपी सुटला तर गाठ आमच्यासोबत

0

मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर खळबळ निर्माण झाली. अनेक गंभीर आरोप केली जात आहेत. हेच नाहीतर धनंजय मुंडे यांना टार्गेट केले जातंय. संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर परभणी, बीड, पुणे आणि आता पैठणमध्ये मोर्चा काढण्यात आला. या मोर्चाला सुरेश धस यांच्यासह मराठा नेते मनोज जरांगे पाटील हे देखील उपस्थित होते. यावेळी जरांगे पाटील यांनी धनंजय मुंडे यांच्यावर हल्लाबोल केला. यासोबतच काही आरोपीही केले. दुसरीकडे सुरेश धस आणि मनोज जरांगे यांच्या विरोधात ओबीसी समाज आक्रमक होताना दिसतोय.

ओबीसी नेत्यांना सुरेश धस आणि जरांगे पाटील टार्गेट करत असल्याचा आरोप ओबीसी समाजाचा आहे. आता नुकताच पैठण येथील मोर्चात बोलताना जरांगे पाटील यांनी धनंजय मुंडे यांच्यावर हल्लाबोल केला. जरांगे हे म्हणाले की, दोन्ही प्रकरणातील एकही आरोपी सुटला तर गाठ ही आमच्यासोबत आहे. मुख्यमंत्र्यांनी दिलेला शब्द पाळावा. सर्व धनंजय मुंडे यांचे षडयंत्र असल्याचा आरोप जरांगे पाटील यांनी लावला.

अधिक वाचा  सरकारचा मास्टरस्ट्रोक! रातोरात ‘नारी शक्ति वंदन अधिनियम’ निघाला अध्यादेश, देशभरात महिला आरक्षण लागू, पण अजून ट्विस्ट बाकी

जरांगे पाटील हे पुढे म्हणाले की, धनंजय मुंडे हे आरोपीला साथ देत आहेत. आता न्याय मिळाल्याशिवाय हटणार नाहीये. धनंजय मुंडे हे पाप झाकण्यासाठी ओबीसींना पुढे करत आहेत. मात्र, न्याय मिळण्यासाठी लढा देणार असल्याचे देखील जरांगे यांनी स्पष्ट केले. हेच नाहीतर यासोबतच एक गंभीर आरोप आता जरांगे यांनी केलाय. संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांना धमकी दिली जात असल्याचे त्यांनी म्हटले.

संतोष देशमुख यांचे कुटुंबिय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीला गेले होते. यावेळी त्यांची मुख्यमंत्र्यासोबत चर्चा झाली. संतोष देशमुख यांच्या हत्येतील आरोपींना तात्काळ फाशीची शिक्षा द्या, अशी मागणी केली जातंय. पोलिसांकडून याप्रकरणातील आरोपींना अटक करण्यात आलीये. धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय वाल्मिक कराड यांच्यावर संतोष देशमुख यांच्या हत्येशी संबंधित खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांना न्यायालयाकडून पोलिस कोठडी सुनावण्यात आलीये.

अधिक वाचा  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा घटनादुरुस्तीवरून विरोधी पक्षांना इशारा विरोधाची किंमत मोजावी लागेल!