फडणवीसांनी पुन्हा शरद पवारांना डिवचलं! ‘त्या’ वक्तव्यावरून केली टीका; वाद पेटणार?

0

राज्यातील राजकीय वर्तुळात अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांच्या पहाटेच्या शपथविधीवरून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आमने-सामने आल्याचे पाहायला मिळाले आहे. या दरम्यान औरंगाबादच्या नामांतरावरून देवेंद्र फडणवीस यांनी पुन्हा एकदा शरद पवारांना डिवचलं आहे.

नेमकं काय झालं?

उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री असताना त्यांनी औरंगाबादचे नामांतर संभाजीनगर असे केले होते. त्यानंतर शिंदे-फडणवीस सरकार येताच त्यांनी नावात बदल करताना छत्रपती संभाजीनगर असं नाव केलं. दरम्यान आज बीड येथे एका सभेत बोलताना फडणीसांनी शरद पवारांनी औरंगाबादबद्दल न केलेल्या ‘त्या’ वक्तव्याचा दाखला देत टीका केली आहे. यामुळे यावरून पुन्हा नवीन वाद पेटण्याची शक्यता आहे.

अधिक वाचा  महाराष्ट्रातील राज्यसभेच्या ७ जागांची निवडणूक जाहीर; २६ फेब्रुवारीला अधिसूचना १६ मार्चला मतदान मतमोजणी

न केलेल्या वक्तव्याचा दिला दाखला

काही दिवसांपूर्वी शरद पवार यांनी मी संभाजीनगर नाही तर औरंगाबादच म्हणणार असं वक्तव्य केल्याचं वृत्त काही माध्यमांनी दिलं होतं. दरम्यान, हे वृत्त चुकीचं असल्याचा खुलासा राष्ट्रवादी काँग्रेसकडून करण्यात आला होता. मात्र आता राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्याच वक्तव्याचा पुन्हा नव्याने उल्लेख करत शरद पवारांवर हल्ला चढवला आहे.

फडणवीस काय म्हणाले?

आपण औरंगाबादचं नाव छत्रपती संभाजीनगर असं केलं. तुम्हाला मान्य आहे का? असा प्रश्न फडणवीसांनी सभेतील नागरिकांना विचारला. जमावाने हो असे उत्तर देताच पुढे फडणीस म्हणाले की, पण हे पवार साहेबांना मान्य नाहीये. ते (शरद पवार) म्हणाले तुम्ही नाव काहीही करा, मी औरंगाबादच म्हणेन. पण पवार साहेब तुम्ही कितीही औरंगाबाद म्हटलं तरी, छत्रपती संभाजी महाराजांना आमच्या हृदयातून कोणीच काढू शकत नाहीत. छत्रपती संभाजी महाराजांचं बलिदान आम्ही कधीच विसरू शकत नाही”, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले. ते बीडमध्ये एका कार्यक्रमाला संबोधित करत होते.

अधिक वाचा  कृष्णा आंधळे फरार तरीही तो तीनदा गावात…. बीड पोलीस करताय काय? धनंजय देशमुखांचा मोठं विधान